शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

बाजारात येण्याआधीच नवीन सोयाबीन ४ हजारांनी गडगडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:03 IST

औरंगाबाद : दोन महिन्यांपूर्वी सोयाबीन पीक शेतात डोलत असताना बाजारात प्रतिक्विंटल भाव ९५०० रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला होता. मात्र, ...

औरंगाबाद : दोन महिन्यांपूर्वी सोयाबीन पीक शेतात डोलत असताना बाजारात प्रतिक्विंटल भाव ९५०० रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला होता. मात्र, आता काढणी होऊन सोयाबीन बाजारात येण्याची वेळ झाली आणि तब्बल ४ हजार रुपयांनी भाव गडगडला. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

तसे पाहता औरंगाबाद जिल्ह्यात खरिपात मक्याची पेरणी सर्वाधिक होत असते; पण मागील वर्षभरात सोयाबीनला चांगला भाव मिळाल्याने जिल्ह्यातील शेतकरी सोयाबीन पेरणीकडे वळले. परिणामी, जिथे सरासरी १४ हजार ६१४ हेक्टर पेरणी होत असते. तिथे यंदाच्या खरीप हंगामात २८ हजार ४२२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी जाऊन पोहोचली. यंदा उत्पादनही वाढल्याने ८ ते ९ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळून व दसरा-दिवाळी जोमात जाईल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. मात्र, अंतिम टप्प्यातील पावसाने हंगाम १५ दिवस लांबला आणि याचदरम्यान सोयाबीनचे भाव कोसळले शनिवारी जाधववाडीत ४१०० ते ५२०० रुपये प्रतिक्विंटल सोयाबीन विकले जात होते. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

चौकट

सोयाबीनचा दर (प्रतिक्विंटल)

महिना वर्ष किंमत

जानेवारी २०२० ३९०० रु.

जून २०२० ३४०० रु.

ऑक्टोबर २०२० ३१५० रु.

जानेवारी २०२१ ४००० रु.

ऑगस्ट २०२१ ९५०० रु.

सप्टेंबर २०२१ ४१००-५२०० रु.

-------

चौकट

खोऱ्याने पैसा ओतला, आता काय करू

सोयाबीनचा भाव ९ हजारांवर जाऊन पोहोचल्याने पहिल्यांदा मी एक एकरवर सोयाबीन लावले. मात्र, परतीच्या पावसाने शेंगा काळ्या, तर पाने पिवळी पडू लागली आहेत. याच वेळी भाव ४ हजारांपर्यंत खाली घसरला आहे. नवीन प्रयोग करायला गेलो; पण आमच्याच अंगलट आले.

-नेहरू काबरे, शेतकरी, श्यामवाडी, पळशी

----

खाद्यतेल आयात शुल्क घटविल्याचा फटका

ऐन सोयाबीन बाजारात येण्याच्या वेळीच केंद्र सरकारने सोयाबीन तेलाचे आयात शुल्क २५ टक्क्यांनी कमी केले. याचा फटका येथील शेतकऱ्यांना बसत आहे. उत्पादन अधिक, त्यात आयात शुल्क घटल्याने आयात वाढणार व सोयाबीनचे भाव आणखी कमी होणार.

-नामदेव सूर्यवंशी, जटवाडा

---

व्यापाऱ्यांच्या प्रतिक्रिया

शेतकऱ्यांनी विकण्याची घाई करू नये

सोयाबीनचा भाव क्विंटलमागे ४ हजार रुपयांनी कमी झाला आहे. मात्र, शेतकऱ्यांनी सोयाबीन विकण्याची घाई करू नये. सोयाबीनला वाळवा व सुकलेले सोयाबीन बाजारात आणा, त्यास चांगला भाव मिळेल.

-हरीश पवार, अडत व्यापारी

---

ओलसर मालामुळे भाव कमी

अडत बाजारात शेतकरी सोयाबीन आणत आहेत. त्यात ३० ते ३५ टक्के ओलसर माल आहे. म्हणजे क्विंटलमागे २० किलोची घट होते. यामुळे भाव कमी मिळत आहे. सुकलेले सोयाबीन आज ६ हजार ते ६२०० रुपये क्विंटलने विकले जाते.

-दत्तात्रय आष्टीकर, अडत व्यापारी