शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
3
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
4
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
5
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
6
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
7
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
8
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
9
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
10
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
11
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
12
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
13
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
14
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
15
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
16
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
17
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
18
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
19
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
20
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  

इतिवृत्त पडून तरी सभांवर सभा सुरू

By admin | Updated: October 13, 2016 01:11 IST

औरंगाबाद : महापालिकेच्या पार पडलेल्या सर्वसाधारण सभांच्या इतिवृत्तालाच मागील सात ते आठ महिन्यांपासून मंजुरी घेण्यात आली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

औरंगाबाद : महापालिकेच्या पार पडलेल्या सर्वसाधारण सभांच्या इतिवृत्तालाच मागील सात ते आठ महिन्यांपासून मंजुरी घेण्यात आली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नगरसचिव विभाग या विलंबाला अपुऱ्या मनुष्यबळाचे कारण देत असले तरी खरे कारण वेगळेच असल्याची चर्चा मनपा वर्तुळात आहे.नियमानुसार महापालिकेची सर्वसाधारण सभा दर महिन्याच्या २० तारखेपूर्वी घेण्यात येते. प्रत्येक सभेत मोठ्या प्रमाणात प्रशासकीय प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात येतात. नगरसेवकही आपापल्या वॉर्डातील विकासासाठी अशासकीय ठराव ठेवून मंजूर करून घेतात. चालू महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त पुढील महिन्याच्या सर्वसाधारण सभेत यावे, असे अनिवार्य असते. नव्हे सभेच्या विषयपत्रिकेवरील पहिला विषय हा मागील सभेच्या इतिवृत्ताला मंजुरी हाच असतो. इतिवृत्ताला मंजुरी देऊनच नवीन विषयावर चर्चा होते. इतिवृत्ताला मंजुरी दिल्याशिवाय त्या कामकाजाला कायदेशीर रूप प्राप्त होत नाही. परंतु महापालिकेत या नियमाला फाटा देण्याचे काम अलीकडे सुरू झाले आहे. मार्च २०१६ पासून अनेक सर्वसाधारण सभांचे इतिवृत्त मंजुरीविना पडून आहेत. काही सर्वसाधारण सभांचे इतिवृत्त तयार करण्यात आले असले तरी सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी आणण्यात आलेले नाही. इतिवृत्त मंजुरीसाठी न आणण्याचे कारण काय, अशी चर्चा आता मनपा वर्तुळात सुरू आहे. पदाधिकाऱ्यांनीच हे इतिवृत्त मंजुरीविना दडवून ठेवल्याचेही बोलल्या जात आहे. महापौर-उपमहापौरांचा कार्यकाळ आॅक्टोबरअखेर संपत आहे. त्यापूर्वी या इतिवृत्तांमध्ये काही ठराव घुसडण्याची शक्यता राजकीय मंडळींकडून व्यक्त करण्यात येत आहे.आज मनपाची सर्वसाधारण सभागुरुवारी (दि. १३) मनपाची नियमित सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत प्रशासनातर्फे मालमत्ता कराच्या नियमावलीचा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. मनपाने तयार केलेल्या नवीन नियमावलीवर सभेत गरमागरम चर्चा अपेक्षित आहे. नगरसेवकांकडूनही अनेक अशासकीय प्रस्ताव सभेत मांडण्यात आले आहेत.सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त तयार करण्याचे काम नगरसचिव विभागाकडून होते. नगरसचिव विभाग हा प्रशासनाचा एक भाग आहे. त्यांच्याकडे इतिवृत्त तयार करण्यासाठी मनुष्यबळाचा अभाव आहे. काही सभांचे इतिवृत्त रखडले आहेत. जे तयार असतील ते सुद्धा लवकरच मंजूर करून सदस्यांच्या हाती देण्यात येतील. इतिवृत्त पेंडिंग ठेवण्याचा काहीच विषय नाही.त्र्यंबक तुपे, महापौरमहापालिका अधिनियमाच्या नियम क्रमांक ५ मधील प्रकरण २ मध्ये सभा कामकाज नियमावलीवर मार्गदर्शन करण्यात आले आहे. सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त शक्यतो पुढील सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेत असावे, असे अपेक्षित आहे. नियमावलीत ‘शक्यतो’ या शब्दाचा सोयीस्कर अर्थ काढून औरंगाबाद महापालिकेने अनेक सभांचे इतिवृत्त दडवून ठेवले आहे. सहा ते आठ महिन्यांपूर्वीच्या सभांमध्ये कोणते ठराव मंजूर झाले हे असंख्य नगरसेवकांच्याही लक्षात असण्याचे कारण नाही. प्रत्येक सभेचे इतिवृत्तही अनेकजण वाचत नाहीत. याचाच फायदा घेऊन राजकीय मंडळी मंजूर न झालेले विषय सोयीस्करपणे टाकू शकतात.सर्वसाधारण सभा सुरू असताना नगरसेवकांकडून ऐनवेळीचा प्रस्ताव अजिबात घेता येत नाही. महापालिका सभा कामकाज नियमावलीच्या अनुसूची ड मधील प्रकरण २ मध्ये ऐनवेळीचा प्रस्ताव घेऊ नये असे म्हटले आहे.४स्थायी समिती आणि मनपा आयुक्तांकडून आलेला प्रस्ताव ऐनवेळी म्हणून घेता येऊ शकतो. पूर्वी मनपात या नियमांचे कोटेकोर पालन होत होते. ४आता सभा सुरू असतानाच ऐनवेळीचे विषय राजरोसपणे घेण्यात येतात आणि मंजूरही होतात.नगर सचिव विभागाकडे पूर्वी मनुष्यबळ नव्हते. आता काही कर्मचारी वाढवून देण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक प्रलंबित इतिवृत्त तयार करण्यात आले आहेत. पदाधिकाऱ्यांकडे हे इतिवृत्त मंजुरीसाठी पाठवूनही दिले आहेत. तीन ते चार सभांचे इतिवृत्त तयार करण्याचे काम सध्या सुरू असून, लवकरच हे कामही संपणार आहे.दिलीप सूर्यवंशी, नगर सचिव, मनपा