शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

दीड कोटी रुपये वाटप करूनही शौचालय कागदावरच

By admin | Updated: March 6, 2017 00:44 IST

ज्ाालना : स्वच्छ महाराष्ट्र अभियानंतर्गत शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी पालिकेकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत.

ज्ाालना : स्वच्छ महाराष्ट्र अभियानंतर्गत शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी पालिकेकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. मात्र काही लाभार्थ्यांकडून पळवाट शोधून शौचालयाचे अनुदान उचलूनही बांधकामाकडे दुर्लक्ष केले आहे. विशेष म्हणजे तीन हजार लाभार्थ्यांनी पहिला टप्पा म्हणून सुमारे दीड कोटी रूपयांचे अनुदान उचलले आहे.स्वच्छ महाराष्ट्र अंतर्गत जालना शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी तीन महिन्यांपासून प्रयत्न सुरू आहेत. यासाठी नगर पालिकेकडून आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले. शहरात सुमारे १३ हजार २०२ शौचालये बांधायची आहेत. त्याचबरोबर काही ठिकाणी सार्वजनिक शौचालयेही बांधण्यात येणार आहेत. यासाठी दहा ते बारा हजार रूपयांचे अनुदानही देण्यात येत आहे. तेरा हजार शौचालयांपैकी आज रोजी दोन हजार शौचालयांची कामे साठ ते सत्तर टक्के पूर्ण झाली आहेत. उर्वरित ११ शौचालयांची कामे अद्याप सुरूच झालेली नाहीत. तीन हजार लाभार्थ्यांना सुमारे ५ हजार रूपये प्रमाणे पहिला हप्ता खात्यावर वर्ग करण्यात आला आहे. यासाठी दीड कोटींच्या निधीचा वापर करण्यात आला आहे.नगर पालिकेने दीड कोटी रूपये निधी वाटप करूनही शौचालयांची कामे पूर्ण झालेली नाहीत. पाच ते दहा हजार रूपयांत शौचालयाची कामे पूर्ण होत नसल्याचे लाभार्थ्यांचे म्हणणे आहे. परिणामी शहरात शौचायल बांधकामची प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. शौचालयांची कामे गतीने करण्यासाठी उपसचिवांपासून ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत अनेकांनी पालिकेत आढावा बैठक घेऊन गतीने शौचालयाची कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेतही शौचालय बांधकामाबाबत आवाहन करण्यात आले. मुंबई येथूनही वेळोवेळी सूचना येत आहेत. ३१ मार्च अखेर १३ हजार शौचालय बांधकाम पूर्ण करावयाची आहेत. मात्र लाभार्थी तसेच नगर पालिकेतील कर्मचाऱ्यांत असमन्वय असल्याने गोंधळात भर पडली आहे. शौचालयांची कामे तात्काळ करा अन्यथा पोलिस कारवाईला सामोरे जाण्याचा इशारा मुख्याधिकाऱ्यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)