शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

३०० कोटी येऊनही एटीएममध्ये खडखडाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 23:28 IST

रिझर्व्ह बँकेने शहरासाठी मार्च महिन्यात ३०० कोटी रुपयांच्या नोटा पाठविल्या. मात्र, सध्याच्या घडीला अनेक एटीएममध्ये खडखडाट आहे. रोख रक्कम काढणाऱ्यांचा एवढा ओघ आहे की, नोटा भरताच दोन तासांतच एटीएम रिक्त होत आहेत.

ठळक मुद्देरोख रकमेचे व्यवहार वाढले : नोटा भरताच दोन तासांत होतात एटीएम रिक्त

औरंगाबाद : रिझर्व्ह बँकेने शहरासाठी मार्च महिन्यात ३०० कोटी रुपयांच्या नोटा पाठविल्या. मात्र, सध्याच्या घडीला अनेक एटीएममध्ये खडखडाट आहे. रोख रक्कम काढणाऱ्यांचा एवढा ओघ आहे की, नोटा भरताच दोन तासांतच एटीएम रिक्त होत आहेत.लग्नसराई, सुट्यांसाठी गावी जाणे, बुुकिंग करणे, धान्य खरेदी या बाबींबरोबरच निवडणुकीचे वातावरणही तापले आहे. यामुळे बँकेतून रोख रक्कम काढणाऱ्यांची संख्या वाढली आहे. रिझर्व्ह बँकेने नागपूर येथून मार्च महिन्यातच शहरातील बँकांच्या पाच करन्सीचेस्टमध्ये सुमारे ३०० कोटी रुपयांच्या नोटा पाठविल्या होत्या. आजघडीला शहरात सर्व राष्ट्रीयीकृत बँका, खाजगी बँका, सहकारी बँका मिळून ७०० एटीएम आहेत. यातील ५ टक्के एटीएम तांत्रिक बिघाडामुळे बंद आहेत. एसबीआयच्या दूधडेअरी चौक व शाहगंज येथील करन्सीचेस्टमधून दररोज प्रत्येकी १० कोटी रुपये एटीएमसाठी दिले जातात. अन्य तीन बँकांच्या करन्सीचेस्टमधूनही तेवढीच रक्कम एटीएमसाठी दिली जाते, असा दावा करन्सीचेस्टच्या अधिकाºयांनी केला. मात्र, आमच्या प्रतिनिधीने जालना रोड, कॅनॉट प्लेस, शाहगंज, औरंगपुरा, पुंडलिकनगर, गारखेडा परिसरातील काही एटीएम केंद्रांची पाहणी केली असता दुपारपर्यंत बहुतेक एटीएममध्ये खडखडाट असल्याचे दिसून आले. रवीकिरण देशपांडे या नागरिकाने सांगितले की, सिडकोतील पाच व गारखेडा परिसरातील दोन एटीएममध्ये जाऊन आलो; पण एकाही ठिकाणी रक्कम मिळाली नाही. यासंदर्भात करन्सीचेस्टमधील अधिकाºयांनी सांगितले की, आम्ही सकाळी एजन्सीकडे रक्कम देत असतो. एका एटीएममध्ये ३० लाख रुपये मूल्याच्या नोटा बसतात. २ हजार रुपयांची नोट रिझर्व्ह बँकेकडून येत नाही. ५०० रुपये, २०० रुपये व १०० रुपयांच्या नोटा एटीएममध्ये टाकण्यात येतात. या नोटांची संख्या वाढली आहे. चालू महिन्याच्या १ तारखेपासूनच एटीएममधून नोटा काढणाºयांची संख्या वाढली आहे. यामुळे दोन तासांत एटीएम खाली होत आहेत. निवडणुकीची मतमोजणी होईपर्यंत रिझर्व्ह बँक नोटांचा पुरवठा करणार नाही. यामुळे आम्हाला एटीएम आणि कॅश काऊंटर अशा दोन्हीकडे नोटा पुरवाव्या लागणार आहेत.३० कोटींची नाणी बँकांतरिझर्व्ह बँकेने मार्च महिन्यात ३० कोटींची नाणी बँकांमध्ये पाठविली आहेत. यात १ रुपया, २ रुपये, ५ रुपये व १० रुपयांची नाणी आहेत. बँकांमध्ये आधीच १० रुपयांची नाणी मोठ्या प्रमाणात पडून आहेत.चौकटदररोज काढली जाते एटीएममधून रक्कमबँक अधिकाºयांनी सांगितले की, निवडणुका सुरू आहेत. बँकेत दैनंदिन होणाºया प्रत्येक मोठ्या व्यवहाराची माहिती निवडणूक आयोगाला द्यावी लागत आहे. आयकर विभागाचीही नजर आहे. याशिवाय पोलिसांतर्फे शहरात वाहनांची तपासणीही केली जात आहे. सर्व व्यवहार बँकेमार्फत होत असले तरी पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी अनेक ग्राहक एटीएममधून दररोज थोडीथोडी रक्कम काढत आहेत. यामुळे कॅश काऊंटरपेक्षा एटीएमवरील ताण वाढला आहे. 

टॅग्स :bankबँकatmएटीएम