शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

२३ वर्षानंतरही मने कोलमडलेलीच...

By admin | Updated: September 30, 2016 01:17 IST

बालाजी बिराजदार , लोहारा ३० सप्टेंबर १९९३ च्या विनाशकारी भूकंपाला आज २३ वर्षे पूर्ण होत आहेत़ या इतक्या वर्षात उध्दवस्त झालेली घरे पुन्हा उभारली गेली आहेत़ अनेकजण स्थिरावत असून,

बालाजी बिराजदार , लोहारा३० सप्टेंबर १९९३ च्या विनाशकारी भूकंपाला आज २३ वर्षे पूर्ण होत आहेत़ या इतक्या वर्षात उध्दवस्त झालेली घरे पुन्हा उभारली गेली आहेत़ अनेकजण स्थिरावत असून, अनेकांनी आयुष्याची नव्याने सुरूवात केली आहे़ मात्र, त्यानंतरही अप्तेष्ठांना गमावल्याचे दु:ख कायम आहे़ सप्टेंबर महिना उजाडल्यानंतरच या भागातील अनेकजण व्याकूळ होवून त्या प्रलयंकारी भूकंपाने हेलावून जातात़ विघ्नहर्त्या श्री गणेशाला थाटामाटात निरोप देवून निद्रेच्या आधीन झालेल्या अनेकांसाठी ३० सप्टेंबर १९९३ ची पहाट आपल्या कवेत विनाशक घेवूनच आली होती़ पहाटे ३़५५ च्या सुमारास सास्तूर, किल्लारीसह उस्मानाबाद,लातूर जिल्हा भूकंपाने हादरला़ त्यापूर्वीही काही दिवस अगोदरपासून भूकंपाचे धक्के सुरूच होते़ मात्र, २३ वर्षापूर्वी पहाटेच्यावेळी झालेल्या या ६़५ रिस्टर स्केलच्या धक्क्याने लोहारा आणि परिसरातील गावेच्या गावे बेचिराख झाली़ काय होतय हे समजण्याअगोदरच सुमारे १० हजारापेक्षा अधिक नागरिकांचा जीव या भूकंपाने घेतला़ १६ हजारापेक्षा अधिक नागरिक त्यात जखमी झाले तर उस्मानाबाद आणि लातूर या दोन जिल्ह्यातील ५२ गावे आणि त्यातील ५३ हजार घरे उध्दवस्त झाली़ आज ३० सप्टेंबर रोजी या भागातील अनेकांच्या डोळ्यासमोर त्या प्रलयाच्या आठवणी उभ्या राहतील़ भूकंपानंतर ४१ पैकी १९ गावात ९ हजार ११ घरकुले बांधण्याचा निर्णय शासनाने घेतला होता़ यातील बहुतांश जणांना हक्काचे घर मिळाले असले तरी बांधकाम कंपन्यांनी केलेला कानाडोळा आणि इतर विविध कारणांमुळे अद्यापही काही कुटुंबे घरकुलापासून वंचित असल्याचे चित्र भूकंपग्रस्त भागात दिसून येते़ यातील काही प्रकरणे न्यायप्रविष्ठ असून, काही प्रकरणात एका घरकुलाचा कबाला दुसऱ्याच्या नावावर तर दुसऱ्याचे घरकूल तिसऱ्याच्या नावावर झालेले असल्याने अनेकांना अद्यापही हक्काच्या घरकुलापासून वंचित रहावे लागले आहे़ शासनाने या नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज व्यक्त होत आहे़