शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

उमेदवारी अर्जांत त्रुटी; भाजपाचे उमेदवार आऊट

By admin | Updated: January 8, 2017 00:08 IST

उस्मानाबाद : उपाध्यक्ष निवडीवेळी राष्ट्रवादीने खेळी करीत शिवसेनेत उभी फूट पाडली.

उस्मानाबाद : उपाध्यक्ष निवडीवेळी राष्ट्रवादीने खेळी करीत शिवसेनेत उभी फूट पाडली. परंतु, विषय समिती सभापती निवडीवेळी शिवसेना-भाजप आणि काँग्रेस हे एकत्र आल्याने राष्ट्रवादीने तटस्थ भूमिका घेतली. त्यामुळे सभापतींच्या निवडी बिनविरोध झाल्या. परंतु, भाजपाच्या वाट्याला आलेल्या दोन्ही उमेदवारांच्या अर्जांमध्ये त्रुटी निघाल्याने सदरील अर्ज बाद ठरले. त्यामुळे युती होऊनही भाजपाच्या पदरी निराशाच पडल्याने सेनेने संबंधित दोन्ही उमेदवारांना स्थायी समितीमध्ये स्थान दिले.जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या उस्मानाबाद नगर परिषद उपाध्यक्ष निवडीवेळीही शिवसेना-भाजप आणि काँग्रेसने एकत्र येत भाजपाचे योगेश जाधव यांना उमेदवारी दिली होती. याचवेळी शिवसेनेचे सूरज साळुंके यांनी पक्षाचा व्हीप झुगारून उमेदवारी दाखल केली. हीच संधी साधत राष्ट्रवादी काँग्रेसचे अभय इंगळे यांची उमेदवारी मागे घेत सर्व ताकद साळुंके यांच्या पाठीशी उभी केली होती. त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडल्याने साळुंके विजयी झाले होते. दरम्यान, विषय समिती सभापतींच्या निवडीवेळी काय होते? याबाबतही मागील आठ दिवसांपासून उलटसुलट चर्चा सुरू होती. राष्ट्रवादी सेनेच्या एका गटाला मदत करणार की भाजपाला साथ देणार याबाबत तर्कवितर्क लढविले जात होते. असे असतानाच शिवसेनेकडूनही भाजप, काँग्रेसला सोबत घेऊन कुठल्याही परिस्थितीत सभापतीपदे राष्ट्रवादीकडे जाणार नाहीत, यासाठी फिल्डींग लावली होती.दरम्यान, शनिवारी सकाळी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर व उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष बैठकीला सुरूवात झाली असता, ११ सदस्यांची समिती निश्चित करण्यात आली. यामध्ये राष्ट्रवादीचे पाच, शिवसेनेचे ३, भाजपचे २ तर काँग्रेसच्या एका सदस्याचा समावेश झाला. त्यानंतर विषय समित्यांसाठी अर्ज स्वीकारण्यात आले. राष्ट्रवादी काय भूमिका घेते, याकडे अनेकांचे लक्ष लागलेले असतानाच राष्ट्रवादीकडून एकाही समितीसाठी अर्ज दाखल केला गेला नाही. दुसरीकडे बांधकाम समितीसाठी शिवसेनेचे राजाभाऊ पवार, आरोग्य व स्वच्छता समितीसाठी काँग्रेसचे सिद्धार्थ बनसोडे, महिला व बालकल्याण समितीसाठी अनिता निंबाळकर, भाजपाकडून नियोजन समिती सभापतीपदासाठी अंजना पवार तर शिक्षण समितीसाठी प्रिया सुजित ओव्हाळ यांचेच अर्ज आले. भाजपाच्या सदरील दोन्ही उमेदवारांच्या अर्जावरील सूचक हे समितीतील सदस्य नसल्याने अर्ज बाद ठरविले. त्यामुळे ही दोन्ही सभापतीपदे आता रिक्तच राहणार आहेत. तर उर्वरित उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. दरम्यान, विद्यमान उपाध्यक्ष सूरज साळुंके यांनी त्यांच्या अधिकारात पाणीपुरवठा समिती निवडल्याने या समितीचे सभापती ते स्वत: असणार आहेत. एकूणच शिवसेना, भाजप आणि काँग्रेस यांची आघाडी होऊनही भाजपाच्या पदरी निराशा पडल्याचे या निमित्ताने समोर आले आहे. (प्रतिनिधी)