शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

समान पदवी, समान वेतन धोरण हवे

By admin | Updated: June 17, 2014 01:10 IST

नजीर शेख , औरंगाबाद केंद्रात आता आमचे सरकार असून मराठवाड्यातील तरुणांसाठी विविध योजना आणून दाखवू.

नजीर शेख , औरंगाबादकेंद्रात आता आमचे सरकार असून मराठवाड्यातील तरुणांसाठी विविध योजना आणून दाखवू, असा निर्धार व्यक्त करत पदवीधरांसाठी समान पदवी, समान वेतन धोरण असायला हवे, असा मुद्दा भाजपाचे मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील उमेदवार शिरीष बोराळकर यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत मांडला. पदवीधरांसाठी आपण कोणते काम केले की, ज्यासाठी त्यांनी आपणाला मतदान करावे, यासंदर्भात बोराळकर म्हणाले की, मी विविध उद्योगांत दीड हजारांवर युवकांना नोकरीला लावले आहे. अनेकांना उद्योगासाठी मदत केली आहे. मराठवाड्यातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी केंद्राच्या योजना आणण्याचा माझा प्रयत्न राहील. मी खेळाडू असून खेळाडूंना जागतिक स्तरावर संधी मिळणे तसेच राष्ट्रीय स्तरावरील नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मिळावे यासाठी प्रयत्न करणार आहे. पदवीधरांमध्ये सुशिक्षित बेरोजगार, डॉक्टर, अभियंते, शिक्षक, प्राध्यापक, सरकारी नोकरदार अशा विविध घटकांचा समावेश होतो. या सगळ्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी नवीन तंत्रज्ञानावर आधारित धोरण असायला हवे, यासाठी माझा प्रयत्न राहील. मागास विद्यार्थ्यांसाठी ईबीसी सवलत पाच लाख रुपयांपर्यंत झाली पाहिजे, तसेच पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ व्हायला हवी. मी गुत्तेदार नाही. त्यामुळे विधान परिषदेत पदवीधरांचे प्रश्न तीव्रतेने मांडेन, असे सांगत मोदींची लाट आणि मुंडे यांच्याविषयीची सहानुभूती या दोन्हींचा निश्चितच फायदा होईल, असे मत भाजपाचे मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील उमेदवार शिरीष बोराळकर यांनी व्यक्त केले. गेल्या वेळी शिवसेनेचे उमेदवार राजू वैद्य यांच्यामुळे भाजपाचा पराभव झाला. त्यांना १७ हजार मते मिळाली आणि आमचा तीन हजार मतांनी पराभव झाला. यंदा तर शिवसेना कधी नव्हे एवढी माझ्यासोबत आहे. तालुक्या-तालुक्यांतून शिवसेनेचे नेते व कार्यकर्ते बैठका घेत आहेत. हा आमचाच बालेकिल्ला आहे, असा दावा बोराळकर यांनी केला. आपली उमेदवारी जाहीर होण्यास उशीर झाला. शिवाय आपण सतीश चव्हाण यांच्या विरोधात लढण्यास तयार झाले. श्रीकांत जोशी तयार झाले नाहीत, या पार्श्वभूमीवर आपण निवडणुकीत उतरला हे धाडसच म्हणावे लागेल, या प्रश्नावर बोराळकर यांनी वातावरण खूपच चांगले असल्याचे सांगितले. लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार लाखांवर मतांनी निवडून आले आहेत. हा जो नवमतदार आहे तो आमच्याकडे आहे. पंतप्रधान मोदींच्या वलयाचा हा परिणाम असून त्याचा फायदा आम्हाला मिळू शकेल, असे स्पष्ट केले. भाजपाचे उमेदवार शिरीष बोराळकर यांचे मत दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूचे पडसाद निवडणुकीवर परिणाम करू शकतील का, या प्रश्नावर बोराळकर यांनी केवळ चर्चेच्या वावटळीचा काही परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट केले. मुंडेसाहेबांनंतर आ. पंकजा मुंडे-पालवे यांनी मराठवाड्याचे नेतृत्व करावे, असे माझे मत आहे. त्यांना केंद्रात मंत्रिपद मिळावे, कमी वयात त्या खूप परिपक्व नेत्या बनल्या आहेत. त्यांना केंद्रात मंत्रिपद दिल्यास हे नेतृत्व आणखी पुढे जाईल, असे मला वाटते.