शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
3
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
4
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
5
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
6
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
7
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
8
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
9
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
10
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
11
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
12
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
13
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
14
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
15
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
16
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
17
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
18
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
19
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
20
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय

वातावरण बदलाचा आरोग्यावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2017 00:32 IST

जालना : गत काही दिवसांपासून सकाळी थंडी तर दुपारी कडक ऊन पडत असल्याने सर्दी, ताप, डोकेदुखी, खोकला आदी रुग्णांचे प्रमाण वाढले आहे.

जालना : गत काही दिवसांपासून सकाळी थंडी तर दुपारी कडक ऊन पडत असल्याने सर्दी, ताप, डोकेदुखी, खोकला आदी रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. विशेषत: लहान मुले व वयोवृद्ध रुग्णांची संख्या वाढल्याचे चित्र शासकीय तसेच खाजगी रुग्णालयात दिसून येते. यंदा पडलेल्या पावसामुळे थंडीचे प्रमाणही जास्त होते. पारा ८ ते ९ अंशांवर घसरला होता. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात उन्हाची तीव्रता वाढली असली तरी सकाळचे तापमान अद्यापही घसरलेलेच आहे. थंडीचा पारा १५ ते १६ अंशांवर आहे. रविवारी सकाळी तापमान १६ अंश तर दुपारी उन्हाचा पारा ३४ अंशांवर होता.त्यामुळे लहान बालके तसेच वयोवृद्धांमध्ये सर्दी, ताप, जुलाब, डोकेदु:खी आदी प्रकार वाढले आहेत. खाजगी सोबतच जिल्हा शासकीय रुग्णालयातही अशा रुग्णांची संख्या वाढत असल्याचे सांगण्यात आले. जिल्हा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात दररोज हजार ते बाराशे रुग्णांची तपासणी व औषधोपचार होतात. आठवड्यापासून त्यापैकी दोनशे ते अडीचशे रुग्ण सर्दी, तापाचे असल्याचे निवासी वैद्यकीय अधिकारी राठोर यांनी सांगितले. वातावरणातील बदलामुळेच हे रुग्ण वाढत असल्याचे ते म्हणाले.ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातही रुग्ण वाढत असल्याचे सांगण्यात येते. कडक उन्हामुळे दुपारी तसेच रात्री उकाड्याचे प्रमाण वाढले आहे. मार्च हिट फेब्रु्रवारी महिन्यातच जाणवत असल्याचे चित्र आहे. यंदा जोरदार पावसामुळे उन्हाची तीव्रताही वाढेल असे जाणकार सांगतात.ग्रामीण भागात रुग्ण संख्या वाढत असली तरी प्राथमिक आरोय केंद्रात सुविधा मिळत नसल्याने बहुतांश ग्रामस्थ तसेच रुग्णांना खाजगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत. रुग्णालयांत वैद्यकीय अधिकारी अथवा औषधी नसते. याचा नाहक त्रास रुग्णांना सोसावा लागतो. अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)