शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

कचरा व्यवस्थापन प्रकल्पाला उद्योजकांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 23:42 IST

वाळूज उद्योगिकनगरीत बीओटी तत्वावर उभारण्यात आलेल्या कचऱ्यापासून बायोगॅस व खत निर्मिती प्रकल्पाला मंगळवार उद्योजक व एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली.

वाळूज महानगर : वाळूज उद्योगिकनगरीत बीओटी तत्वावर उभारण्यात आलेल्या कचऱ्यापासून बायोगॅस व खत निर्मिती प्रकल्पाला मंगळवार उद्योजक व एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. या प्रकल्पामुळे औद्योगिकनगरी व बजाजनगरातील कचºयाचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली निघाला आहे.

गतवर्षी एमआयडीसी प्रशासनाच्यावतीने इंदूरच्या महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीमार्फत वाळूज एमआयडीसीतील पी.१८३ या भूखंडावर बीओटी तत्वावर बायोगॅस व खत निर्मिती प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी कंपनीला ३ हेक्टर १८ गुंठे जमिन उपलब्ध करुन देण्यात आली. महिंद्रा कंपनीकडून १६ कोटी ७० लाख रुपये खर्च करुन हा अद्यावत प्रकल्प उभारण्यात आला आहे.

आठवडाभरापूर्वी हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला. एमआयडीसीचे अधीक्षक अभियंता सुधीर नागे, कार्यकारी अभियंता भुषण हर्षे, सहायक अभियंता सुधीर सुत्रावे, उद्योजक तथा एमईसीसीचे संस्थापक अध्यक्ष बी.एस.खोसे, मसिआचे अध्यक्ष किशोर राठी, सचिव गजानन देशमुख, ए.के.सेनगुप्ता, प्रितीश चर्टजी, एन.श्रीराम, अशोक काळे, रविंद्र कोंडेकर, एस.जी.मुंदडा, अंकुश लामतुरे, विजय साळवे, आर.एन.कुलकर्णी, वसंत वाघमारे, अजय गांधी आदींच्या शिष्टमंडळाने या प्रकल्पाला मंगळवारी भेट देऊन पाहणी केली. यावेळी महिंद्रा कंपनीचे सुंदर बाबु यांनी स्लाईड शोद्वारे या प्रकल्पाविषयी माहिती देऊन उद्योजकांच्या शंकाचे निरसन केले. प्रकल्पात कचºयापासून खत व सीएनजी गॅस निर्मिती करुन रास्त दरात त्याची विक्री केली जाणार असल्याचे कंपनीचे सुंदर बाबू यांनी सांगितले.

५० टन कचºयावर प्रक्रियाया प्रकल्पात दररोज परिसरातील ३१ टन कचºयावर प्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट कंपनीला दिले होते. मात्र, कंपनीकडून दररोज ४५ ते ५० टन कचºयावर प्रक्रिया केली जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. सध्या दररोज ७ ते ८ टन कचºयावर प्रक्रिया करुन बायोगॅसची निर्मिती केली जात आहे. पुढील महिन्यात पूर्ण क्षमतेने हा प्रकल्प कार्यान्वित केला जाणार असून या प्रकल्पामुळे जवळपास ५० जणांना रोजगार मिळाल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.

टॅग्स :WalujवाळूजWaluj MIDCवाळूज एमआयडीसी