शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

पालकांच्या चुकांमुळे हिरावला जीवनाचा आनंद..!

By admin | Updated: November 14, 2014 00:53 IST

कळंब : ‘‘ऊसवलं गणगोत सारं आधार कुणाचा न्हाई, भेगाळल्या भुईपरी जीनं अंगार जिवाला जाळी’’ या गुरू ठाकूरांच्या गितातील शब्दांतील

कळंब : ‘‘ऊसवलं गणगोत सारंआधार कुणाचा न्हाई,भेगाळल्या भुईपरी जीनंअंगार जिवाला जाळी’’या गुरू ठाकूरांच्या गितातील शब्दांतील वास्तविकता कळंब येथील सहारा एचआयव्हीग्रस्त मुलांच्या बालगृहातील निरागस बालकांच्या कहाणीवरून दिसून येते़ पालकांच्या चुकांमुळे बालपणीचे अपेक्षित सुख या बालकांकडून हिरावल्याचे दिसत असून, बालवयापासूनच अनाहूत ‘भोग’ भोगण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे़ ही संस्था बालकांच्या जीवनात आनंद देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करीत असली तरी बालपणाचा खरा आनंद त्यांच्या जीवनातून कधीच निघून गेल्याचे बालकांच्या निरागस चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर दिसून येते़आपल्या जन्मभूमीत बालपणीच्या सवंगड्यासोबत बागडावे, शिक्षणाचे धडे गिरवावेत़़ कुटुंबातील सदस्यांच्या मायेच्या पदाखाली सतत रहावे, असे कोणत्या बालकास वाटत नसेल ! बालपणीचा काळ या सुखाचा मानकरीच मानला जातो़ परंतु काहींना मात्र, या सुखापासून दुरावण्याची वेळ आली आहे़ कळंब येथे तुळजाई प्रतिष्ठान संचलित सहारा एचआयव्हीग्रस्त बालकांचे बालगृह २००८ पासून चालविले जात आहे़ या बालगृहात सध्या ४७ एचआयव्हीग्रस्त बालकांचा संभाळ करण्यात येत आहे़ विविध भागातून आलेल्या या बालकांचे वर्तमान आणि भविष्यकाळही एका अर्थाने मोठ्या संघर्षाचेच आहे़ पालकांच्या चुकांची शिक्षा भोगणाऱ्या बालकांचे घरपण दुरावले असून, बालपण बालगृहात घालवावे लागत आहे़ असे असले तरी ही संस्था अडचणींचा सामना करीत बालकांचे जीवन फुलविण्यासाठी प्रयत्न करीत आहे़ सामाजिक मदतीचा हात असला तरी तो ओघ वाढण्याची गरज व्यक्त होत आहे़ त्यामुळेच गुरू ठाकूर यांच्या ‘‘बळ दे झुंजायालाकिरपेची ढाल देकरपलं रान देवा, जळलं शिवारतरी न्हाई धीर सांडला़़ खेळ मांडला़़ खेळ मांडला़़’’ अशी स्थिती येथील बालकांची आहे़उपेक्षितांना मायेचा आधारयेथील बालगृहातील चिमुरड्यांना व्यक्तीगत आयुष्याचा लेखाजोखा घेण्याचा प्रयत्न केला तर अनेक दु:खदायक कथा समोर येतात़ कोणाला आई नाही़ कोणाला वडल नाही़़ तर काहींना आई-वडिलांचीही माहिती नाही़ अशा या आई-वडिलांचे छत्र हरविलेल्या उपेक्षितांना सहारा बालगृह मायेचा आधार देत आहे़४बालपण हरवलेल्या मुलांच्या चेहऱ्यावर हस्य निर्माण करण्यासाठी आणि लागणाऱ्या विविध साहित्याचा पुरवठा करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनीही पुढाकार घेतला आहे़ सण, उत्सव अथवा कौटुंबिक कार्यक्रम असला तरी अनेकजण सढळ हाताने येथील मुलांना मदत करतात़ रोटरीचेही प्रयत्न चांगले आहेत़ शिवाय इटकूर येथील प्रभाकर आडसूळ यांनी एका मुलीचे पालकत्त्व स्विकारले आहे़