शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

‘नॅक’ झालेल्यांनाच मिळणार वाढीव जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 01:31 IST

‘नॅक’ मूल्यांकन झालेल्या महाविद्यालयांनाच पदवी अभ्यासक्रमांच्या वाढीव जागा मंजूर करण्याचा निर्णय डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नुकत्याच झालेल्या विद्या परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे शटरमध्ये महाविद्यालये सुरू करून दुकानदारी करणारांच्या जागा घटणार असल्याचे स्पष्ट झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘नॅक’ मूल्यांकन झालेल्या महाविद्यालयांनाच पदवी अभ्यासक्रमांच्या वाढीव जागा मंजूर करण्याचा निर्णय डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नुकत्याच झालेल्या विद्या परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे शटरमध्ये महाविद्यालये सुरू करून दुकानदारी करणारांच्या जागा घटणार असल्याचे स्पष्ट झाले.विद्यापीठाच्या विद्या परिषदेच्या बैठकीत वाढीव जागांना मान्यता देण्याविषयी चर्चा करण्यात आली. ज्या महाविद्यालयांकडे पायाभूत सुविधा, प्राध्यापकांची उपलब्धता असेल, अशा महाविद्यालयांनाच पदवी अभ्यासक्रमात वाढीव जागा मंजूर करण्याची सूचना करण्यात आली. यावरून ‘नॅक’चा ‘अ’ दर्जा मिळालेल्या महाविद्यालयांमध्ये २० टक्के अतिरिक्त जागा भरण्यास मान्यता देण्याचा ठराव घेण्यात आला, तर ‘नॅक’चा ‘ब’, आणि ‘क’ दर्जा असलेल्या महाविद्यालयात १० टक्के जागा अतिरिक्त दिल्या जातील. यामुळे निव्वळ कागदोपत्री प्रवेश घेऊन परीक्षेलाच उपस्थिती दर्शविणाऱ्या महाविद्यालयांना वाढीव जागा देण्यात येणार नाही. याचा फटका मोठ्या प्रमाणात कायम विनाअनुदानित महाविद्यालयांना बसणार आहे. या नियमामुळे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या कायम विनाअनुदानित महाविद्यालयातील ९० टक्क्यांपेक्षा अधिक महाविद्यालयांतील जागा वाढणार नाहीत.प्रवेश वाढीतून लूटविद्यापीठाशी संलग्न असलेली अनेक कायम विनाअनुदानित महाविद्यालये छोट्याशा शटर असलेल्या खोल्यांमध्ये चालविली जातात. त्याठिकाणी केवळ प्रवेश देण्यात येतो. प्राध्यापकांच्या नेमणुका नसतात. मात्र एका तुकडीत १२० विद्यार्थी, असे तीन वर्षांचे एकूण ३६० विद्यार्थी आणि प्रत्येक वर्षी वाढीव मिळणारे ७२ असे एकूण ४३२ विद्यार्थी एका शाखेच्या पदवी अभ्यासक्रमासाठी असतात. कला, विज्ञान आणि वाणिज्य अशा तीन शाखांची विद्यार्थी संख्या १३०० पर्यंत पोहोचते. या सर्व विद्यार्थ्यांकडून सरासरी ४ हजार रुपये शैक्षणिक शुल्क वसूल केले जाते. यातून एका महाविद्यालयाचा वर्षभरात ५० लाख रुपयांपेक्षा अधिक निधी जमा होतो. यातील १० लाख रुपयांपर्यंत विद्यापीठाचे अधिकारी, संलग्नता समित्यांचे सदस्य आणि महाविद्यालयात तुटपुंजा मानधनावर नेमण्यात येणाºया कर्मचाºयांवर खर्च केले जातात. उर्वरित रक्कम संस्थाचालकांना राहते. मात्र, विद्या परिषदेच्या निर्णयामुळे अशा महाविद्यालयातील विद्यार्थी संख्या घटणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :universityविद्यापीठBambu Gardenबांबू गार्डन