शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

‘रंगतदार गाण्याची अखेर...’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:02 IST

औरंगाबादकरांना आणि त्याचप्रमाणे मराठवाड्यातील रसिकांना अनेक मोठमोठ्या कलाकारांना ऐकण्याची संधी केवळ नाथरावांमुळेच मिळू शकली. त्यांचा आणि माझा परिचय ...

औरंगाबादकरांना आणि त्याचप्रमाणे मराठवाड्यातील रसिकांना अनेक मोठमोठ्या कलाकारांना ऐकण्याची संधी केवळ नाथरावांमुळेच मिळू शकली.

त्यांचा आणि माझा परिचय १९७८ सालापासून आहे. कामाच्या निमित्ताने त्यांची नेहमीच भेट व्हायची. माझ्या अनेक संगीत रचनांना नाथरावांचा आवाज लाभला होता. अगदी उत्साहाने ते तेव्हा रेकॉर्डिंगला यायचे. एखाद्या विद्यार्थ्याप्रमाणे बसून सगळे गाणे समजून घ्यायचे आणि त्यांच्यातले सर्वोत्तम देऊन गायचे.

ते गायक तर होतेच; पण उत्तम रचनाकारही होते. अनेक बंदिशींचे काव्य आणि स्वररचना त्यांची स्वत:चीच असायची. ‘मितवा’ हे त्यांचे पुस्तकदेखील प्रसिद्ध झाले होते.

‘रंगतदार’ अशा शब्दांत नाथरावांच्या गाण्याचे वर्णन करता येईल. गाण्याने आणि बोलण्याने श्रोत्यांना खुश कसे करायचे, हे त्यांना चांगले माहीत होते. बोलण्यात अतिशय सहजता आणि गाण्यामध्ये लयकारी होती. उत्तम सरगम करून, रागाची प्रकृती सांभाळून तो अधिकाधिक रंजक करण्याकडे त्यांचा कल असायचा. स्वत:च्या रचना ते गायचेच; पण गुरू अण्णासाहेब गुंजकर यांच्याकडून मिळालेले ज्ञानही सादर करायचे.

अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी आजवर घडविले आहे. नुसते घडविलेच नाही, तर त्यांना नोकरीला लावून त्यांच्या पोटापाण्याची सोयही करून दिली आहे. गुरुकुल पद्धतीने ते विद्यार्थ्यांना शिकवायचे. अखेरपर्यंत नाथराव उत्साहमूर्तीच होते. गाण्याच्या कार्यक्रमासाठी निमंत्रण द्यायला गेले की, अतिशय उत्साहाने ते नक्की येतो, असे आवर्जून सांगायचे आणि यायचेही.

काही मंडळींनी पंच्याहत्तरीनिमित्त २०१९ साली माझा सत्कार केला होता आणि त्यात प्रमुख पाहुणे म्हणून नाथराव आले होते. ही माझी आणि त्यांची शेवटची भेट. त्यांच्या पत्नीचे निधन झाले तेव्हा मी नाथरावांसोबतच होतो. तेव्हाचे ते सगळे दु:ख त्यांनी गाण्यातून दाबले होते. हा त्यांचा मोठेपणा होता.

नाथरावांचा स्वभाव अत्यंत विनाेदी होता. ते गप्पांच्या मैफलीत आहेत आणि हशा निर्माण झाला नाही, असे कधीच झाले नाही. नाथरावांचे जाणे संगीत विश्वात मोठी पोकळी निर्माण करून गेले आहे. त्यांना आदरपूर्ण श्रद्धांजली.

-पं. विश्वनाथ ओक, संगीतकार