शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

पंढरपुरात अतिक्रमणांमुळे वाहनधारक व पादचाऱ्यांचा जीव टांगणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:02 IST

वाळूज महानगर : पंढरपुरात रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमणे झाल्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. फूटपाथबरोबरच अर्ध्या रस्त्यावर विविध व्यावसायिकांनी कब्जा केल्यामुळे ...

वाळूज महानगर : पंढरपुरात रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमणे झाल्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. फूटपाथबरोबरच अर्ध्या रस्त्यावर विविध व्यावसायिकांनी कब्जा केल्यामुळे वाहनधारक व पादचाऱ्यांना जीव मुठीत धरूनच ये-जा करावी लागत आहे.

जागतिक बँक प्रकल्पाच्यावतीने दशकभरापूर्वी औरंगाबाद-अहमदनगर या महामार्गाचे गोलवाडी फाटा ते वडाळापर्यंत चौपदरीकरण करण्यात आले आहे. या चौपदरीकरणामुळे सतत होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीतून वाहनधारकांची सुटकाही झाली होती. मात्र कालांतराने पंढरपुरात विविध व्यावसायिकांनी रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमणे करून व्यवसाय थाटले. आजघडीला या रस्त्याच्या दोन्ही बाजूने गॅरेज, हॉटेलचालक, हातगाडीवर व्यवसाय करणारे, कापड दुकानदार आदींसह विविध व्यावसायिकांनी अतिक्रमणे केल्यामुळे हा रस्ता अरुंद झाला आहे. हा प्रमुख महामार्ग असल्यामुळे या रस्त्यावर रात्रं-दिवस वाहनांची वर्दळ असते. मात्र रस्त्यावरील अतिक्रमणांमुळे ये-जा करणाऱ्या वाहनधारक व पादचाऱ्यांना जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत आहे. या अतिक्रमणांमुळे या महामार्गावर अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. अतिक्रमणे हटविण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायत व जागतिक बँक प्रकल्पाचे अधिकारीही कानाडोळा करीत असल्यामुळे अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. गुरुवारी दुपारी १ च्या सुमारास भरधाव ट्रकने दुचाकीस्वार दाम्पत्याला धडक दिली होती. मात्र नशीब बलवत्तर असल्याने दुचाकीस्वार दाम्पत्य बचावले. या अपघातानंतर ट्रकखाली अडकलेल्या दुचाकीला ट्रकचालकाने जवळपास ५० मीटरपर्यंत फरपटत नेले. या महामार्गावरील अतिक्रमणांकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याने अपघात वाढत असल्याची ओरड वाहनधारक व नागरिकांतून होत आहे.

१०० फुटाचा रस्ता; अतिक्रमणांमुळे झाला अरुंद

जागतिक बँक प्रकल्पाच्यावतीने दशकभरापूर्वी बीओटी तत्त्वावर या महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले. गोलवाडी फाट्यापासून वडाळ्यापर्यंत हा महामार्ग ३० मीटरचा (जवळपास १०० फूट) झालेला आहे. दुभाजकापासून प्रत्येकी १५ मीटरचा हा रस्ता असून दोन्ही बाजूने व्यावसायिकांनी अतिक्रमणे केली आहेत. विशेष म्हणजे पार्किंगसाठी ६ मीटरची जागा सोडलेली असून पार्किंगची जागाही व्यावसायिकांनी गिळंकृत केली आहे. या रस्त्यावरील फूटपाथही गायब असून मुख्य रस्त्यावर अनेकांनी व्यवसाय थाटल्यामुळे हा १०० फुटांचा रस्ता ७० फुटांचा उरला आहे. परिणामी रस्ता अरुंद झाल्याने या महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

प्रतिक्रिया...

अतिक्रमणे रोखण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची

अतिक्रमणे रोखण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे. ग्रामपंचायतीकडून अतिक्रमण धारकांना अभय दिले जात असल्यामुळे या रस्त्यावर दुतर्फा अतिक्रमणे झाली असून, अपघाताचा धोका बळावला आहे.

- एम. एन. कानडे (शाखा अभियंता, जागतिक बँक प्रकल्प)

------------

अतिक्रमण धारकांना नोटिसा बजावणार

पंढरपुरात अतिक्रमणांमुळे वाहतुकीची कोंडी होऊन अपघाताच्या घटना वाढत आहेत. मुख्य रस्त्यावर वाहने उभी करणारे दुकानदार तसेच अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायिकांना ग्रामपंचायतीकडून नोटिसा बजावून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

- हरिष आंधळे (ग्रामविकास अधिकारी, पंढरपूर)

फोटो ओळ

पंढरपुरात मुख्य रस्त्यावर अशाप्रकारे विविध व्यावसायिकांनी अतिक्रमणे केल्याने रस्ता अरुंद झाला असून अपघाताचा धोका वाढला आहे.