शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसीच्या भाजीमंडईवर अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 21:33 IST

एमआयडीसी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अनेकांनी भाजीमंडईवर अतिक्रमण केले आहे. अतिक्रमणामुळे भाजीमंडईच गायब झाल्याने विक्रेत्यांवर रस्त्यावर बसून व्यवसाय करण्याची वेळ आली आहे.

वाळूज महानगर: एमआयडीसी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अनेकांनी भाजीमंडईवर अतिक्रमण केले आहे. अतिक्रमणामुळे भाजीमंडईच गायब झाल्याने विक्रेत्यांवर रस्त्यावर बसून व्यवसाय करण्याची वेळ आली आहे.

बजाजनगर कामगार नागरी वसाहत अस्तित्वात आल्यावर एमआयडीसी प्रशासनाने भाजीमंडई उभारली. कामगार कल्याण भवन ते मोरे चौक जोडणाऱ्या रस्त्यावर उभारलेल्या भाजीमंईत एमआयडीसीने ओठे बांधून विक्रेत्यांना वाटप केले. दरम्यान, प्रशासनाने भाजीमंडईच्या विकासाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे भाजीमंडई धूळ खात आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे भाजीमंडईच्या जागेवर अनेकांनी अतिक्रमण केले आहे. अनेकजण तेथे झोपड्या बांधून वास्तव्य करीत आहेत. तर काहींनी शेड उभारुन व्यवसाय सुरु केला आहे.

एमआयडीसीच्या अधिकाºयांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. अतिक्रमण हटवून विक्रेत्यांसाठी जागा उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी भाजीपाला विक्रेत्यांमधून होत आहे. या विषयी एमआयडीसीचे अभियंता विनायक मुळे यांच्यशी संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

भाजीपाला विक्रेते रस्त्यावरएमआयडीसीच्या जागेवर अतिक्रमण झाल्याने भाजीपाला विक्रेते रस्त्यावर आले आहेत. हक्काची जागा गेल्याने व पर्यायी जागा उपलब्ध नसल्याने विक्रेत्यांना रस्त्यावर बसून व्यवसाय करावा लागत आहे. विक्रेते रस्त्यावर आल्याने रहदारीस अडथळा निर्माण होत असून, वाहतूक कोंडीच्या समस्येला नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे.

टॅग्स :Waluj MIDCवाळूज एमआयडीसी