गोविंद इंगळे , निलंगातालुक्यातील नागरिक विविध कामानिमित्ताने शहरात येत असतात़ परंतू, सुरक्षितरित्या मार्ग काढणे नागरिकांना कठीण झाले आहे़ शहरातील छत्रपती शिवाजी चौकाला अतिक्रमणाने विळखा घातला आहे़ त्यामुळे हा चौक कायमस्वरूपी अतिक्रमणमुक्त कधी होणार, असा सवाल शहरवासियांसह नागरिकांतून केला जात आहे़ शहरातील छत्रपती शिवाजी चौक परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे वाढली आहेत़ या चौकानजीक बसस्थानक असल्याने अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने चौक परिसरात थांबलेली असतात़ तसेच फळ विक्रेत्यांनीही याच परिसरात आपला व्यवसाय सुरू केला आहे़ बहुतांश फळ विक्रेते हे हातगाड्यावर व्यवसाय करीत आहेत़ बहुतांशवेळा फळ विक्रेते रस्त्यावरच थांबलेले असल्याचे पहावयास मिळत आहे़ या चौकातील अतिक्रमणाची कोंडी दूर व्हावी आणि वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून नगरपरिषदेने वारंवार अतिक्रमण हटाव मोहीम राबविली़ परंतू, राजकीय हस्तक्षेपामुळे ही अतिक्रमणे कायमस्वरूपी निघाली नाहीत़ शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांची गाडी आली की तेवढाच वेळ शिस्तीत कारभार सुरू होतो़ पण पोलिस गाडी गेली की पुन्हा जैसे थे परिस्थिती राहत आहे
नगर परिषदेने हटविलेली अतिक्रमणे पुन्हा जैसे थे
By admin | Updated: January 30, 2016 00:28 IST