शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

उद्घाटनापुरतेच उघडले हमीभाव खरेदी केंद्र !

By admin | Updated: May 15, 2017 23:50 IST

लातूर : तूर खरेदी केंद्राचे उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडताच उद्घाटकांबरोबर प्रमुख पाहुण्यांसह केंद्रावरील अधिकारीही भुर्र झाले.

हरी मोकाशे । लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : यंदा तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढल्याने बाजारपेठेत दर कोसळला. शेतकऱ्यांच्या तुरीला योग्य भाव मिळावा म्हणून शासनाच्या आदेशानुसार शहरात आधारभूत किंमत योजनेअंतर्गत तूर खरेदी केंद्राचे नियोजन करण्यात आले. सोमवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास केंद्राचे उत्साहात उद्घाटनही करण्यात आले. मात्र उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडताच उद्घाटकांबरोबर प्रमुख पाहुण्यांसह केंद्रावरील अधिकारीही भुर्र झाले. त्यामुळे तूर घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना ताटकळत थांबावे लागले आहे. गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमान झाल्याने तुरीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे बाजार समितीत तुरीची अपेक्षेपेक्षा जास्त आवक होऊ लागल्याने दर कोसळले. तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले. दरम्यान, या केंद्राची मुदत संपुष्टात आल्याने शासनाने पुन्हा मुदतवाढ दिली. तरीही आवक होत असल्याचे पाहून पुन्हा तूर खरेदीस मुदतवाढ दिली आहे. शासनाच्या आदेशानुसार शहरातील बाजार समितीतील गुळ मार्केट परिसरात आधारभूत किंमत योजनेअंतर्गत सोमवारपासून तूर खरेदी केंद्र सुरू होणार असल्याची माहिती शेतकऱ्यांना मिळाली. त्यामुळे रविवारी रात्रीपासूनच शेतकऱ्यांनी लातुरातील हमीभाव खरेदी केंद्रावर वाहनाद्वारे तूर आणण्यास सुरुवात केली. सोमवारी सकाळी १० वाजेपर्यंत हमीभाव खरेदी केंद्र सुरू झाले नसल्याने शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे विचारणा करण्यास सुरुवात केली. दरम्यान, सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास बाजार समिती परिसरात लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ललितभाई शहा यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन झाले. यावेळी उपसभापती मनोज पाटील, लालासाहेब देशमुख, ‘आत्मा’चे पाटील, बाजार समिती सचिव मधुकर गुंजकर यांच्यासह शेतकऱ्यांची उपस्थिती होती. उद्घाटन झाल्यानंतर तुरीचा मापतोल सुरू होईल, अशी शेतकऱ्यांना आशा होती. मात्र उद्घाटनाचा कार्यक्रम आटोपताच उद्घाटकांसोबत आलेले पाहुणे व केंद्राचे अधिकारीही भुर्र झाले. त्यामुळे रात्रीपासून ताटकळत थांबलेल्या जवळपास शंभरपेक्षा अधिक शेतकऱ्यांना धक्काच बसला. त्यामुळे आता जायचे कुणाकडे? असा सवाल तूर उत्पादकांसमोर निर्माण झाला. काही शेतकऱ्यांनी तर आपले वाहन बाजार समितीतील आडत्यांकडेच वळविल्याचे पहावयास मिळाले.