शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

‘स्मित’च्या माध्यमातून शेतकर्‍यांचे प्रबोधन

By admin | Updated: June 1, 2014 00:30 IST

अंबाजोगाई: निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकर्‍यांवर सातत्याने होणारे आघात. कोलमडणारी आर्थिक स्थिती. आत्महत्या यामुळे शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावरचे ‘स्मित’ हरवले आहे.

 अंबाजोगाई: निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकर्‍यांवर सातत्याने होणारे आघात. यामुळे शेतकर्‍यांची कोलमडणारी आर्थिक स्थिती. परिणामी, कर्जबाजारीपणमुळे होणार्‍या आत्महत्या यामुळे शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावरचे ‘स्मित’ हरवले आहे. हरवलेले हे स्मित पुन्हा त्यांच्या चेहर्‍यावर दिसावे यासाठी ज्ञानप्रबोधिनीच्या वतीने शेतकर्‍यांसाठी दिलासादायी उपक्रमांची अंमलबजावणी अंबाजोगाई तालुक्यातील १० खेड्यांमध्ये सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती पूर्णत: खालावली आहे. वाढती महागाई, रासायनिक खतांच्या वाढत्या किमती, बियाणांच्या वाढत्या किमती, तणनाशक, कीटकनाशक यांच्या किमती गगनाला भिडलेल्या असल्याने सामान्य शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. या स्थितीवर मात करण्यासाठी व शेतकर्‍यांना कमी खर्चात जास्त उत्पादन कसे काढता येईल? याबाबतच्या अनेक उपाययोजना तज्ञ शास्त्रज्ञ व कृषितज्ज्ञ यांच्या साह्याने आखण्यात आल्या आहेत. यात प्रामुख्याने पाण्याचे नियोजन, बियाणांची उपलब्धता, खरीपपूर्व शेतीचे नियोजन, मिश्र पिके घेणे, घरच्या बियाणांची उगवण क्षमता, तणनाशक व अंतर्गत मशागत, पेरणीपूर्व किडीचा बंदोबस्त, मनुष्यबळ व यंत्रशेतीचे नियोजन, कूपनलिकांचे पुनर्भरण अशा महत्त्वपूर्ण विषयांवर गावोगावी जनजागृती सुरू असून होणार्‍या शेतकरी मेळाव्यास डॉ. गुट्टे, दीपक देशपांडे यांच्यासह ज्ञानप्रबोधिनीचे समन्वयक प्रसाद चिक्षे हा उपक्रम राबवित आहेत. या उपक्रमाचा शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात लाभ होत आहे. हा उपक्रम घेतल्याने शेतकर्‍यांमधून समाधान व्यक्त होत आहे. (वार्ताहर) शेतकर्‍यांमध्ये समाधान १० खेड्यांमधील शेतकर्‍यांशी साधला थेट संवाद. तज्ज्ञ व्यक्तींंनी दिले शेतीविषयक मार्गदर्शन. शेतकर्‍यांसाठी मार्गदर्शन महत्त्वाचे. शेतकर्‍यांमधून होतेय समाधान व्यक्त. पावसाळ्यापूर्वी दिलेल्या प्रशिक्षणाचा होणार फायदा.