शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

‘स्मित’च्या माध्यमातून शेतकर्‍यांचे प्रबोधन

By admin | Updated: June 1, 2014 00:30 IST

अंबाजोगाई: निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकर्‍यांवर सातत्याने होणारे आघात. कोलमडणारी आर्थिक स्थिती. आत्महत्या यामुळे शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावरचे ‘स्मित’ हरवले आहे.

 अंबाजोगाई: निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकर्‍यांवर सातत्याने होणारे आघात. यामुळे शेतकर्‍यांची कोलमडणारी आर्थिक स्थिती. परिणामी, कर्जबाजारीपणमुळे होणार्‍या आत्महत्या यामुळे शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावरचे ‘स्मित’ हरवले आहे. हरवलेले हे स्मित पुन्हा त्यांच्या चेहर्‍यावर दिसावे यासाठी ज्ञानप्रबोधिनीच्या वतीने शेतकर्‍यांसाठी दिलासादायी उपक्रमांची अंमलबजावणी अंबाजोगाई तालुक्यातील १० खेड्यांमध्ये सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती पूर्णत: खालावली आहे. वाढती महागाई, रासायनिक खतांच्या वाढत्या किमती, बियाणांच्या वाढत्या किमती, तणनाशक, कीटकनाशक यांच्या किमती गगनाला भिडलेल्या असल्याने सामान्य शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. या स्थितीवर मात करण्यासाठी व शेतकर्‍यांना कमी खर्चात जास्त उत्पादन कसे काढता येईल? याबाबतच्या अनेक उपाययोजना तज्ञ शास्त्रज्ञ व कृषितज्ज्ञ यांच्या साह्याने आखण्यात आल्या आहेत. यात प्रामुख्याने पाण्याचे नियोजन, बियाणांची उपलब्धता, खरीपपूर्व शेतीचे नियोजन, मिश्र पिके घेणे, घरच्या बियाणांची उगवण क्षमता, तणनाशक व अंतर्गत मशागत, पेरणीपूर्व किडीचा बंदोबस्त, मनुष्यबळ व यंत्रशेतीचे नियोजन, कूपनलिकांचे पुनर्भरण अशा महत्त्वपूर्ण विषयांवर गावोगावी जनजागृती सुरू असून होणार्‍या शेतकरी मेळाव्यास डॉ. गुट्टे, दीपक देशपांडे यांच्यासह ज्ञानप्रबोधिनीचे समन्वयक प्रसाद चिक्षे हा उपक्रम राबवित आहेत. या उपक्रमाचा शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात लाभ होत आहे. हा उपक्रम घेतल्याने शेतकर्‍यांमधून समाधान व्यक्त होत आहे. (वार्ताहर) शेतकर्‍यांमध्ये समाधान १० खेड्यांमधील शेतकर्‍यांशी साधला थेट संवाद. तज्ज्ञ व्यक्तींंनी दिले शेतीविषयक मार्गदर्शन. शेतकर्‍यांसाठी मार्गदर्शन महत्त्वाचे. शेतकर्‍यांमधून होतेय समाधान व्यक्त. पावसाळ्यापूर्वी दिलेल्या प्रशिक्षणाचा होणार फायदा.