शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

कर्मचाऱ्यांनो ! तीन ते पाच आॅफिसमध्येच बसा...

By admin | Updated: January 28, 2015 00:57 IST

सोमनाथ खताळ , बीड आपल्या भागात आलेल्या अडीअडचणींची तक्रार करण्यासाठी पालिकेत गेल्यावर तक्रार ऐकण्यासाठी कोणीच हजर नसते, तसेच कर्मचारी कार्यालयात

सोमनाथ खताळ , बीडआपल्या भागात आलेल्या अडीअडचणींची तक्रार करण्यासाठी पालिकेत गेल्यावर तक्रार ऐकण्यासाठी कोणीच हजर नसते, तसेच कर्मचारी कार्यालयात बसण्याऐवजी इतरत्र टवाळक्या मारत फिरायचे, मात्र आता याला आळा बसणार आहे. दुपारी तीन ते पाच यावेळेत जर कर्मचाऱ्यांनी आॅफिस सोडले तर त्यांच्यावर थेट शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे सक्त आदेश मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग यांनी विभाग प्रमुखांना दिले आहेत.मागील काही दिवसांपासून पालीकेतील दांडीबहाद्दर व कामात हालगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. मुख्याधिकारी म्हणून भालसिंग यांनी सूत्रे स्वीकारली आणि पालिकेत शिस्त काय असते याचा नमूना कर्मचाऱ्यांना पहावयास मिळाला. यापूर्वी कर्मचाऱ्यांवर वरीष्ठांचा वचक नसल्याने कर्मचारी आपला मनमानी कारभार चालवायचे. मात्र आता भालसिंग यांनी दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांना चांगलाच दम दिला आहे.पालीकेच्या कामात गतिमानता यावी, शहरातील नागरीकांच्या तक्रारी जाणून घेत त्यांचा निपटारा व्हावा, या उद्देशाने मुख्याधिकाऱ्यांनी नवीन शक्कल लढवत पलाीकेतील कर्मचाऱ्यांनी दुपारच्यावेळेस आॅफिस सोडायचे नाही, असे सक्त आदेश दिले आहेत, त्याप्रमाणे प्रत्येक विभागाला तसे पत्रही पाठविले आहे. पत्र पाठवून त्यांची रिसिव्हड कॉपी घेतल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे पी.ए.पाटील यांनी सांगितले.आठवड्याचा अहवाल सोमवारी लेखी स्वरूपात द्याआठवड्यात किती नागरीकांच्या तक्रारी आल्या आणि त्यावर काय कारवाई केली, याचा अहवाल प्रत्येक सोमवारी कार्यालयास सादर करावा. तसेच नागरीकांच्या तक्रारी परस्पर वरीष्ठांकडे जातील, याची दक्षता घ्यावी, असे प्रत्येक विभागाला पाठविण्यात आलेल्या पत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे.यांना पाठविले पत्रनगररचनाकार, उपअभियंता पाणीपुरवठा विभाग, स्वच्छता विभाग प्रमुख, मलेरीया पर्यवेक्षक, सार्वजनीक बांधकाम, विद्युत अभियंता,कर अधिकारी यांना हे पत्र पाठविले असून असून मंगळवारी प्रत्येकाला हे पत्र मिळाले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.