शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

सुविधांअभावी कर्मचाऱ्यांचे ‘अग्निदिव्य’

By admin | Updated: May 8, 2017 00:16 IST

जालना : शहराची लोकसंख्या वाढत आहे. त्या तुलनेत पालिकेचा अग्निशमन दल म्हणावे तसे अद्ययावत झालाच नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहराची लोकसंख्या वाढत आहे. त्या तुलनेत पालिकेचा अग्निशमन दल म्हणावे तसे अद्ययावत झालाच नाही. परिणामी आग लागल्यास अग्निशमन विभागाची धांदल उडते. मनुष्यबळासाठी अनेक साधनांचा अभाव अग्निशमन विभागात दिसून येतो. पूर्वी राज्यशासनाच्या अखत्यारित अग्निशमन विभागा होता. त्यानंतर शासनाने १ सप्टेंबर १९८३ रोजी हा विभाग नगर परिषदेकडे वर्ग झाला. पालिकेकडे ३४ वर्षांपासून हा विभाग असला तरी यात अत्याधुनिक साधानांचा अभाव आहेच. सार्वजनिक तसेच खाजगी मिळून कोट्यवधी रूपयांची मालमत्ता वाचविण्याचे काम या विभागा करत असला तरी तोकड्या साहित्यामुळे विभागाचे कर्मचारी नेहमीच जीव धोक्यात घालून आग विझविण्याचे काम करतात.शहराची वाढत लोकसंख्या पाहता असणारे साहित्य कमी आहे. आज जे साहित्य उपलब्ध आहे. त्याच्या दुप्पट ते तिप्पट साहित्य असण्याची गरज कर्मचारी व्यक्त करतात. अग्निशमन दलाकडे तीन बंब आहेत. या बंबावरच शहरातील भिस्त आहे. आज रोजी शहराचा विस्तार पाहता पाच बंब असण्याची गरज आहे. फक्त २१ कर्मचारी आग विझविण्यासाठी तत्पर असतात. ही संख्या सुमारे ५० असण्याची गरज आहे. तीन शिफ्टमध्ये काम करताना तसेच काहींना सुटी घेताना अनेक अडचणी येतात. एकाच वेळी दोन ते तीन आगी लागल्यास अथवा मोठी आग लागल्यास मनुष्यबळ कमी पडते. शिवाय प्रशिक्षित मनुष्यबळ पालिकेने भरण्याची गरज आहे. अनेक दिवसांपासून येथे नवीन कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आलेली नाही.