शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

शिकविण्याऐवजी विद्यापीठाचा परीक्षावरच जोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:04 IST

औरंगाबाद : दोन सत्र परीक्षांमधील ९० दिवसांच्या अंतरात महाविद्यालये तसेच विद्यापीठ परिसरातील विभागांनी किती अभ्यासक्रम शिकवला, याचा ताळमेळ न ...

औरंगाबाद : दोन सत्र परीक्षांमधील ९० दिवसांच्या अंतरात महाविद्यालये तसेच विद्यापीठ परिसरातील विभागांनी किती अभ्यासक्रम शिकवला, याचा ताळमेळ न लावता विद्यापीठाचा परीक्षा घेण्यावरच जोर असल्याचे दिसत आहे. मे महिन्यात पहिल्या सहामाही परीक्षा आटोपल्यानंतर आता दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर २९ जुलैपासून दुसऱ्या सहामाही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत.

विद्यापीठाने दुसऱ्या सहामाही परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार बीए, बीएस्सी, बीकॉम या पारंपरिक पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय व तृतीय वर्षांच्या परीक्षा २९ जुलैपासून सुरू होतील, तर प्रथम वर्षाच्या परीक्षांना १० ऑगस्टपासून प्रारंभ होईल. सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा १७ ऑगस्ट आणि २० ऑगस्टपासून अभियांत्रिकी, फार्मसी, विधी या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत.

नियमानुसार दोन परीक्षांमध्ये कमीत कमी ९० दिवसांचे अंतर असावे लागते. या दिवसांत परीक्षेसाठी विहित केलेला विविध विद्याशाखांचा अभ्यासक्रम शिकवणे बंधनकारक असते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेेल्या दीड वर्षापासून विद्यापीठ आणि महाविद्यालयांचे वर्ग बंद आहेत. ऑनलाइन तासिकाद्वारे शिकविण्याचे प्राध्यापकांना आदेश आहेत; परंतु अनेकदा ग्रामीण भागात नेटवर्कची समस्या असल्यामुळे विद्यार्थी या तासिकांना प्रतिसाद देत नाही, असे कारण सांगितले जाते. काही मोठ्या संस्थांची महाविद्यालये सोडली, तर अनेक महाविद्यालये व विद्यापीठातील काही विभागांच्या तासिका कागदावरच दाखविल्या जातात. अभ्यासक्रम पूर्ण झालेला नसताना विद्यापीठाने परीक्षांची घाई केलेली आहे, असा आरोप ‘एसएफआय’ या विद्यार्थी संघटनेचे लोकेश कांबळे, ‘एनएसयूआय’चे नीलेश आंबेवाडीकर, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे प्रकाश इंगळे यांनी केला आहे.

चौकट.............

ऑनलाइन तासिकांचे रेकॉर्ड तपासले जाते

मिलिंद कला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली प्रधान यांनी सांगितले की, गेल्या वर्षापासून कोरोनामुळे शैक्षणिक क्षेत्र विस्कळीत झाले आहेत. महाविद्यालयांचे संपूर्ण वेळापत्रक यामुळे कोलमडले आहे. ते पूर्वपदावर आणण्यासाठी विद्यापीठामार्फत परीक्षा वेळेवर घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. महाविद्यालये बंद असल्यामुळे ऑनलाइन तासिका घेतल्या जात आहेत. प्राध्यापकांनी घेतलेल्या या तासिकांची पडताळणी केली जाते. या तासिकांमध्ये सहभागी विद्यार्थ्यांची हजेरी घेतली जाते. त्यासंबंधी काही व्हिडिओ क्लिपिंग देखील आम्ही तपासतो.