शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

अक्षय तृतीयेला ऑनलाईन खरेदीवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:04 IST

औरंगाबाद : लॉकडाऊन असला तरी शहरवासीयांनी ऑनलाईन खरेदीचा मुहूर्त साधला. दिवसभरात बांधकाम क्षेत्रात ५० कोटींची तर सोन्यात २ ...

औरंगाबाद : लॉकडाऊन असला तरी शहरवासीयांनी ऑनलाईन खरेदीचा मुहूर्त साधला. दिवसभरात बांधकाम क्षेत्रात ५० कोटींची तर सोन्यात २ कोटींची उलाढाल झाली.

साडेतीन मुहूर्तांपैकी एक संपूर्ण मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेला नावीन खरेदी केली जात असते. मात्र, लॉकडाऊनमुळे सर्व दुकाने बंद असल्याने ग्राहकांना बाजारपेठेत जाऊन प्रत्यक्ष खरेदी करता आली नाही. मात्र, मुहूर्त हुकू द्यायचा नाहीए असे मानणाऱ्या काही ग्राहकांनी ऑनलाईन खरेदी करत मुहूर्ताचे सोने केले. शहरात बड्या सुवर्णपेढीने ऑनलाईन सोने बुकिंगची सुविधा उपलब्ध करून दिली होती. मुहूर्तावर आजच्या भावात सोने खरेदी करा व ब्रेक द चेन संपल्यावर सोने घरी घेऊन जा, अशी ऑफर देण्यात आली होती. याचा फायदा काही ग्राहकानी घेतला. यासंदर्भात सराफा असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र मंडलिक यांनी सांगितले की, आज ४९,५०० रुपये प्रति १० ग्रॅम भाव होता. शहरात मोठ्या सुवर्ण पिढीत सुमारे २ कोटींचे सोने ऑनलाईन बुकिंग झाले. या ग्राहकांना लॉकडाऊन संपल्यानंतर आजच्या भावात सोने मिळेल. बाकी छोट्या व मध्यम स्वरूपाची दुकाने बंद होती.

बांधकाम क्षेत्रातही शुक्रवारी दिवसभरात ७० फ्लॅटची बुकिंग झाली. त्यातील २० फ्लॅटची बुकिंग ऑनलाईन झाली. यासंदर्भात क्रेडाईचे अध्यक्ष नितीन बगडीया यांनी सांगितले की, दरवर्षी अक्षय तृतीयेला शहरात २०० पेक्षा अधिक फ्लॅट, रोहाऊस बुक होत असतात. मात्र, यंदाही लॉकडाऊन असल्याने अनेकांना बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयापर्यंत येत आले नाही. मात्र, अशा परिस्थितीतही ७० फ्लॅट बुक होणे ही बांधकाम क्षेत्राच्या दृष्टीने समाधानाची बाब आहे.

यातील २० फ्लॅट ऑनलाईन बुक झाले हे विशेष. आज काही ग्राहकांनी अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधत नवीन घरात पूजन करून घेतले. लॉकडाऊन असल्याने घर शिफ्ट करता आले नाही. लॉकडाऊन उठल्यानंतर अनेक ग्राहक नवीन घरात शिफ्ट होतील.

चौकट

इलेक्ट्रॉनिक्स बाजारात शांतता

इलेक्ट्रॉनिक्स बाजारात टीव्ही, फ्रीज, एसी, वाशिंग मशीनची कोटींची उलाढाल होत असते पण लॉकडाऊनमुळे दुकाने उघडी नव्हती. गुढीपाडवा ते अक्षय तृतीयेदरम्यान दरवषी एकूण वर्षातील ४० टक्के उलाढाल होत असते. पण यंदा दुसऱ्या वर्षी याच काळात लॉकडाऊन आला, अशी माहिती पंकज अग्रवाल यांनी दिली.