राजेश खराडे , बीडग्रामीण भागात सुरळीत विद्युत पुरवठा करण्याच्या दृष्टीने राबविण्यात येत असलेल्या सिंगल फेज योजनेत तांत्रिक अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. सिंगलफेजच्या फिडरचा तुटवडा व दुरूस्ती कामात होत असलेल्या दिरंगाईमुळे काळाच्या ओघात योजनेचा उद्देश बाजूला राहत आहे. थ्री फेज मधून सबंध गावाला विद्युत पुरवठा शक्य नसल्याने घरगुती ग्राहकांच्या दृष्टीने गाव तिथे सिंगल फेजचे फिडर उभारण्याचा उपक्रम महावितरणने राबविला होता. यामधून किमान १८ तास विद्युत पुरवठा होत असल्याने घरगुती ग्राहकांचा प्रश्न काही प्रमाणात का होईना मार्गी होता. मात्र, योजना बंद होताच उतरती कळा लागली आहे. १५ व २५ के.व्ही. ची रोहित्रे उपलब्ध होत नाहीत शिवाय दुरूस्तीकरिता एजन्सी नेमलेल्या नसल्याने बिघडलेल्या अवस्थेतच रोहित्र जागी पडून आहेत. मध्यंतरीच्या वादळी वाऱ्याने या रोहित्रांचे मोठे नुकसान झाले आहे.ग्रामस्थांना पदरमोड करून रोहित्रांच्या वाहतूकीपासून दुरूस्तीपर्यंतची कामे करावी लागत आहेत. विभागातील रोहित्रांच्या दुरूस्तीकामाच्या निविदा देण्यात आल्या नव्हत्या शिवाय दुरूस्ती साहित्याचा पुरवठा होत नसल्याने ग्राहकांबरोबर विभागातील अधिकारी कर्मचारी हतबल झाले आहेत. नव्याने रोहित्रांचा पुरवठा बंद झाला असल्याने दुरूस्तीशिवाय पयार्य उरलेला नाही.२००५ साली सुरू झालेल्या सिंगलफेज योजनअंतर्गत ४ वर्षाच्या कालावधीत लोकसंख्येनुसार सिंगल फेजचे रोहित्र उभारण्यात आले होते.४योजना बंद झाल्यापासून नव्या राहित्रांचा पुरवठा बंद झाला आहे.४गेल्या सहा वर्षाच्या कालावधीत केवळ रोहित्रांची दुरूस्ती करून वापर केला जात आहे. काळाच्या ओघात योजना केवळ नावालाच राहत आहे. १५ व २५ के.व्ही च्या रोहित्रांना चांगली आर्थिंग मिळत नाही शिवाय न्युट्रल वॉल तुटवडा असल्याने बिघाडाचे प्रमाण अधिक आहे. दुरूस्तीशिवाय महिना- महिना रोहित्र जागेवरून पडून असल्याने ग्राहकांच्या तक्रारी वाढत आहे. अनेक वेळा अधिकारी आणि ग्राहकांमध्ये वाद निर्माण झाले आहेत.
सिंगल फेज योजनेचा बोजवारा
By admin | Updated: July 3, 2016 00:34 IST