शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

सिंगल फेज योजनेचा बोजवारा

By admin | Updated: July 3, 2016 00:34 IST

राजेश खराडे , बीड ग्रामीण भागात सुरळीत विद्युत पुरवठा करण्याच्या दृष्टीने राबविण्यात येत असलेल्या सिंगल फेज योजनेत तांत्रिक अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत

राजेश खराडे , बीडग्रामीण भागात सुरळीत विद्युत पुरवठा करण्याच्या दृष्टीने राबविण्यात येत असलेल्या सिंगल फेज योजनेत तांत्रिक अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. सिंगलफेजच्या फिडरचा तुटवडा व दुरूस्ती कामात होत असलेल्या दिरंगाईमुळे काळाच्या ओघात योजनेचा उद्देश बाजूला राहत आहे. थ्री फेज मधून सबंध गावाला विद्युत पुरवठा शक्य नसल्याने घरगुती ग्राहकांच्या दृष्टीने गाव तिथे सिंगल फेजचे फिडर उभारण्याचा उपक्रम महावितरणने राबविला होता. यामधून किमान १८ तास विद्युत पुरवठा होत असल्याने घरगुती ग्राहकांचा प्रश्न काही प्रमाणात का होईना मार्गी होता. मात्र, योजना बंद होताच उतरती कळा लागली आहे. १५ व २५ के.व्ही. ची रोहित्रे उपलब्ध होत नाहीत शिवाय दुरूस्तीकरिता एजन्सी नेमलेल्या नसल्याने बिघडलेल्या अवस्थेतच रोहित्र जागी पडून आहेत. मध्यंतरीच्या वादळी वाऱ्याने या रोहित्रांचे मोठे नुकसान झाले आहे.ग्रामस्थांना पदरमोड करून रोहित्रांच्या वाहतूकीपासून दुरूस्तीपर्यंतची कामे करावी लागत आहेत. विभागातील रोहित्रांच्या दुरूस्तीकामाच्या निविदा देण्यात आल्या नव्हत्या शिवाय दुरूस्ती साहित्याचा पुरवठा होत नसल्याने ग्राहकांबरोबर विभागातील अधिकारी कर्मचारी हतबल झाले आहेत. नव्याने रोहित्रांचा पुरवठा बंद झाला असल्याने दुरूस्तीशिवाय पयार्य उरलेला नाही.२००५ साली सुरू झालेल्या सिंगलफेज योजनअंतर्गत ४ वर्षाच्या कालावधीत लोकसंख्येनुसार सिंगल फेजचे रोहित्र उभारण्यात आले होते.४योजना बंद झाल्यापासून नव्या राहित्रांचा पुरवठा बंद झाला आहे.४गेल्या सहा वर्षाच्या कालावधीत केवळ रोहित्रांची दुरूस्ती करून वापर केला जात आहे. काळाच्या ओघात योजना केवळ नावालाच राहत आहे. १५ व २५ के.व्ही च्या रोहित्रांना चांगली आर्थिंग मिळत नाही शिवाय न्युट्रल वॉल तुटवडा असल्याने बिघाडाचे प्रमाण अधिक आहे. दुरूस्तीशिवाय महिना- महिना रोहित्र जागेवरून पडून असल्याने ग्राहकांच्या तक्रारी वाढत आहे. अनेक वेळा अधिकारी आणि ग्राहकांमध्ये वाद निर्माण झाले आहेत.