शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

पीककर्जासाठी मूल्यांकनात ‘प्रतीक्षे’ मुळे खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:04 IST

औरंगाबाद: जिल्ह्यातील शेतकरी पीककर्ज घेण्यासाठी मुद्रांक विभागाकडे जमिनीचे मूल्यांकन करण्यासाठी अर्ज करीत आहेत. परंतु मुद्रांक विभागातील ‘वेटींग’मुळे मूल्यांकन प्रत ...

औरंगाबाद: जिल्ह्यातील शेतकरी पीककर्ज घेण्यासाठी मुद्रांक विभागाकडे जमिनीचे मूल्यांकन करण्यासाठी अर्ज करीत आहेत. परंतु मुद्रांक विभागातील ‘वेटींग’मुळे मूल्यांकन प्रत शेतकऱ्यांना मिळण्यास विलंब होतो आहे. रोज ३०० हून अधिक शेतकऱ्यांचे अर्ज मुद्रांक विभागाकडे येत असून दिवसाआड ते अर्ज निकाली काढण्यात येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांची धावपळ होत आहे.

अर्ज तातडीने निकाली काढण्यात यावेत, अशी मागणी शेतकरी करीत असले तरी मुद्रांक विभागावर अतिरिक्त कामाचा ताण असल्यामुळे अर्जांचे ढीग लागत आहेत. खरीप हंगामाची लगबग सुरु आहे, मान्सूनचे आगमनही झाले आहे. त्यामुळे शेतकरी विविध कारणास्तव वित्तीय संस्थांकडून पीककर्ज घेण्यासाठी अर्ज करीत असतात. अर्जासोबत जमिनीचे मूल्यांकन प्रत सोबत जोडावी लागते. त्यानंतर बँकेतून कर्ज मिळण्याची प्रक्रिया पुढे जाते.

जिल्ह्यात १३ मुद्रांक कार्यालये आहेत. दररोज २५ ते ३० शेतकऱ्यांचे अर्ज कार्यालयांत येत आहेत. सदरील अर्ज दिवसाआड निकाली काढण्यात येत असून ते एका दिवसांत द्यावेत, अशी मागणी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे शेतकऱ्यांनी केली आहे.

शेतकऱ्याची तक्रार अशी

गोलटगांव येथील शेतकरी वर्षा सोळुंके यांनी बीड बायपास येथील मुद्रांक कार्यालयात मिळालेल्या वागणुकीप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. तसेच १०० रुपये अतिरिक्त शुल्क आकारले, मात्र त्याची पावती देखील दिली नाही. असेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. तेथील कर्मचाऱ्यांना रोज ७०० ते ८०० स्वाक्षऱ्या कराव्या लागतात. तुमचे एकट्याचेच काम नाही, असे सांगून कर्मचारी दालनाबाहेर निघून गेले. अशी तक्रार त्यांनी केली आहे.

जिल्हा मुद्रांक अधिकाऱ्यांची माहिती

जिल्हा मुद्रांक अधिकारी दीपक सोनवणे यांनी सांगितले, मूल्यांकन करून देण्यासाठी १ दिवसाचा कालावधी लागतो. मुद्रांक विभागातील कर्मचाऱ्यांना शक्य तितक्या लवकर अर्ज निकाली काढण्याबाबत सूचना केल्या आहेत. तक्रारकर्त्यांची मूल्यांकन प्रत वेळेत दिल्याचेही त्यांनी सांगितले.

कार्यालयाची माहिती अशी

बीड बायपास येथील मुद्रांक कार्यालयाचे उपनिबंधक क्षीरसागर यांनी सांगितले, कर्मचारी कमी आहेत. तालुक्यासह प्रभाग क्षेत्राचा भार कार्यालयावर आहे. त्यामुळे मूल्यांकन प्रत देण्यासाठी थोडाफार वेळ लागतो आहे.