शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
3
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
4
TikTok Ban: टिकटॉक खरंच भारतात पुन्हा सुरू होणार आहे का? केंद्र सरकारनेच दिलं उत्तर
5
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
6
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
7
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
8
Ganesh Chaturthi 2025: धर्मशास्त्रानुसार गणपती विसर्जनाचा योग्य दिवस कोणता? ते जाणून घ्या!
9
हरितालिका तृतीया २०२५: व्रत पूजेचे सगळे साहित्य घेतले ना, काही राहिले तर नाही? पाहा, यादी
10
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
11
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
12
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
13
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
14
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
15
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
16
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
17
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
18
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
19
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
20
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका

पीककर्जासाठी मूल्यांकनात ‘प्रतीक्षे’ मुळे खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:04 IST

औरंगाबाद: जिल्ह्यातील शेतकरी पीककर्ज घेण्यासाठी मुद्रांक विभागाकडे जमिनीचे मूल्यांकन करण्यासाठी अर्ज करीत आहेत. परंतु मुद्रांक विभागातील ‘वेटींग’मुळे मूल्यांकन प्रत ...

औरंगाबाद: जिल्ह्यातील शेतकरी पीककर्ज घेण्यासाठी मुद्रांक विभागाकडे जमिनीचे मूल्यांकन करण्यासाठी अर्ज करीत आहेत. परंतु मुद्रांक विभागातील ‘वेटींग’मुळे मूल्यांकन प्रत शेतकऱ्यांना मिळण्यास विलंब होतो आहे. रोज ३०० हून अधिक शेतकऱ्यांचे अर्ज मुद्रांक विभागाकडे येत असून दिवसाआड ते अर्ज निकाली काढण्यात येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांची धावपळ होत आहे.

अर्ज तातडीने निकाली काढण्यात यावेत, अशी मागणी शेतकरी करीत असले तरी मुद्रांक विभागावर अतिरिक्त कामाचा ताण असल्यामुळे अर्जांचे ढीग लागत आहेत. खरीप हंगामाची लगबग सुरु आहे, मान्सूनचे आगमनही झाले आहे. त्यामुळे शेतकरी विविध कारणास्तव वित्तीय संस्थांकडून पीककर्ज घेण्यासाठी अर्ज करीत असतात. अर्जासोबत जमिनीचे मूल्यांकन प्रत सोबत जोडावी लागते. त्यानंतर बँकेतून कर्ज मिळण्याची प्रक्रिया पुढे जाते.

जिल्ह्यात १३ मुद्रांक कार्यालये आहेत. दररोज २५ ते ३० शेतकऱ्यांचे अर्ज कार्यालयांत येत आहेत. सदरील अर्ज दिवसाआड निकाली काढण्यात येत असून ते एका दिवसांत द्यावेत, अशी मागणी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे शेतकऱ्यांनी केली आहे.

शेतकऱ्याची तक्रार अशी

गोलटगांव येथील शेतकरी वर्षा सोळुंके यांनी बीड बायपास येथील मुद्रांक कार्यालयात मिळालेल्या वागणुकीप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. तसेच १०० रुपये अतिरिक्त शुल्क आकारले, मात्र त्याची पावती देखील दिली नाही. असेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. तेथील कर्मचाऱ्यांना रोज ७०० ते ८०० स्वाक्षऱ्या कराव्या लागतात. तुमचे एकट्याचेच काम नाही, असे सांगून कर्मचारी दालनाबाहेर निघून गेले. अशी तक्रार त्यांनी केली आहे.

जिल्हा मुद्रांक अधिकाऱ्यांची माहिती

जिल्हा मुद्रांक अधिकारी दीपक सोनवणे यांनी सांगितले, मूल्यांकन करून देण्यासाठी १ दिवसाचा कालावधी लागतो. मुद्रांक विभागातील कर्मचाऱ्यांना शक्य तितक्या लवकर अर्ज निकाली काढण्याबाबत सूचना केल्या आहेत. तक्रारकर्त्यांची मूल्यांकन प्रत वेळेत दिल्याचेही त्यांनी सांगितले.

कार्यालयाची माहिती अशी

बीड बायपास येथील मुद्रांक कार्यालयाचे उपनिबंधक क्षीरसागर यांनी सांगितले, कर्मचारी कमी आहेत. तालुक्यासह प्रभाग क्षेत्राचा भार कार्यालयावर आहे. त्यामुळे मूल्यांकन प्रत देण्यासाठी थोडाफार वेळ लागतो आहे.