शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
6
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
7
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
8
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
9
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
10
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
11
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
12
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
13
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
14
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
15
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
16
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
17
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
18
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
19
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
20
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले

पाणीटंचाईला विजेचा अडसर

By admin | Updated: May 29, 2014 00:51 IST

भोकर : तालुक्यातील २२ गावांतील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी अधिग्रहण केले असले तरी यासाठी वीज असणे आवश्यक आहे़

भोकर : तालुक्यातील २२ गावांतील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी अधिग्रहण केले असले तरी यासाठी वीज असणे आवश्यक आहे़ पण अनेक गावांत वीज येण्याची ताळमेळ नाही़ २४ तासांपैकी केवळ ५ ते ६ तास येणार्‍या विजेवर ग्रामस्थांना पाण्याचे नियोजन करावे लागते़ यावेळी मिळेल तेवढ्या पाण्यावर समाधान मानावे लागते़ भोकर तालुक्यातील २३ गावांत पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत़ यापैकी कामनगाव येथे दोन वेळा टँकरने पाणीपुरवठा होत आहे़ तर बाकी गावांत विहीर अथवा बोअर अधिग्रहण करण्यात आले आहे़ अधिग्रहण केलेल्या बोअरहून पाणीपुरवठा होण्यासाठी विजेची आवश्यकता असते़ पण वीज केव्हा येईल व किती वेळ राहील, याची शाश्वती नसते़ पाकी व पाकीतांडा येथे भीषण पाणीटंचाई असून ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़ पाकी येथील एका हातपंपावर येणार्‍या अल्प पाण्यासाठी महिला ताटकळत थांबतात़ दिवशी बु़ तांड्यावर तर केवळ कधीमधी वीज येते़ या येणार्‍या विजेच्या आधारावर ग्रामस्थ पाण्याची नव्हे, तर अंघोळ करण्याचीही वाट पाहतात़ सोमठाणा आबादी येथे विहीर अधिग्रहण केले आहे, यासही विजेची वाट पहावी लागते़ मोखंडीतांडा येथील विद्युत रोहित्र गत दीड महिन्यांपासून बंद आहे़ यामुळे येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी सार्वजनिक बोअरचे पाणी मिळत नसल्याने ते इतरत्र पाण्यासाठी फिरत आहेत़ ३०० लोकसंख्या असलेल्या या तांड्यावर सिंगल फेज असल्याने लाईट चालू आहे़ पण दीड महिन्यापासून बोअर मात्र बंद आहे़ नसलपूर येथील अधिग्रहण केलेल्या बोअर सुद्धा विजेअभावी २४-२४ तास तास बंद असतो़ अन्य ठिकाणीही अशीच परिस्थिती आहे़ (वार्ताहर)