शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईला विजेचा अडसर

By admin | Updated: May 29, 2014 00:51 IST

भोकर : तालुक्यातील २२ गावांतील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी अधिग्रहण केले असले तरी यासाठी वीज असणे आवश्यक आहे़

भोकर : तालुक्यातील २२ गावांतील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी अधिग्रहण केले असले तरी यासाठी वीज असणे आवश्यक आहे़ पण अनेक गावांत वीज येण्याची ताळमेळ नाही़ २४ तासांपैकी केवळ ५ ते ६ तास येणार्‍या विजेवर ग्रामस्थांना पाण्याचे नियोजन करावे लागते़ यावेळी मिळेल तेवढ्या पाण्यावर समाधान मानावे लागते़ भोकर तालुक्यातील २३ गावांत पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत़ यापैकी कामनगाव येथे दोन वेळा टँकरने पाणीपुरवठा होत आहे़ तर बाकी गावांत विहीर अथवा बोअर अधिग्रहण करण्यात आले आहे़ अधिग्रहण केलेल्या बोअरहून पाणीपुरवठा होण्यासाठी विजेची आवश्यकता असते़ पण वीज केव्हा येईल व किती वेळ राहील, याची शाश्वती नसते़ पाकी व पाकीतांडा येथे भीषण पाणीटंचाई असून ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़ पाकी येथील एका हातपंपावर येणार्‍या अल्प पाण्यासाठी महिला ताटकळत थांबतात़ दिवशी बु़ तांड्यावर तर केवळ कधीमधी वीज येते़ या येणार्‍या विजेच्या आधारावर ग्रामस्थ पाण्याची नव्हे, तर अंघोळ करण्याचीही वाट पाहतात़ सोमठाणा आबादी येथे विहीर अधिग्रहण केले आहे, यासही विजेची वाट पहावी लागते़ मोखंडीतांडा येथील विद्युत रोहित्र गत दीड महिन्यांपासून बंद आहे़ यामुळे येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी सार्वजनिक बोअरचे पाणी मिळत नसल्याने ते इतरत्र पाण्यासाठी फिरत आहेत़ ३०० लोकसंख्या असलेल्या या तांड्यावर सिंगल फेज असल्याने लाईट चालू आहे़ पण दीड महिन्यापासून बोअर मात्र बंद आहे़ नसलपूर येथील अधिग्रहण केलेल्या बोअर सुद्धा विजेअभावी २४-२४ तास तास बंद असतो़ अन्य ठिकाणीही अशीच परिस्थिती आहे़ (वार्ताहर)