शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
3
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
4
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
5
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
6
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
7
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
8
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
9
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
10
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
11
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
12
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
13
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
15
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
16
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
17
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
18
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
19
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
20
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'

वीज नियामक आयोगाने केली जीटीएलची याचिका खारीज

By admin | Updated: June 13, 2014 01:11 IST

औरंगाबाद : वीज खरेदी करणाऱ्या जीटीएल कंपनीला ४ कोटी ७५ लाख रुपयांची एलबीटी भरण्याची नोटीस महानगरपालिकेने पाठविली.

औरंगाबाद : वीज खरेदी करणाऱ्या जीटीएल कंपनीला ४ कोटी ७५ लाख रुपयांची एलबीटी भरण्याची नोटीस महानगरपालिकेने पाठविली. ही एलबीटी शहरातील वीज ग्राहकांकडून वसूल करण्यात यावी, अशी याचिका जीटीएलने वीज नियामक आयोगाकडे दाखल केली होती; मात्र हे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे आयोगाने जीटीएलची याचिका खारीज केली आहे. महानगरपालिकेने जकात कर रद्द करून १ जुलै २०११ पासून एलबीटीची आकारणी सुरू केली. महावितरणकडून वीज खरेदी करून जीटीएल कंपनी महानगरपालिका हद्दीत वीज वितरण व वसुलीचे काम करीत आहे.या वीज खरेदीवर मनपाने एलबीटी आकारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २२ आॅक्टोबर २०१२ रोजी एलबीटीच्या थकबाकीपोटी ४ कोटी ७५ लाख ६५ हजार १४३ रुपये भरण्यासाठीची नोटीस जीटीएलला बजावली होती.याविरोधात जीटीएलने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने दिलेल्या अंतरिम आदेशानुसार जीटीएलला एलबीटी करापोटी १ कोटी २५ लाखाची रक्कम मनपात भरावी लागली. याच दरम्यान जीटीएलने आणखी एक याचिका वीज नियामक आयोगाकडे दाखल केली.यात मनपाने कंपनीकडून एलबीटी वसूल न करता थेट विद्युत ग्राहकांकडूनच वसूल करावी अशी मागणी करण्यात आली होती. आयोगात या याचिकेवर सुनावणी झाली.१० सप्टेंबर २०१३ रोजी महाराष्ट्र शासनाने जी. आर. काढला आहे. यानुसार विजेवर एलबीटी कर आकारण्यात येऊ नये, असे आदेश देण्यात आले आहेत. तसेच जीटीएलची याचिका उच्च न्यायालयातही प्रलंबित आहे.या दोन्हीचा विचार करून वीज नियामक आयोगाने जीटीएलची याचिका खारीज केली.आयोगाचे अध्यक्ष चंद्रा अय्यंगार व सदस्य विजय सोनवणे यांनी ७ एप्रिल २०१४ रोजी हा निकालदिला.