शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
4
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
5
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
6
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
7
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
8
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
9
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
10
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
11
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
12
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
13
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
14
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
15
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
16
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
17
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
18
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
19
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
20
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...

शहरात वीजचोरी वाढली!

By admin | Updated: July 25, 2016 00:36 IST

जालना : शहरात वीज चोरी रोखण्यासाठी तसेच रस्त्यावरील तारांचे जाळे कमी करण्यासाठी महावितरणने शहरातील विविध मार्गांवर भूमिगत केबल्स अंथरण्याची योजना आखली आहे.

जालना : शहरात वीज चोरी रोखण्यासाठी तसेच रस्त्यावरील तारांचे जाळे कमी करण्यासाठी महावितरणने शहरातील विविध मार्गांवर भूमिगत केबल्स अंथरण्याची योजना आखली आहे. वीज चोरी होत असलेल्या भागात इन्सुलेटर्स केबल लावण्यात येत आहे. मात्र, दोन्ही कामे संथगतीने होत असल्याने वीजचोरीचे प्रमाण वाढत आहे. याकडे महावितरणचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे. एपीडीआरपी या योजनेतून शहरातील गणपती विसर्जन मिरवणूक मार्ग तसेच वर्दळीच्या मार्गावर भूमिगत केबल अंथारण्यात येत आहे. तसेच इन्सुलेटर्स केबल टाकण्यासाठी कोट्यवधी रूपयांचे नियोजन करण्यात आले आहे. कन्हैयानगर, दु:खीनगर, नूतन वसाहत, लालबाग आदी परिसरातील काही भागांत इन्सुलेट केबल टाकण्यात आले आहे. मात्र, बहुतांश भागात अद्यापही ही केबल अंथरण्यात आलेली नाही. याचा फायदा काही वीजचोर घेत आहेत. नूतन वसाहत, चंदनझिरा, कन्हैयानगर, सुंदरनगर, लालबाग, रामनगर, गांधीनगर, संजय नगर, इंदिरानगर आदी भागात मोठ्या प्रमाणात वीजचोरी सुरू आहे. या वीजचोरीकडे महावितरणचे दुर्लक्ष होत आहे.साधारणपणे दिवसाकाठी ५ हजार युनिटपेक्षा जास्त वीजचोरी होत असल्याचा अंदाज महावितणचे अधिकारी व्यक्त करीत आहेत. पाच हजार युनिटमधून महावितरणचे दिवसाकाठी लाखो तर महिन्याकाठी कोट्यवधी रूपयांचे नुकसान होत आहे. ३०० युनिटपर्यंत ७ रूपये २१ पैसे प्रति युनिट तर ३०० ते ५०० युनिटपर्यंत ९.९५ रूपये, ५०१ ते १ हजार युनिटपर्यंत ११. ३१ रूपये तर १००० युनिटच्या पुढे १२.५ रूपये दर महावितरणकडून वसूल केले जातात.जालना शहरातील विविध भागात आकडे टाकून वीज चोरी वाढली आहे. विशेष म्हणजे चोवीस तास वीज चोरी होत असली तरी या प्रकाराकडे महाविरणचे दुर्लक्ष होत आहे. शहरातील नूतन वसाहत परिसरात रविवारी टिपलेले छायाचित्र.