शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

वीजबिल वसुली; शेतकरी कोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 00:39 IST

जिल्ह्यात महावितरणने ऐन रबी हंगामाच्या तोंडावरच शेतकºयांना खिंडीत पकडले आहे. पेरण्यांचा काळ असताना थकित बिलासाठी जोडण्या तोडल्याने शेतकरी कोमात गेला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात महावितरणने ऐन रबी हंगामाच्या तोंडावरच शेतकºयांना खिंडीत पकडले आहे. पेरण्यांचा काळ असताना थकित बिलासाठी जोडण्या तोडल्याने शेतकरी कोमात गेला आहे. हे गाºहाणे पुढाºयांकडे मांडले जात असल्याने तेही संतप्त असून एकप्रकारे शेतकºयांना नागवण्याचा हा प्रकार असल्याचे सांगितले जात आहे.यंदा आधीच पावसाळ्यात चांगले पर्जन्यमान झाले नाही. त्यामुळे सर्वाधिक पेरा असलेल्या सोयाबीनला याचा मोठा फटका बसला आहे. मालाला भाव नसल्याने शेतकºयांनी त्याची विक्रीही केली नाही. मात्र महावितरणने डीपी जळालेल्या गावातील शेतकºयांना चालू तीन व नवीन तीन असे सहा हजारांचे बिल भरणे सक्तीचे केल्याने शेतकरी हवालदिल आहे. त्यामुळे जिल्हाभर ओरड सुरू झाली आहे. काही ठिकाणी विविध पक्ष आंदोलकात्मक पवित्र्यात आहेत.आज आ.संतोष टारफे यांनी महावितरणच्या कार्यालयात जाऊन भेट दिली. कार्यकारी अभियंता शांतीलाल चौधरी यांच्याशी चर्चा केली. तर कृषीपंपांचे भारनियमन तत्काळ बंद करा, शेतकºयांच्या वीज जोडण्या तोडणे बंद करा, योग्य दाबाचा व सुरळीत वीजपुरवठा करा, नवीन डीपी उपलब्ध करून देण्यास विलंब करू नका, अशी मागणी करणारे निवेदन दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, गयबाराव नाईक, विनायक देशमुख, श्यामराव जगताप, बापूराव बांगर, भागोराव राठोड, संजय राठोड, डॉ.माणिक देशमुख, सुनील दुबे, विलास गोरे आदींची उपस्थिती होती.