शहरं
Join us  
Trending Stories
1
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
2
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
3
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
4
१७ वर्षीय आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; पण फिफ्टी आड आला माफाका
5
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
6
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
7
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
8
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
9
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
10
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
11
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
12
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
13
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
14
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
15
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
16
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
17
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
18
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
19
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
20
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...

दिवाळीच्या मुहूर्तावर वीज बिल वाढीचा झटका

By admin | Updated: October 22, 2014 01:20 IST

औरंगाबाद : महावितरण आणि जीटीएलने मिळून ऐन दिवाळी सणाच्या मुहूर्तावर शहरातील नागरिकांना वीज बिल वाढीचा जोरदार झटका दिला आहे.

औरंगाबाद : महावितरण आणि जीटीएलने मिळून ऐन दिवाळी सणाच्या मुहूर्तावर शहरातील नागरिकांना वीज बिल वाढीचा जोरदार झटका दिला आहे. त्यामुळे वीज बिल वाढवून येणार हे निश्चित झाले आहे. त्याचा भुर्दंड वीज ग्राहकांना सहन करावा लागणार आहे.शहराच्या हद्दीत महापालिकेकडून एलबीटी लावण्यात येते. महापालिकेच्या थकलेल्या स्थानिक संस्था कर (एलबीटी) वसुलीचा वाद सुरू होता. त्यामुळे १ एप्रिल २०१२ ते १० सप्टेंबर २०१३ या कालावधीतील एलबीटी थकली आहे. महापालिकेचे एलबीटीपोटी १२ कोटी रुपये जीटीएलकडे थकले आहेत. नुकतीच महावितरणने जीटीएलला स्थानिक संस्था कर वसुलीची परवानगी दिली आहे. त्यामुळे १ एप्रिल २०१२ ते १० सप्टेंबर २०१३ या कालावधीतील थकलेली एलबीटी दिवाळीच्या मुहूर्तापासून वसूल करण्यात येणार आहे. आॅक्टोबरनंतरचे वीज बिल दोन टक्के वाढवून येणार आहे. १७ महिन्यांत वीज ग्राहकांकडून एलबीटीच्या माध्यमातून कोट्यवधींची वसुली होणार आहे. महावितरण आणि जीटीएलने संयुक्तपणे दिवाळीच्या ‘गोड’ दिवसांमध्ये नागरिकांना भुर्दंड करण्याचा हा ‘कडू’ निर्णय घेतला आहे. एलबीटी वसुलीचा रखडलेला निर्णय ऐन सणाच्या मुहूर्तावर का घेतला, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. वसुली पुढे सुरू राहणार महापालिकेच्या हद्दीतील वीज ग्राहकांकडून पुढील १७ महिने एलबीटी वसूल करण्यात येणार आहे. प्रत्येक महिन्याच्या एकूण वीज बिलामध्ये दोन टक्के बिल वाढवून येणार आहे. थकलेल्या एलबीटीची वसुली १७ महिन्यांत न झाल्यास वसुली पुढे सुरू राहणार आहे, असे महावितरणने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकामध्ये म्हटले आहे.