शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक चिन्हात फळभाज्यांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:04 IST

पाचोड : जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, सोमवारी माघारीनंतर खऱ्या अर्थाने निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. यंदा निवडणूक ...

पाचोड : जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, सोमवारी माघारीनंतर खऱ्या अर्थाने निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. यंदा निवडणूक आयोगाने उमेदवारांना निवडणूक चिन्हे देण्याच्या दृष्टीने फळभाज्यांचा वापर केल्याने अनेकांना अशी चिन्हे मिळणार आहेत. गावनिहाय अनेकांनी आपली नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. अनेक गावांत दोन, तर काही ठिकाणी तीन पॅनलमध्ये निवडणूक रंगणार आहे.

पाचोड गावासह परिसरातील पाचोड खुर्द, मुरमा, कोळीबोडखा, लिंबगाव, रांजणगाव दांडगा, आडगाव जावळे, आंतरवाली खांडी, आदी गावांत ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. यासाठी अनेक गावांतील मंडळी काही उमेदवारांना गळ टाकून त्यांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी यासाठी प्रयत्नशील आहेत. माघारीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार असून, निवडणूक आयोगाने निवडणुकीसाठी चिन्हेसुद्धा जाहीर केली आहेत. विजयी होण्यासाठी चिन्हेसुद्धा अनेक वेळा महत्त्वाची असल्याने याकडे उमेदवारांचे लक्ष आहे. या निवडणुकीत आयोगाने भाजीपाला, फळे, गृहोपयोगी वस्तू, खाद्यपदार्थ, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, सौंदर्य प्रसाधने, घरगुती साहित्यांसह सफरचंद, कलिंगड, द्राक्ष, ढोबळी मिरची, मका, हिरवी मिरची, शिवण यंत्र, विविध फळे व फळभाज्या उमेदवारांची चिन्हे असणार आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या या आखाड्यात ४ जानेवारी रोजी उमेदवारांना आपला अर्ज परत घेता येणार आहे. निवडणूक आयोगाकडून रिंगणात असलेल्या उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात येईल. यानंतर खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात होईल. उमेदवारांना आपला प्रचार करताना अख्खी भाजी मंडई, फळे, घरगुती वापराच्या साहित्यांवर मतदान करण्याचे आवाहन करावे लागणार आहे. पैठण तालुका प्रशासनाने ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी जोरात सुरू केली आहे. तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी शनिवारी सकाळी पाचोडला भेट देत निवडणूक होत असलेल्या गावांत प्रशासनाचे अधिक लक्ष राहणार असल्याचे स्पष्ट केले. यासाठी विविध पथके तयार करण्यात आली असून, उमेदवारांसह नागरिकांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.