शहरं
Join us  
Trending Stories
1
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
2
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
3
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
4
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
5
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
7
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
8
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
9
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
10
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
11
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
12
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
13
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
14
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
15
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
16
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
17
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
18
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
19
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
20
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च

मतदानादिवशीच गावात लागणार निकाल

By admin | Updated: February 1, 2015 00:50 IST

बाळासाहेब जाधव, लातूर स्थानिक पातळीवरील मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे

बाळासाहेब जाधव, लातूरस्थानिक पातळीवरील मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. जिल्ह्यातील ४१० गावांत प्रभाग निहाय कागदपत्रांची जमवाजमव करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे़ या आरक्षणासंदर्भात हरकत दावे दाखल करण्यासाठीचा कालावधी ५ फेब्रुवारी पर्यंत ठेवण्यात आल्याने राजकीय रणधुमाळीला वेग आला आहे़ २०११ च्या जनगणनेनुसार एससी, एसटी, ओबीसी प्रवर्गनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले असून, या आरक्षणामध्ये ५० टक्के सहभाग महिला उमेदवारांना देण्यात येणार आहे़ स्थानिक स्तरावर मिनी मंत्रालय ओळखल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला आजही विशेष महत्त्व आहे़ २०१५ मध्ये ४१० गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुका घेण्यात येणार आहेत़ यामध्ये लातूर तालुक्यातील ६४ गावे, रेणापूर-२९, औसा-४५, निलंगा-४८, उदगीर-६१, अहमदपूर-४९, चाकूर-२४, देवणी-३५, शिरुर अनंतपाळ-२७, जळकोट-२८ असा एकूण ४१० ग्रामपंचायतीचे प्रभाग निहाय आरक्षण जाहीर करण्यात आले आहे़ या आरक्षणाबाबत दावे हरकती दाखल करण्याचा कालावधी २८ जानेवारी ते ५ फेब्रुवारी २०१५ पर्यंत ठेवण्यात आला आहे़ याबाबत जिल्हाधिकारी पांडुरंग पोले हे ९ फेब्रुवारीपर्यंत या हरकती बाबत निर्णय देणार आहेत़ १३ फेब्रुवारी रोजी (अ) यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे़ आणि या यादीनुसारच ग्रामविकास विभागाला या संबंधीची माहिती देण्यात येणार आहे़ ४लातूर जिल्ह्यातील ७८८ ग्रामपंचायती आहेत़ त्यापैकी पहिल्या टप्प्यात २०१५ मध्ये ४१० ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत़ दुसऱ्या टप्प्यात २०१६ मध्ये १०, तिसऱ्या टप्प्यात २०१७ मध्ये ३५५, चौथ्या टप्प्यात २०१८ मध्ये १० तर पाचव्या टप्प्यात २०१९ साली ३ अशा एकूण ७८८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत़ ५ वर्षे पूर्ण झालेल्या ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे़ त्या अनुषंगाने प्रशासन कामाला लागले आहे़ प्रभाग आरक्षणाची सोडत सुरू असून यावर दावा, हरकती मागविण्याचे काम सुरू आहे़ ३१ जानेवारीपर्यंत ३ गावच्या हरकती आल्या आहेत़ ५ फेब्रुवारीपर्यंत हरकती स्वीकारल्या जाणार आहेत़ ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये यापूर्वीच्या निवडणुकीत ३३ टक्के महिलांना संधी देण्याचे नियोजन करण्यात आले होते़ यामध्ये निवडणूक विभागाने बदल करुन ग्रामस्तरावरही महिला उमेदवारांना ५० टक्के संधी देण्यात येणार आहे़ त्यामुळे अनेक गावांमधे महिला बहूल ग्रामपंचायती होणार असल्याचे मत सामान्य प्रशासनाचे उपजिल्हाधिकारी डॉ़ अनंत गव्हाणे यांनी व्यक्त केले़ लातूर तालुक्यातील काडगाव मधून कृष्णनगर ही स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण झाली असून, या ग्रामपंचायतीची पहिल्यांदाच निवडणूक होत आहे़ लातूर जिल्ह्यातील ४१० गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे आरक्षण जाहीर करण्यात आले़ निवडणुकीच्या चर्चेला उधान आले आहे़ निवडणूक प्रक्रियेमध्ये गतवर्षीच्या प्रमाणापेक्षा कमालीचे बदल करण्यात आले असून, ग्रामपंचायतीचे निकाल लांबणीवर पडण्याऐवजी मतदानादिवशीच लागणार आहेत़ त्यामुळे निवडणूक निकाल प्रक्रियेवरील वाढता खर्च टाळला जाणार आहे़ प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत झाल्यामुळे आता गावातील चित्र स्पष्ट झाले आहे़ त्यामुळे इच्छुक कार्यकर्ते कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात आतापासूनच कामाला लागले आहे़ सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत झाल्यावर पुन्हा गावांगावांमध्ये निवडणुकीची रंगत वाढणार आहे़ शिवाय, पहिल्यांदाच मतदानाची वेळ पूर्ण झाल्यावर गावातच निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार असल्याने गावकऱ्यांना उत्सुकता लागली आहे़