शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
Daily Top 2Weekly Top 5

मी पाहिलेली निवडणूक...तेव्हा प्रचारात कधीही जात-धर्म निघाली नाही 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 12:51 IST

१९७७ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत जनता पक्षाचे उमेदवार डॉ. बापूसाहेब काळदाते यांनी विजय मिळविला.

पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केल्यामुळे जनतेत प्रचंड रोष होता. देशभरातील विरोधी पक्ष एकत्र आले होते. १९७७ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत जनता पक्षाचे उमेदवार डॉ. बापूसाहेब काळदाते यांनी विजय मिळविला. या निवडणुकीत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासह त्यांच्या पक्षाची धुळधाण उडाली. ही निवडणूक मला आठवते.

इंदिरा गांधी यांचा पराभव करून १९७७ साली मोरारजी देसाई पंतप्रधान  बनले. मात्र, त्यांचे खिचडी सरकार अल्पायुषी आणि लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरले. यातच या सरकारचा शेवट १९८० साली झाला. इंदिरा गांधी यांनी पराभवानंतर राष्ट्रीय काँग्रेसऐवजी इंदिरा (आय) काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती. आय काँग्रेसकडून काझी सलीम यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्याविरोधात एस काँग्रेसचे साहेबराव पाटील डोणगावकर होते. या दोघांमध्ये चुरशीची लढत झाली. दोघेही धर्मनिरपेक्ष विचारसरणीचे होते. प्रचारात दोन्ही गटांकडून एकदाही जात, धर्म काढण्यात आला नाही.  दोघेही कॉर्नर बैठका घेत प्रचार करीत. छोट्या-छोट्या सभांसह मतदारांच्या भेटीगाठी घेण्यावरच भर होता. त्यात कोणत्याही प्रकारचा अभिनिवेश नव्हता. ही निवडणूक काझी सलीम यांनी जिंकली. डोणगावकरांचा पराभव झाला. 

१९८४ साली लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. तेव्हा राज्य सरकारमध्ये मंत्री असलेले अब्दुल अझीम यांना आय काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली. एस काँग्रेसकडून पुन्हा साहेबराव पाटील डोणगावकर यांना तिकीट मिळाले. याच निवडणुकीत अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तान आणि जोगेंद्र कवाडे यांनी स्थापन केलेल्या दलित मुस्लिम अल्पसंख्याक सुरक्षा महासंघ पक्षाकडून राज्यात एकमेव उमेदवार देण्यात आला. या उमेदवाराचे नाव खलील जाहेद, असे होते. राज्यात कोठेही उमेदवार न दिल्यामुळे औरंगाबादेतच कशासाठी उमेदवार दिला, अशी चर्चा तेव्हा केली जात होती.

काँग्रेसमधील एका गटानेच मताचे विभाजन होण्यासाठी हाजी मस्तान यांना गळ घातल्याचे त्यांनी माझ्याशी केलेल्या चर्चेत सांगितल्याचे आठवते. यात मुस्लिम मताचे विभाजन झाले. साहेबराव पाटील डोणगावकर हेसुद्धा धर्मनिरपेक्ष भूमिका घेणारे होते. मात्र, मुस्लिम मतांमध्ये फूट पडत असताना त्यांनीही हिंदू मते स्वत:कडे वळविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. औरंगाबादच्या इतिहासात हिंदू-मुस्लिम अशी जात-धर्माच्या नावावर पहिल्यांदाच ही निवडणूक झाली. यात साहेबराव पाटील डोणगावकर यांना विजय मिळाला. मंत्री असताना अब्दुल अझीम यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतरही ते सत्ता असेपर्यंत मंत्रीपदावर कायम होते.

पुढे औरंगाबादेत शिवसेनेचा प्रभाव वाढू लागला. मोरेश्वर सावे यांनी एका भागात पाणी कमी येते म्हणून पालिकेच्या उपायुक्तांना काळे फासले.  हे प्रकरण  राज्यभर गाजले. या घटनेनंतर १९८८ साली झालेल्या महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत शिवसेनेने हिंदू धर्माच्या नावावर जोरदार मुसंडी मारत ६० पैकी २९ नगरसेवक निवडून आणले. काँग्रेस, मुस्लिम लीग आणि आरपीआय या तीन पक्षांचे ३१ नगरसेवक निवडून आले होते. काँग्रेसचा महापौर बनला. मुस्लिम लीगकडून मला उपमहापौर म्हणून संधी मिळाली. त्या निवडणुकीवर शिवसेनेने बहिष्कार टाकला होता. सेनेच्या नगरसेवकांनी मतदानपेटी उचलून नेली होता. तेव्हापासून  हिंदू-मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणाचे राजकारण सुरू आहे.

( शब्दांकन : राम शिनगारे )

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादPoliticsराजकारण