शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

मी पाहिलेली निवडणूक...तेव्हा प्रचारात कधीही जात-धर्म निघाली नाही 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 12:51 IST

१९७७ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत जनता पक्षाचे उमेदवार डॉ. बापूसाहेब काळदाते यांनी विजय मिळविला.

पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केल्यामुळे जनतेत प्रचंड रोष होता. देशभरातील विरोधी पक्ष एकत्र आले होते. १९७७ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत जनता पक्षाचे उमेदवार डॉ. बापूसाहेब काळदाते यांनी विजय मिळविला. या निवडणुकीत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासह त्यांच्या पक्षाची धुळधाण उडाली. ही निवडणूक मला आठवते.

इंदिरा गांधी यांचा पराभव करून १९७७ साली मोरारजी देसाई पंतप्रधान  बनले. मात्र, त्यांचे खिचडी सरकार अल्पायुषी आणि लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरले. यातच या सरकारचा शेवट १९८० साली झाला. इंदिरा गांधी यांनी पराभवानंतर राष्ट्रीय काँग्रेसऐवजी इंदिरा (आय) काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती. आय काँग्रेसकडून काझी सलीम यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्याविरोधात एस काँग्रेसचे साहेबराव पाटील डोणगावकर होते. या दोघांमध्ये चुरशीची लढत झाली. दोघेही धर्मनिरपेक्ष विचारसरणीचे होते. प्रचारात दोन्ही गटांकडून एकदाही जात, धर्म काढण्यात आला नाही.  दोघेही कॉर्नर बैठका घेत प्रचार करीत. छोट्या-छोट्या सभांसह मतदारांच्या भेटीगाठी घेण्यावरच भर होता. त्यात कोणत्याही प्रकारचा अभिनिवेश नव्हता. ही निवडणूक काझी सलीम यांनी जिंकली. डोणगावकरांचा पराभव झाला. 

१९८४ साली लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. तेव्हा राज्य सरकारमध्ये मंत्री असलेले अब्दुल अझीम यांना आय काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली. एस काँग्रेसकडून पुन्हा साहेबराव पाटील डोणगावकर यांना तिकीट मिळाले. याच निवडणुकीत अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तान आणि जोगेंद्र कवाडे यांनी स्थापन केलेल्या दलित मुस्लिम अल्पसंख्याक सुरक्षा महासंघ पक्षाकडून राज्यात एकमेव उमेदवार देण्यात आला. या उमेदवाराचे नाव खलील जाहेद, असे होते. राज्यात कोठेही उमेदवार न दिल्यामुळे औरंगाबादेतच कशासाठी उमेदवार दिला, अशी चर्चा तेव्हा केली जात होती.

काँग्रेसमधील एका गटानेच मताचे विभाजन होण्यासाठी हाजी मस्तान यांना गळ घातल्याचे त्यांनी माझ्याशी केलेल्या चर्चेत सांगितल्याचे आठवते. यात मुस्लिम मताचे विभाजन झाले. साहेबराव पाटील डोणगावकर हेसुद्धा धर्मनिरपेक्ष भूमिका घेणारे होते. मात्र, मुस्लिम मतांमध्ये फूट पडत असताना त्यांनीही हिंदू मते स्वत:कडे वळविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. औरंगाबादच्या इतिहासात हिंदू-मुस्लिम अशी जात-धर्माच्या नावावर पहिल्यांदाच ही निवडणूक झाली. यात साहेबराव पाटील डोणगावकर यांना विजय मिळाला. मंत्री असताना अब्दुल अझीम यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतरही ते सत्ता असेपर्यंत मंत्रीपदावर कायम होते.

पुढे औरंगाबादेत शिवसेनेचा प्रभाव वाढू लागला. मोरेश्वर सावे यांनी एका भागात पाणी कमी येते म्हणून पालिकेच्या उपायुक्तांना काळे फासले.  हे प्रकरण  राज्यभर गाजले. या घटनेनंतर १९८८ साली झालेल्या महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत शिवसेनेने हिंदू धर्माच्या नावावर जोरदार मुसंडी मारत ६० पैकी २९ नगरसेवक निवडून आणले. काँग्रेस, मुस्लिम लीग आणि आरपीआय या तीन पक्षांचे ३१ नगरसेवक निवडून आले होते. काँग्रेसचा महापौर बनला. मुस्लिम लीगकडून मला उपमहापौर म्हणून संधी मिळाली. त्या निवडणुकीवर शिवसेनेने बहिष्कार टाकला होता. सेनेच्या नगरसेवकांनी मतदानपेटी उचलून नेली होता. तेव्हापासून  हिंदू-मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणाचे राजकारण सुरू आहे.

( शब्दांकन : राम शिनगारे )

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादPoliticsराजकारण