शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

मी पाहिलेली निवडणूक...तेव्हा प्रचारात कधीही जात-धर्म निघाली नाही 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 12:51 IST

१९७७ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत जनता पक्षाचे उमेदवार डॉ. बापूसाहेब काळदाते यांनी विजय मिळविला.

पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केल्यामुळे जनतेत प्रचंड रोष होता. देशभरातील विरोधी पक्ष एकत्र आले होते. १९७७ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत जनता पक्षाचे उमेदवार डॉ. बापूसाहेब काळदाते यांनी विजय मिळविला. या निवडणुकीत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासह त्यांच्या पक्षाची धुळधाण उडाली. ही निवडणूक मला आठवते.

इंदिरा गांधी यांचा पराभव करून १९७७ साली मोरारजी देसाई पंतप्रधान  बनले. मात्र, त्यांचे खिचडी सरकार अल्पायुषी आणि लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरले. यातच या सरकारचा शेवट १९८० साली झाला. इंदिरा गांधी यांनी पराभवानंतर राष्ट्रीय काँग्रेसऐवजी इंदिरा (आय) काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती. आय काँग्रेसकडून काझी सलीम यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्याविरोधात एस काँग्रेसचे साहेबराव पाटील डोणगावकर होते. या दोघांमध्ये चुरशीची लढत झाली. दोघेही धर्मनिरपेक्ष विचारसरणीचे होते. प्रचारात दोन्ही गटांकडून एकदाही जात, धर्म काढण्यात आला नाही.  दोघेही कॉर्नर बैठका घेत प्रचार करीत. छोट्या-छोट्या सभांसह मतदारांच्या भेटीगाठी घेण्यावरच भर होता. त्यात कोणत्याही प्रकारचा अभिनिवेश नव्हता. ही निवडणूक काझी सलीम यांनी जिंकली. डोणगावकरांचा पराभव झाला. 

१९८४ साली लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. तेव्हा राज्य सरकारमध्ये मंत्री असलेले अब्दुल अझीम यांना आय काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली. एस काँग्रेसकडून पुन्हा साहेबराव पाटील डोणगावकर यांना तिकीट मिळाले. याच निवडणुकीत अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तान आणि जोगेंद्र कवाडे यांनी स्थापन केलेल्या दलित मुस्लिम अल्पसंख्याक सुरक्षा महासंघ पक्षाकडून राज्यात एकमेव उमेदवार देण्यात आला. या उमेदवाराचे नाव खलील जाहेद, असे होते. राज्यात कोठेही उमेदवार न दिल्यामुळे औरंगाबादेतच कशासाठी उमेदवार दिला, अशी चर्चा तेव्हा केली जात होती.

काँग्रेसमधील एका गटानेच मताचे विभाजन होण्यासाठी हाजी मस्तान यांना गळ घातल्याचे त्यांनी माझ्याशी केलेल्या चर्चेत सांगितल्याचे आठवते. यात मुस्लिम मताचे विभाजन झाले. साहेबराव पाटील डोणगावकर हेसुद्धा धर्मनिरपेक्ष भूमिका घेणारे होते. मात्र, मुस्लिम मतांमध्ये फूट पडत असताना त्यांनीही हिंदू मते स्वत:कडे वळविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. औरंगाबादच्या इतिहासात हिंदू-मुस्लिम अशी जात-धर्माच्या नावावर पहिल्यांदाच ही निवडणूक झाली. यात साहेबराव पाटील डोणगावकर यांना विजय मिळाला. मंत्री असताना अब्दुल अझीम यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतरही ते सत्ता असेपर्यंत मंत्रीपदावर कायम होते.

पुढे औरंगाबादेत शिवसेनेचा प्रभाव वाढू लागला. मोरेश्वर सावे यांनी एका भागात पाणी कमी येते म्हणून पालिकेच्या उपायुक्तांना काळे फासले.  हे प्रकरण  राज्यभर गाजले. या घटनेनंतर १९८८ साली झालेल्या महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत शिवसेनेने हिंदू धर्माच्या नावावर जोरदार मुसंडी मारत ६० पैकी २९ नगरसेवक निवडून आणले. काँग्रेस, मुस्लिम लीग आणि आरपीआय या तीन पक्षांचे ३१ नगरसेवक निवडून आले होते. काँग्रेसचा महापौर बनला. मुस्लिम लीगकडून मला उपमहापौर म्हणून संधी मिळाली. त्या निवडणुकीवर शिवसेनेने बहिष्कार टाकला होता. सेनेच्या नगरसेवकांनी मतदानपेटी उचलून नेली होता. तेव्हापासून  हिंदू-मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणाचे राजकारण सुरू आहे.

( शब्दांकन : राम शिनगारे )

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादPoliticsराजकारण