शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

सोशल मीडियावरही निवडणूक विभागाची नजर

By admin | Updated: September 15, 2014 00:41 IST

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीदरम्यान निवडणूक विभागाकडून सोशल मीडियावरही बारीक नजर ठेवली जाणार आहे.

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीदरम्यान निवडणूक विभागाकडून सोशल मीडियावरही बारीक नजर ठेवली जाणार आहे. सोशल साईटस्वरील पोस्टमध्ये आदर्श आचारसंहितेचा भंग किंवा कुणाचे चारित्र्यहनन होते का हे निवडणूक शाखेकडून तपासले जाणार आहे. तसेच कोणतीही आॅडिओ, व्हिज्युअल जाहिरात सोशल साईटस्वर टाकायची असेल तर आधी निवडणूक विभागाकडून प्रमाणित करून घ्यावी लागणार आहे. राज्यात शुक्रवारपासून विधानसभेची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे प्रचाराच्या काळात कुठे आचारसंहितेचा भंग होतो का यावर आयोगाचे लक्ष असणार आहे. त्यासाठी आचारसंहिता सेल स्थापन करण्यात आला आहे. या निवडणुकीत फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, टिष्ट्वटर यासारख्या सोशल साईटस्चा प्रचारादरम्यान उमेदवारांकडून वापर होणार आहे. त्यामुळे निवडणूक विभाग सोशल साईटस्वरही बारीक नजर ठेवणार आहे. उमेदवारांना सोशल साईटस्चा वापर करता येणार असला तरी त्याबाबतही आयोगाने काही नियम ठरवून दिले आहेत. उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी शशिकांत हदगल यांनी सांगितले की, सोशल मीडियासंदर्भात सायबर लॉ हा स्वतंत्र कायदा आहेच. त्याअंतर्गत कुठेही कायद्याचा भंग झाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल. कुणाचे चारित्र्यहनन करणे किंवा कुणाची बदनामी करणे हा गुन्हा आहे. त्यामुळे प्रत्येकाने सोशल साईटस्वर पोस्ट टाकताना याची काळजी घ्यावी. याशिवाय उमेदवार किंवा त्यांच्या समर्थकांना सोशल साईटस्वर आॅडिओ, व्हिज्युअल जाहिराती टाकायच्या असतील तर त्याआधी प्रमाणित करून घ्याव्या लागणार आहेत. निवडणूक शाखेकडून प्रमाणित न करता अशी जाहिरात सोशल साईटस्वर टाकल्यास आचारसंहितेचा भंग समजला जाईल. तसे आढळून आल्यास संबंधितांवर गुन्हा नोंदविला जाईल.