शहरं
Join us  
Trending Stories
1
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
2
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
3
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
4
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
5
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
6
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
7
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
8
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
9
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
10
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
11
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
12
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
13
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
14
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
15
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
16
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
17
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
18
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
19
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
20
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन

सोशल मीडियावरही निवडणूक विभागाची नजर

By admin | Updated: September 15, 2014 00:41 IST

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीदरम्यान निवडणूक विभागाकडून सोशल मीडियावरही बारीक नजर ठेवली जाणार आहे.

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीदरम्यान निवडणूक विभागाकडून सोशल मीडियावरही बारीक नजर ठेवली जाणार आहे. सोशल साईटस्वरील पोस्टमध्ये आदर्श आचारसंहितेचा भंग किंवा कुणाचे चारित्र्यहनन होते का हे निवडणूक शाखेकडून तपासले जाणार आहे. तसेच कोणतीही आॅडिओ, व्हिज्युअल जाहिरात सोशल साईटस्वर टाकायची असेल तर आधी निवडणूक विभागाकडून प्रमाणित करून घ्यावी लागणार आहे. राज्यात शुक्रवारपासून विधानसभेची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे प्रचाराच्या काळात कुठे आचारसंहितेचा भंग होतो का यावर आयोगाचे लक्ष असणार आहे. त्यासाठी आचारसंहिता सेल स्थापन करण्यात आला आहे. या निवडणुकीत फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, टिष्ट्वटर यासारख्या सोशल साईटस्चा प्रचारादरम्यान उमेदवारांकडून वापर होणार आहे. त्यामुळे निवडणूक विभाग सोशल साईटस्वरही बारीक नजर ठेवणार आहे. उमेदवारांना सोशल साईटस्चा वापर करता येणार असला तरी त्याबाबतही आयोगाने काही नियम ठरवून दिले आहेत. उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी शशिकांत हदगल यांनी सांगितले की, सोशल मीडियासंदर्भात सायबर लॉ हा स्वतंत्र कायदा आहेच. त्याअंतर्गत कुठेही कायद्याचा भंग झाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल. कुणाचे चारित्र्यहनन करणे किंवा कुणाची बदनामी करणे हा गुन्हा आहे. त्यामुळे प्रत्येकाने सोशल साईटस्वर पोस्ट टाकताना याची काळजी घ्यावी. याशिवाय उमेदवार किंवा त्यांच्या समर्थकांना सोशल साईटस्वर आॅडिओ, व्हिज्युअल जाहिराती टाकायच्या असतील तर त्याआधी प्रमाणित करून घ्याव्या लागणार आहेत. निवडणूक शाखेकडून प्रमाणित न करता अशी जाहिरात सोशल साईटस्वर टाकल्यास आचारसंहितेचा भंग समजला जाईल. तसे आढळून आल्यास संबंधितांवर गुन्हा नोंदविला जाईल.