शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक आयोगाने औरंगाबाद लोकसभेचा निकाल देण्यास लावले १६ तास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 15:35 IST

सकाळी ६ वाजेपासून पोलिसांसह सर्व प्रशासकीय यंत्रणा रात्री १२ वाजेपर्यंत मतमोजणी केंद्रात ताटकळली होती. 

औरंगाबाद : लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीला १६ तास लावले. निवडणूक निर्णय अधिकारी आणि निरीक्षकांमध्ये फेरीनिहाय मतमोजणीचा निकाल देण्यात एकमत होत नसल्यामुळे उशीर होत गेला. राज्यासह मराठवाड्यातील सर्व निकाल जाहीर झालेले असताना औरंगाबाद लोकसभा मतमोजणीचा निकाल मात्र उशिरा लागला. सकाळी ६ वाजेपासून पोलिसांसह सर्व प्रशासकीय यंत्रणा रात्री १२ वाजेपर्यंत मतमोजणी केंद्रात ताटकळली होती. 

२६ फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण होणार, असे जाहीर करण्यात आले होते. मात्र, २७ फेऱ्याअंती निकाल जाहीर करावा लागला. वैजापूर तालुक्यातील एक ईव्हीएममधील मतमोजणीस रात्री ११ वाजविण्यात आले. तोपर्यंत मतदारसंघातील सर्व उमेदवारांनी मतमोजणी केंद्र सोडले होते. काही मतमोजणी प्रतिनिधी तेथे होते. टपाली मतदान, ३० मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅट मतमोजणीला उशीर झाला. 

१२ वाजेपर्यंत अंतिम निकाल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देता आला नाही. २७ फेरीतील १ हजार ४८ मतदान वैजापूरमधील एका ईव्हीएमचे होते, असे सांगण्यात आले. मात्र, हे मतदान मोजण्यास उशीर का झाला, याचे स्पष्टीकरण प्रशासनाला देता आले नाही. झालेल्या मतदानानुसार २६ फेऱ्या ठरल्या होत्या. मात्र, २७ मतमोजणी फेऱ्या कशासाठी घेण्यात आल्या, हेदेखील प्रशासनाने सांगितले नाही.

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल