शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
5
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
6
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
7
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
8
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
9
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
12
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
13
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
14
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
15
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
16
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
17
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
18
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
20
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?

कृउबा निवडणुका‘कलेक्टर’कडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 00:15 IST

कृषी उत्पन्न बाजार समित्या ग्रामीण भागातील आर्थिक उलाढालीचे मोठे केंद्र बनल्या आहेत. या बाजार समित्यांवर ताबा मिळविण्यासाठी सर्व पक्ष प्रतिष्ठा पणाला लावतात. यामुळे कृउबाच्या निवडणुकीलाही जिल्हा परिषद, महानगरपालिकेच्या निवडणुकीइतके महत्त्व प्राप्त झाले आहे. यामुळेच आता कृउबाच्या यापुढील सर्व निवडणुका जिल्हाधिकाºयांच्या नियंत्रणात होणार आहेत.

ठळक मुद्देऔरंगाबाद जिल्ह्यात १० बाजार समित्या : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कृषी उत्पन्न बाजार समित्या ग्रामीण भागातील आर्थिक उलाढालीचे मोठे केंद्र बनल्या आहेत. या बाजार समित्यांवर ताबा मिळविण्यासाठी सर्व पक्ष प्रतिष्ठा पणाला लावतात. यामुळे कृउबाच्या निवडणुकीलाही जिल्हा परिषद, महानगरपालिकेच्या निवडणुकीइतके महत्त्व प्राप्त झाले आहे. यामुळेच आता कृउबाच्या यापुढील सर्व निवडणुका जिल्हाधिकाºयांच्या नियंत्रणात होणार आहेत.राज्यात ३०७ कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात १० कृउबा आहेत. यात औरंगाबाद, कन्नड, खुलताबाद, गंगापूर, पैठण, फुलंब्री, लासूर स्टेशन, वैजापूर, सिल्लोड, सोयगाव यांचा समावेश होतो.पूर्वी जिल्हा उपनिबंधकांच्या (सहकार) देखरेखीखाली कृउबाच्या निवडणुका होत असत; मात्र आता महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास विनियमन) अधिनियम, १९६३ च्या कलम १३, कलम १४ आणि १४-अ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. या अधिनियमाच्या कलम ११ नुसार कृउबाच्या सभापती आणि उपसभापतींसह अन्य सदस्यांच्या समितीचे गठण केले जाते.या बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी नवीन मतदार याद्यांचे अधीक्षण, संचालन, नियंत्रणाचे आणि निवडणुका घेण्याचे काम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून केले जाते.प्राधिकरणाची क्षेत्रिय यंत्रणा म्हणून जिल्हाधिकाºयांची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्हास्तरावर जिल्हाधिकाºयांकडे तलाठ्यापर्यंतची महसुली यंत्रणा काम करीत असते. त्यामुळे या यंत्रणेचा बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये उपयोग होऊ शके ल. या निर्णयामधून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला मात्र वगळण्यात आले आहे.२ वर्षांचा अवधीजाधववाडी येथील कृउबा समितीच्या सध्याच्या लोकनियुक्त संचालक मंडळाचा कार्यकाळ ५ आॅगस्ट २०२० मध्ये संपणार आहे. त्यानंतर डिसेंबरच्या आत निवडणुका होतील.आता शेतकºयांना मतदानाचा अधिकारकृउबा समितीच्या संचालक मंडळ निवडीचा अधिकार आता शेतकºयांना देण्यात आला आहे. यामुळे बाजार समितीच्या क्षेत्रातील शेतकºयांना ‘मतदाना’चा हक्क प्राप्त झाला आहे. ज्यांचे वय १८ वर्षे पूर्ण झालेले, १० गुंठे जमीन असलेला शेतकरी बाजार समितीचा मतदार होऊ शकतो. संबंधित बाजार समितीमध्ये त्याने पाच वर्षांतून किमान तीन वेळा व्यवहार केलेले असणे अपेक्षित आहे. या मतदारांची प्रारूप मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू आहे.