शहरं
Join us  
Trending Stories
1
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
2
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
3
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
4
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
5
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
6
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
7
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
8
धुळ्यात भरचौकात गोळीबार करत मुंबईतील ज्वेलर्सच्याय कर्मचाऱ्यांकडून लाखोंचे सोने लुटले
9
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
10
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
11
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
12
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
13
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
14
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
15
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
16
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
17
VIDEO: कॉलर पकडली, डोक्यावर फाईट मारली.. भिवंडीत टेम्पोचालक व पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी
18
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
19
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
20
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक

कृउबा निवडणुका‘कलेक्टर’कडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 00:15 IST

कृषी उत्पन्न बाजार समित्या ग्रामीण भागातील आर्थिक उलाढालीचे मोठे केंद्र बनल्या आहेत. या बाजार समित्यांवर ताबा मिळविण्यासाठी सर्व पक्ष प्रतिष्ठा पणाला लावतात. यामुळे कृउबाच्या निवडणुकीलाही जिल्हा परिषद, महानगरपालिकेच्या निवडणुकीइतके महत्त्व प्राप्त झाले आहे. यामुळेच आता कृउबाच्या यापुढील सर्व निवडणुका जिल्हाधिकाºयांच्या नियंत्रणात होणार आहेत.

ठळक मुद्देऔरंगाबाद जिल्ह्यात १० बाजार समित्या : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कृषी उत्पन्न बाजार समित्या ग्रामीण भागातील आर्थिक उलाढालीचे मोठे केंद्र बनल्या आहेत. या बाजार समित्यांवर ताबा मिळविण्यासाठी सर्व पक्ष प्रतिष्ठा पणाला लावतात. यामुळे कृउबाच्या निवडणुकीलाही जिल्हा परिषद, महानगरपालिकेच्या निवडणुकीइतके महत्त्व प्राप्त झाले आहे. यामुळेच आता कृउबाच्या यापुढील सर्व निवडणुका जिल्हाधिकाºयांच्या नियंत्रणात होणार आहेत.राज्यात ३०७ कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात १० कृउबा आहेत. यात औरंगाबाद, कन्नड, खुलताबाद, गंगापूर, पैठण, फुलंब्री, लासूर स्टेशन, वैजापूर, सिल्लोड, सोयगाव यांचा समावेश होतो.पूर्वी जिल्हा उपनिबंधकांच्या (सहकार) देखरेखीखाली कृउबाच्या निवडणुका होत असत; मात्र आता महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास विनियमन) अधिनियम, १९६३ च्या कलम १३, कलम १४ आणि १४-अ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. या अधिनियमाच्या कलम ११ नुसार कृउबाच्या सभापती आणि उपसभापतींसह अन्य सदस्यांच्या समितीचे गठण केले जाते.या बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी नवीन मतदार याद्यांचे अधीक्षण, संचालन, नियंत्रणाचे आणि निवडणुका घेण्याचे काम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून केले जाते.प्राधिकरणाची क्षेत्रिय यंत्रणा म्हणून जिल्हाधिकाºयांची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्हास्तरावर जिल्हाधिकाºयांकडे तलाठ्यापर्यंतची महसुली यंत्रणा काम करीत असते. त्यामुळे या यंत्रणेचा बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये उपयोग होऊ शके ल. या निर्णयामधून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला मात्र वगळण्यात आले आहे.२ वर्षांचा अवधीजाधववाडी येथील कृउबा समितीच्या सध्याच्या लोकनियुक्त संचालक मंडळाचा कार्यकाळ ५ आॅगस्ट २०२० मध्ये संपणार आहे. त्यानंतर डिसेंबरच्या आत निवडणुका होतील.आता शेतकºयांना मतदानाचा अधिकारकृउबा समितीच्या संचालक मंडळ निवडीचा अधिकार आता शेतकºयांना देण्यात आला आहे. यामुळे बाजार समितीच्या क्षेत्रातील शेतकºयांना ‘मतदाना’चा हक्क प्राप्त झाला आहे. ज्यांचे वय १८ वर्षे पूर्ण झालेले, १० गुंठे जमीन असलेला शेतकरी बाजार समितीचा मतदार होऊ शकतो. संबंधित बाजार समितीमध्ये त्याने पाच वर्षांतून किमान तीन वेळा व्यवहार केलेले असणे अपेक्षित आहे. या मतदारांची प्रारूप मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू आहे.