शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

एकजुटीनं पेटलं रानं, तुफान आलंया...!

By admin | Updated: February 21, 2017 22:59 IST

उस्मानाबाद : दुष्काळग्रस्त शिक्का पुसण्यासाठी वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून गावा-गावात चुरस निर्माण झाली आहे़

उस्मानाबाद : दुष्काळग्रस्त शिक्का पुसण्यासाठी वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून गावा-गावात चुरस निर्माण झाली आहे़ लोकसहभागातून पाणलोटाची कामे करण्यासाठी ग्रामस्थांनीही पुढाकार घेतल्याचे चित्र परंड्यासह कळंब आणि भूम तालुक्यात दिसून येत आहे़ या स्पर्धेत या तीन तालुक्यातील २४२ गावांचा समावेश आहे़‘सत्यमेव जयते’ या मालिकेच्या माध्यमातून सत्यजीत भटकळ या निर्मात्याने सद्यस्थितीतील समाजासमोर असलेले अनेक प्रश्नांची मांडणी केली़ विशेष म्हणजे अमिर खान या मालिकेचा केंद्रबिंदू होता़ त्याच्या लोकप्रियतेमुळे या मालिकेबरोबरच या मालिकेच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नावरही गांभिर्याने चर्चा सुरू झाली़ लोकांचा प्रतिसाद पाहून भटकळ यांच्याबरोबरच अमिर खान यांनीही हा विषय पुढे घेऊन जाण्याचे निश्चित केले़ त्यातूनच पाणी फाऊंडेशनची स्थापना झाली़ अमिर खान सोबत त्यांची पत्नी किरण रॉय ही या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असून, या संस्थेने मागील वर्षी अमरावती, सातारा आणि बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाणलोटाचे काम हाती घेतले़ बीडमध्ये अंबाजोगाई, साताऱ्यात कोरेगाव तर अमरावतीतील वरूड तालुक्यात श्रमदानातून पाणलोट विकास, माथा ते पायथा अशी कामे करण्यात आली़ तब्बल ११६ गावात पाणलोटाची कामे करून घेण्यात या फाऊंडेशनला यश आले़यावर्षी या फाऊंडेशनने मराठवाड्यातील दहा तालुक्यांसह राज्यातील तीस तालुक्यात याच पध्दतीने कामे करण्याचा संकल्प केला़ यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील दहा, विदर्भातील दहा तर मराठवाड्यातील दहा अशी राज्यातील तीस तालुक्यातील २०२४ गावे निवडली असून, तेथे पाण्यासंदर्भात जनजागृती करण्यात येत आहे़ याबरोबरच ग्रामसभेतही ग्रामस्थांना या उपक्रमाबाबत माहिती देऊन वॉटर कॅप स्पर्धेत सहभागी होण्याचे ठराव घेण्यात आले आहेत़ उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील ९६ पैकी ६३, कळंब तालुक्यातील ९४ पैकी ९४, भूम तालुक्यातील ९४ पैकी ८५ गावांनी या वॉटर कॅप स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे़ तीन तालुक्यातील एकूण २४२ गावांचा समावेश आहे़ उपक्रम यशस्वी होण्यासाठी प्रत्येक गावात पाच जणांची टीम तयार करण्यात आली आहे़ या टीमला अंबाजोगाई येथे प्रशिक्षण देण्यात येणार आहे़ आजवर परंडा व भूम तालुक्यातील प्रत्येकी एक टीम प्रशिक्षणासाठी गेली आहे़ तर कळंब तालुक्यातील दोन टीम प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आल्या आहेत़ पाच जणांमध्ये एक वॉटस्अ‍ॅप वापरणारा निवडण्यात आला असून, त्याच्या माध्यमातून सोशल मीडियावरही जनजागृती केली जाणार आहे़ प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या पाच जणांनी गावातील नागरिकांना प्रशिक्षित करावयाचे आहे़ वॉटर कॅप स्पर्धा ही ८ एप्रिल ते २२ मे या या ४५ दिवसांच्या कालावधीत होणार आहे़ यात जिल्ह्यात प्रथम येणाऱ्या गावाला ५० लाख, द्वितीय येणाऱ्या गावाला २० लाख तर तृतीय येणाऱ्या गावाला २० लाखांचे पारितोषिक देण्यात येणार आहे़ त्याशिवाय तालुकास्तरावरील प्रथम क्रमांकाच्या गावाला १० लाखाचे पारितोषिक देण्यात येणार आहे़ विजेत्यांना १५ आॅगस्ट रोजी मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात पारितोषिकांचे वाटप करण्यात येणार आहे़ एकूणच या गावातील नागरिकांचा सहभाग आणि श्रमदानातून होणाऱ्या या कामांमुळे गावा-गावातील पाणीटंचाईवर कायम मात करण्यात यश येणार असून, या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी गावा-गावातील ग्रामस्थ कामाला लागले आहेत़(प्रतिनिधी)