शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

एकजुटीनं पेटलं रानं, तुफान आलंया...!

By admin | Updated: February 21, 2017 22:59 IST

उस्मानाबाद : दुष्काळग्रस्त शिक्का पुसण्यासाठी वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून गावा-गावात चुरस निर्माण झाली आहे़

उस्मानाबाद : दुष्काळग्रस्त शिक्का पुसण्यासाठी वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून गावा-गावात चुरस निर्माण झाली आहे़ लोकसहभागातून पाणलोटाची कामे करण्यासाठी ग्रामस्थांनीही पुढाकार घेतल्याचे चित्र परंड्यासह कळंब आणि भूम तालुक्यात दिसून येत आहे़ या स्पर्धेत या तीन तालुक्यातील २४२ गावांचा समावेश आहे़‘सत्यमेव जयते’ या मालिकेच्या माध्यमातून सत्यजीत भटकळ या निर्मात्याने सद्यस्थितीतील समाजासमोर असलेले अनेक प्रश्नांची मांडणी केली़ विशेष म्हणजे अमिर खान या मालिकेचा केंद्रबिंदू होता़ त्याच्या लोकप्रियतेमुळे या मालिकेबरोबरच या मालिकेच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नावरही गांभिर्याने चर्चा सुरू झाली़ लोकांचा प्रतिसाद पाहून भटकळ यांच्याबरोबरच अमिर खान यांनीही हा विषय पुढे घेऊन जाण्याचे निश्चित केले़ त्यातूनच पाणी फाऊंडेशनची स्थापना झाली़ अमिर खान सोबत त्यांची पत्नी किरण रॉय ही या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असून, या संस्थेने मागील वर्षी अमरावती, सातारा आणि बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाणलोटाचे काम हाती घेतले़ बीडमध्ये अंबाजोगाई, साताऱ्यात कोरेगाव तर अमरावतीतील वरूड तालुक्यात श्रमदानातून पाणलोट विकास, माथा ते पायथा अशी कामे करण्यात आली़ तब्बल ११६ गावात पाणलोटाची कामे करून घेण्यात या फाऊंडेशनला यश आले़यावर्षी या फाऊंडेशनने मराठवाड्यातील दहा तालुक्यांसह राज्यातील तीस तालुक्यात याच पध्दतीने कामे करण्याचा संकल्प केला़ यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील दहा, विदर्भातील दहा तर मराठवाड्यातील दहा अशी राज्यातील तीस तालुक्यातील २०२४ गावे निवडली असून, तेथे पाण्यासंदर्भात जनजागृती करण्यात येत आहे़ याबरोबरच ग्रामसभेतही ग्रामस्थांना या उपक्रमाबाबत माहिती देऊन वॉटर कॅप स्पर्धेत सहभागी होण्याचे ठराव घेण्यात आले आहेत़ उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील ९६ पैकी ६३, कळंब तालुक्यातील ९४ पैकी ९४, भूम तालुक्यातील ९४ पैकी ८५ गावांनी या वॉटर कॅप स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे़ तीन तालुक्यातील एकूण २४२ गावांचा समावेश आहे़ उपक्रम यशस्वी होण्यासाठी प्रत्येक गावात पाच जणांची टीम तयार करण्यात आली आहे़ या टीमला अंबाजोगाई येथे प्रशिक्षण देण्यात येणार आहे़ आजवर परंडा व भूम तालुक्यातील प्रत्येकी एक टीम प्रशिक्षणासाठी गेली आहे़ तर कळंब तालुक्यातील दोन टीम प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आल्या आहेत़ पाच जणांमध्ये एक वॉटस्अ‍ॅप वापरणारा निवडण्यात आला असून, त्याच्या माध्यमातून सोशल मीडियावरही जनजागृती केली जाणार आहे़ प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या पाच जणांनी गावातील नागरिकांना प्रशिक्षित करावयाचे आहे़ वॉटर कॅप स्पर्धा ही ८ एप्रिल ते २२ मे या या ४५ दिवसांच्या कालावधीत होणार आहे़ यात जिल्ह्यात प्रथम येणाऱ्या गावाला ५० लाख, द्वितीय येणाऱ्या गावाला २० लाख तर तृतीय येणाऱ्या गावाला २० लाखांचे पारितोषिक देण्यात येणार आहे़ त्याशिवाय तालुकास्तरावरील प्रथम क्रमांकाच्या गावाला १० लाखाचे पारितोषिक देण्यात येणार आहे़ विजेत्यांना १५ आॅगस्ट रोजी मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात पारितोषिकांचे वाटप करण्यात येणार आहे़ एकूणच या गावातील नागरिकांचा सहभाग आणि श्रमदानातून होणाऱ्या या कामांमुळे गावा-गावातील पाणीटंचाईवर कायम मात करण्यात यश येणार असून, या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी गावा-गावातील ग्रामस्थ कामाला लागले आहेत़(प्रतिनिधी)