शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नाही म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
4
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
5
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
6
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
7
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
8
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
9
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
11
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
12
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
14
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
15
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
16
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
17
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
18
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
19
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
20
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?

एकजुटीनं पेटलं रानं, तुफान आलंया...!

By admin | Updated: February 21, 2017 22:59 IST

उस्मानाबाद : दुष्काळग्रस्त शिक्का पुसण्यासाठी वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून गावा-गावात चुरस निर्माण झाली आहे़

उस्मानाबाद : दुष्काळग्रस्त शिक्का पुसण्यासाठी वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून गावा-गावात चुरस निर्माण झाली आहे़ लोकसहभागातून पाणलोटाची कामे करण्यासाठी ग्रामस्थांनीही पुढाकार घेतल्याचे चित्र परंड्यासह कळंब आणि भूम तालुक्यात दिसून येत आहे़ या स्पर्धेत या तीन तालुक्यातील २४२ गावांचा समावेश आहे़‘सत्यमेव जयते’ या मालिकेच्या माध्यमातून सत्यजीत भटकळ या निर्मात्याने सद्यस्थितीतील समाजासमोर असलेले अनेक प्रश्नांची मांडणी केली़ विशेष म्हणजे अमिर खान या मालिकेचा केंद्रबिंदू होता़ त्याच्या लोकप्रियतेमुळे या मालिकेबरोबरच या मालिकेच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नावरही गांभिर्याने चर्चा सुरू झाली़ लोकांचा प्रतिसाद पाहून भटकळ यांच्याबरोबरच अमिर खान यांनीही हा विषय पुढे घेऊन जाण्याचे निश्चित केले़ त्यातूनच पाणी फाऊंडेशनची स्थापना झाली़ अमिर खान सोबत त्यांची पत्नी किरण रॉय ही या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असून, या संस्थेने मागील वर्षी अमरावती, सातारा आणि बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाणलोटाचे काम हाती घेतले़ बीडमध्ये अंबाजोगाई, साताऱ्यात कोरेगाव तर अमरावतीतील वरूड तालुक्यात श्रमदानातून पाणलोट विकास, माथा ते पायथा अशी कामे करण्यात आली़ तब्बल ११६ गावात पाणलोटाची कामे करून घेण्यात या फाऊंडेशनला यश आले़यावर्षी या फाऊंडेशनने मराठवाड्यातील दहा तालुक्यांसह राज्यातील तीस तालुक्यात याच पध्दतीने कामे करण्याचा संकल्प केला़ यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील दहा, विदर्भातील दहा तर मराठवाड्यातील दहा अशी राज्यातील तीस तालुक्यातील २०२४ गावे निवडली असून, तेथे पाण्यासंदर्भात जनजागृती करण्यात येत आहे़ याबरोबरच ग्रामसभेतही ग्रामस्थांना या उपक्रमाबाबत माहिती देऊन वॉटर कॅप स्पर्धेत सहभागी होण्याचे ठराव घेण्यात आले आहेत़ उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील ९६ पैकी ६३, कळंब तालुक्यातील ९४ पैकी ९४, भूम तालुक्यातील ९४ पैकी ८५ गावांनी या वॉटर कॅप स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे़ तीन तालुक्यातील एकूण २४२ गावांचा समावेश आहे़ उपक्रम यशस्वी होण्यासाठी प्रत्येक गावात पाच जणांची टीम तयार करण्यात आली आहे़ या टीमला अंबाजोगाई येथे प्रशिक्षण देण्यात येणार आहे़ आजवर परंडा व भूम तालुक्यातील प्रत्येकी एक टीम प्रशिक्षणासाठी गेली आहे़ तर कळंब तालुक्यातील दोन टीम प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आल्या आहेत़ पाच जणांमध्ये एक वॉटस्अ‍ॅप वापरणारा निवडण्यात आला असून, त्याच्या माध्यमातून सोशल मीडियावरही जनजागृती केली जाणार आहे़ प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या पाच जणांनी गावातील नागरिकांना प्रशिक्षित करावयाचे आहे़ वॉटर कॅप स्पर्धा ही ८ एप्रिल ते २२ मे या या ४५ दिवसांच्या कालावधीत होणार आहे़ यात जिल्ह्यात प्रथम येणाऱ्या गावाला ५० लाख, द्वितीय येणाऱ्या गावाला २० लाख तर तृतीय येणाऱ्या गावाला २० लाखांचे पारितोषिक देण्यात येणार आहे़ त्याशिवाय तालुकास्तरावरील प्रथम क्रमांकाच्या गावाला १० लाखाचे पारितोषिक देण्यात येणार आहे़ विजेत्यांना १५ आॅगस्ट रोजी मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात पारितोषिकांचे वाटप करण्यात येणार आहे़ एकूणच या गावातील नागरिकांचा सहभाग आणि श्रमदानातून होणाऱ्या या कामांमुळे गावा-गावातील पाणीटंचाईवर कायम मात करण्यात यश येणार असून, या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी गावा-गावातील ग्रामस्थ कामाला लागले आहेत़(प्रतिनिधी)