शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथरावांनी लातुरात रोखला होता अजाबळी..!

By admin | Updated: May 26, 2015 00:48 IST

हणमंत गायकवाड ,लातूर २३ जुलै २००३ ची गोष्ट. सकाळी ११.३० ची वेळ. अंगावर चाबकाचे फटकारे मारत अन् घुंगराच्या तालावर पोतराजांची यात्रा निघालेली... अंबाजोगाई रोडवरील रेणापूर चौकातून

हणमंत गायकवाड ,लातूर२३ जुलै २००३ ची गोष्ट. सकाळी ११.३० ची वेळ. अंगावर चाबकाचे फटकारे मारत अन् घुंगराच्या तालावर पोतराजांची यात्रा निघालेली... अंबाजोगाई रोडवरील रेणापूर चौकातून देवीचा नवस फेडण्यासाठी ही यात्रा आर्वीच्या गायरानात जात होती. हलगीचा आवाज ऐकून भरधाव वेगातील स्कॉर्पियोला ब्रेक लागले आणि पोतराज प्रथा निर्मूलन करणारे तथा मानवी हक्क अभियानाचे संस्थापक अ‍ॅड. एकनाथ आवाड पोतराजांच्या यात्रेत घुसले. नव्हे, त्यांनी होऊ घातलेले रेड्याचे ‘कारण’ थांबविले...राजर्षी शाहू महाविद्यालयात ‘अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कायद्याची गरज’ या विषयावर परिसंवाद सुरू होता आणि याचवेळी इकडे रेणापूर चौकातून पोतराजांची यात्रा देवीचा नवस फेडायला आर्वीच्या शिवारात वाजत गाजत जात होती. सामाजिक परिवर्तनाची चळवळ गतिमान करणारे आणि फुले-शाहू-आंबेडकरांचा विचार प्रमाण मानणारे मानवी हक्क अभियानचे अध्यक्ष अ‍ॅड. एकनाथ आवाड या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते होते. ‘लसाकम’नेही त्यांचा सत्कार ठेवला होता. या कार्यक्रमाला येताना त्यांना पोतराजांची ही यात्रा दिसली. लागलीच त्यांनी आपली गाडी थांबविली. अन् पोतराजांच्या जथ्यात गेले. ज्यांनी देवीला नवस केला, त्यांच्या जवळ जाऊन म्हणाले, बाबांनो, आपलं दु:ख देवी नाही दूर करू शकत. आपल्या दु:खाचं कारण बाबासाहेबांनी फार पूर्वीच सांगितलं आहे. माझा बापही मांगीरबाबाचा पोतराज होता. पण मी माझ्या बापाचं केसोपन केलं. तरीपण आज मी सुखात आहे. तुमच्यासाठीच लढतो आहे. तुम्हाला सामाजिक न्याय मिळवून देण्याचा माझा प्रयत्न आहे. तुम्ही हे सारे सोडून द्या रे बाबांनो... नवस केलेल्या राजकुमार व शाहुराज कांबळे कुटुंबियांंना ते समजावून सांगत होते. मात्र व्यर्थ. उलट कांबळे कुटुंब त्यांना म्हणाले, आमची लेकरं वाचत नव्हती, तवा तुमचा बाबासाहेब कुठं गेला होता, आम्ही देवीला नवस केला. आमची लेकरं वाचली. म्हणून आम्ही देवीला ‘कारण’ करायला निघालो. साहेब, तुमचा रस्ता धरा. एकनाथ आव्हाडांची काही एक मात्रा चालली नाही. ते थेट गाडीत जाऊन बसले. ब्राझील अन् रशियाला जाऊन काहीच फायदा झाला नाही बाबासाहेब... जागतिक परिषदेत प्रश्न मांडूनही उपयोग झाला नाही बाबासाहेब. किती समजावून सांगू मी या लोकांना... असे मनाशीच पुटपुटले आणि त्यांची गाडी सुसाट वेगाने शिवाजी चौकातील पोलिस ठाण्यात जाऊन थांबली. पोलिसांत त्यांनी या घटनेची फिर्याद दिली आणि अंनिस आणि लसाकमच्या कार्यक्रमाला हजेरी लावली, तेथे विषयाची मांडणी करतानाही खंत व्यक्त केली. दरम्यान, अंनिसचे कार्याध्यक्ष माधव बावगे यांच्याही कानावर ही गोष्ट गेलेलीच होती. ‘कारण’ आणि ‘नवस’ केलेल्या शाहुराज व राजकुमार कांबळे यांना पुन्हा हे दोघे भेटले. बाबांनो, ही अंधश्रद्धा आहे. या लहान लहान मुलांना तुम्ही आयुष्यभर पोतराज ठेवणार का? तुमची गरिबी असेल तर मी माझ्या संघटनेच्या वतीने मुलांचं शैक्षणिक पुनर्वसन करण्यास तयार आहे. तुम्ही ही अंधश्रद्धा सोडा. मात्र देवीच्या श्रद्धेत कांबळे कुटुंबीय खोलवर गेल्यामुळे आव्हाड, बावगेंचे त्यांनी ऐकले नाही. शेवटी पोलिसांनी शाहुराज व राजकुमार कांबळे या दोघांसह पोतराजांनाही ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांची चौकशी करून रेड्याचं कारण करणार नाही, असे लिहून घेतले. ‘कारण’ थांबले. पण पोतराजांच्या जथ्यात असलेली तीन कोवळी पोरं आयुष्यभर पोतराजच राहणार का ही सल त्यांच्या मनात राहिली...सावित्रीबाई फुले बेनीफिट फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांच्या भावना अनावर झाल्या. अ‍ॅड. एकनाथ आवाड यांच्या नेतृत्वाखाली या फाऊंडेशनने लातूर जिल्ह्यात ५५० महिला बचत गटांची स्थापना केली असून, ४५५६ महिलांचे संघटन केले आहे. या बचत गटांची महिन्याला १ कोटी ४१ लाखांची उलाढाल असून, शेळीपालन, दुग्ध व्यवसाय, भाजीपाला विक्री, शिवणकला, बांगड्याचा व्यवसाय, मिरची कांडप असे वेगवेगळे व्यवसाय या बचत गटांचे आहेत. अ‍ॅड. एकनाथ आवाड संस्थापक चेअरमन असलेल्या अनिक फायनान्शिअल लि.ने सावित्रीबाई फुले मॅच्युअल बेनीफिट फाऊंडेशनार्फत हे जाळे तयार केले आहे, असे त्यांचे विश्वसनीय कार्यकर्ते बी.पी. सूर्यवंशी यांनी सांगितले.