शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

शाळाबाह्य प्रौढांनाही आठवी समकक्षतेचे प्रमाणपत्र

By admin | Updated: July 7, 2014 00:16 IST

संजय कुलकर्णी , जालना पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेताना ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करता आले नाही, त्यांची परीक्षा घेऊन इयत्ता आठवीचे समकक्षतेचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

संजय कुलकर्णी , जालनापहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेताना ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करता आले नाही, त्यांची परीक्षा घेऊन इयत्ता आठवीचे समकक्षतेचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यासाठी निरंतर शिक्षण योजनेद्वारे कार्यात्मक साक्षरता कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.निरंतर शिक्षण कार्यालयामार्फत निरक्षरांना साक्षर करण्याची मोहीम राबविली जाते. जालना जिल्ह्याचे साक्षरतेचे प्रमाण ७१ टक्के इतके आहे. यापूर्वी निरंतर शिक्षण कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र शासनाकडून जिल्हा साक्षरता परिषदेस अनुदान प्राप्त होत होते. परंतु सदर कार्यक्रम केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्य शासनाने बंद केल्यामुळे निरंतर शिक्षण केंद्रे बंद करण्यात आलेली आहेत. या पार्श्वभूमीवर निरंतर शिक्षणांतर्गत कार्यात्मक साक्षरता कार्यक्रम राज्य शासन, स्थानिक संस्था, सीएसआर व एनजीओ यांच्या मदतीने पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. सन २०११ च्या जनगणनेप्रमाणे १५ वर्षे वयापुढील निरक्षरांना तसेच इयत्ता १ ली ते ३ री, इयत्ता ४ थी ते ५ वी व इयत्ता ७ वी ते ८ वी पर्यंतचे शिक्षण घेताना शाळाबाह्य झालेल्या प्रौढांना परीक्षेला बसवून त्यांना एनआयओएसचे इयत्ता ८ वी चे समकक्षतेचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यासाठी अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालय पुणे यांच्या वतीने जिल्ह्यात पूर्वी सुरू असलेली निरंतर शिक्षण केंद्रांची संख्या, निरक्षरांची संख्या, नवसाक्षरांची संख्या, तसेच शाळाबाह्य झालेल्या प्रौढांची संख्या मागविण्यात आली आहे. याबाबत निरंतर शिक्षणाधिकारी तथा जि.प.चे माध्यमिक शिक्षणाधिकारी रामदास शेवाळे म्हणाले की, कार्यात्मक साक्षरता कार्यक्रम राबविण्यासाठी निरंतर शिक्षण विभागाने माहिती मागविली आहे.जुना कार्यक्रम बंदनिरंतर शिक्षण विभागामार्फत गेल्या दोन वर्षांपूर्वी ‘साक्षर भारत कार्यक्रम’ सुरू केला होता. त्यासाठी प्रत्येकी २ हजार रुपये मानधनावर जिल्ह्यात १५६२ प्रेरक नियुक्त करण्यात आले होते. तर स्वेच्छेने मोफत सेवा देण्यासाठी ७८१ ग्रामपंचायतींद्वारे स्वयंसेवकांचीही निवड करण्यात आली होती. मात्र हा कार्यक्रम बंद पडला.