शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

शाळाबाह्य प्रौढांनाही आठवी समकक्षतेचे प्रमाणपत्र

By admin | Updated: July 7, 2014 00:16 IST

संजय कुलकर्णी , जालना पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेताना ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करता आले नाही, त्यांची परीक्षा घेऊन इयत्ता आठवीचे समकक्षतेचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

संजय कुलकर्णी , जालनापहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेताना ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करता आले नाही, त्यांची परीक्षा घेऊन इयत्ता आठवीचे समकक्षतेचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यासाठी निरंतर शिक्षण योजनेद्वारे कार्यात्मक साक्षरता कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.निरंतर शिक्षण कार्यालयामार्फत निरक्षरांना साक्षर करण्याची मोहीम राबविली जाते. जालना जिल्ह्याचे साक्षरतेचे प्रमाण ७१ टक्के इतके आहे. यापूर्वी निरंतर शिक्षण कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र शासनाकडून जिल्हा साक्षरता परिषदेस अनुदान प्राप्त होत होते. परंतु सदर कार्यक्रम केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्य शासनाने बंद केल्यामुळे निरंतर शिक्षण केंद्रे बंद करण्यात आलेली आहेत. या पार्श्वभूमीवर निरंतर शिक्षणांतर्गत कार्यात्मक साक्षरता कार्यक्रम राज्य शासन, स्थानिक संस्था, सीएसआर व एनजीओ यांच्या मदतीने पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. सन २०११ च्या जनगणनेप्रमाणे १५ वर्षे वयापुढील निरक्षरांना तसेच इयत्ता १ ली ते ३ री, इयत्ता ४ थी ते ५ वी व इयत्ता ७ वी ते ८ वी पर्यंतचे शिक्षण घेताना शाळाबाह्य झालेल्या प्रौढांना परीक्षेला बसवून त्यांना एनआयओएसचे इयत्ता ८ वी चे समकक्षतेचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यासाठी अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालय पुणे यांच्या वतीने जिल्ह्यात पूर्वी सुरू असलेली निरंतर शिक्षण केंद्रांची संख्या, निरक्षरांची संख्या, नवसाक्षरांची संख्या, तसेच शाळाबाह्य झालेल्या प्रौढांची संख्या मागविण्यात आली आहे. याबाबत निरंतर शिक्षणाधिकारी तथा जि.प.चे माध्यमिक शिक्षणाधिकारी रामदास शेवाळे म्हणाले की, कार्यात्मक साक्षरता कार्यक्रम राबविण्यासाठी निरंतर शिक्षण विभागाने माहिती मागविली आहे.जुना कार्यक्रम बंदनिरंतर शिक्षण विभागामार्फत गेल्या दोन वर्षांपूर्वी ‘साक्षर भारत कार्यक्रम’ सुरू केला होता. त्यासाठी प्रत्येकी २ हजार रुपये मानधनावर जिल्ह्यात १५६२ प्रेरक नियुक्त करण्यात आले होते. तर स्वेच्छेने मोफत सेवा देण्यासाठी ७८१ ग्रामपंचायतींद्वारे स्वयंसेवकांचीही निवड करण्यात आली होती. मात्र हा कार्यक्रम बंद पडला.