शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
2
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
3
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
4
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
5
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
6
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
7
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
8
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
9
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
10
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
11
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
12
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
13
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच
14
'या' अभिनेत्याला डेट करतीये राधिका मदन? रिलेशनशिपवर म्हणाला, "मी खूप चिपकू बॉयफ्रेंड..."
15
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
16
RR vs PBKS : शशांक सिंहचा परफेक्ट फिनिशिंग टच! पंजाब किंग्जनं उभारली विक्रमी धावसंख्या
17
सोलापूर आग दुर्घटना; मृतांचा आकडा पोहचला आठवर; बेडरूममध्ये सापडले पाच जणांचे मृतदेह 
18
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद
19
'हा' मराठमोळा स्टार टीव्ही इंडस्ट्रीत सर्वांत महागडा! दिलीप जोशी, रुपाली गांगुलीही मागे पडले!
20
जगात 'मेड इन इंडिया'चा बोलबाला; स्मार्टफोन निर्यातीत भारताची मोठी झेप, 24 अब्ज डॉलर्स...

शाळाबाह्य प्रौढांनाही आठवी समकक्षतेचे प्रमाणपत्र

By admin | Updated: July 7, 2014 00:16 IST

संजय कुलकर्णी , जालना पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेताना ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करता आले नाही, त्यांची परीक्षा घेऊन इयत्ता आठवीचे समकक्षतेचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

संजय कुलकर्णी , जालनापहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेताना ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करता आले नाही, त्यांची परीक्षा घेऊन इयत्ता आठवीचे समकक्षतेचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यासाठी निरंतर शिक्षण योजनेद्वारे कार्यात्मक साक्षरता कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.निरंतर शिक्षण कार्यालयामार्फत निरक्षरांना साक्षर करण्याची मोहीम राबविली जाते. जालना जिल्ह्याचे साक्षरतेचे प्रमाण ७१ टक्के इतके आहे. यापूर्वी निरंतर शिक्षण कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र शासनाकडून जिल्हा साक्षरता परिषदेस अनुदान प्राप्त होत होते. परंतु सदर कार्यक्रम केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्य शासनाने बंद केल्यामुळे निरंतर शिक्षण केंद्रे बंद करण्यात आलेली आहेत. या पार्श्वभूमीवर निरंतर शिक्षणांतर्गत कार्यात्मक साक्षरता कार्यक्रम राज्य शासन, स्थानिक संस्था, सीएसआर व एनजीओ यांच्या मदतीने पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. सन २०११ च्या जनगणनेप्रमाणे १५ वर्षे वयापुढील निरक्षरांना तसेच इयत्ता १ ली ते ३ री, इयत्ता ४ थी ते ५ वी व इयत्ता ७ वी ते ८ वी पर्यंतचे शिक्षण घेताना शाळाबाह्य झालेल्या प्रौढांना परीक्षेला बसवून त्यांना एनआयओएसचे इयत्ता ८ वी चे समकक्षतेचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यासाठी अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालय पुणे यांच्या वतीने जिल्ह्यात पूर्वी सुरू असलेली निरंतर शिक्षण केंद्रांची संख्या, निरक्षरांची संख्या, नवसाक्षरांची संख्या, तसेच शाळाबाह्य झालेल्या प्रौढांची संख्या मागविण्यात आली आहे. याबाबत निरंतर शिक्षणाधिकारी तथा जि.प.चे माध्यमिक शिक्षणाधिकारी रामदास शेवाळे म्हणाले की, कार्यात्मक साक्षरता कार्यक्रम राबविण्यासाठी निरंतर शिक्षण विभागाने माहिती मागविली आहे.जुना कार्यक्रम बंदनिरंतर शिक्षण विभागामार्फत गेल्या दोन वर्षांपूर्वी ‘साक्षर भारत कार्यक्रम’ सुरू केला होता. त्यासाठी प्रत्येकी २ हजार रुपये मानधनावर जिल्ह्यात १५६२ प्रेरक नियुक्त करण्यात आले होते. तर स्वेच्छेने मोफत सेवा देण्यासाठी ७८१ ग्रामपंचायतींद्वारे स्वयंसेवकांचीही निवड करण्यात आली होती. मात्र हा कार्यक्रम बंद पडला.