शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्याची निर्यात वाढविण्याचे प्रयत्न

By admin | Updated: July 14, 2015 00:25 IST

औरंगाबाद : मराठवाड्यातून होणारी निर्यात वाढविण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ फॉरेन ट्रेडच्या (आयआयएफटी) शिष्टमंडळाने मराठवाड्यातील

औरंगाबाद : मराठवाड्यातून होणारी निर्यात वाढविण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ फॉरेन ट्रेडच्या (आयआयएफटी) शिष्टमंडळाने मराठवाड्यातील उद्योजकांच्या अडचणी समजावून घेतल्या. चेंबर आॅफ मराठवाडा अ‍ॅग्रिकल्चर अँड इंडस्ट्रीजच्या (सीएमआयए) सभागृहात यानिमित्त झालेल्या चर्चासत्रात उद्योजकांनी विविध मागण्या केल्या. देशाचे नवीन परकीय व्यापार धोरण केंद्र सरकार आखत आहे. या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातून होणारी निर्यात कशी वाढेल, याचे सर्वेक्षण करण्याचे काम ‘आयआयएफटी’ करीत आहे. ‘आयआयएफटी’चे सदस्य जयदीप मुखर्जी यांनी मराठवाड्यातील लघु, मध्यम आणि मोठ्या उद्योगाच्या प्रतिनिधींची भेट घेऊन चर्चा केली. ‘सीएमआयए’चे अध्यक्ष आशिष गर्दे, सुनील रायठठ्ठा, विजय लेकुरवाळे, उद्योग खात्याचे सहसंचालक प्रदीप देशमुख आदी यावेळी उपस्थित होते. निर्यातवाढीला चालना देण्यासाठी परकीय चलनविनिमय करणाऱ्या बँका, वित्तीय संस्थांची गरज असते. जालन्यात निर्यातवाढीची मोठी संधी असताना अशी सुविधा उपलब्ध नसल्याची खंत तेथील उद्योजकांनी बोलून दाखविली. औरंगाबादहून जवाहरलाल नेहरूपोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी)पर्यंत कंटेनर न्यावयाचा झाल्यास त्यात मोठा विलंब होतो, त्याचा निर्यातीवर प्रतिकूल परिणाम होत असल्याची भावना उद्योजकांनी व्यक्त केली. मुंबई येथील कस्टम क्लीअरन्सचे काम एका शिफ्टमध्येच चालते. ते चोवीस तास सुरूराहावे, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. ‘डीएमआयसी’मुळे मोठी संधी दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर प्रकल्प (डीएमआयसी) आणि जालना येथील नियोजित ड्रायपोर्टच्या माध्यमातून मराठवाड्यातील उद्योगांना निर्यातीच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्याचा लघु, मध्यम आणि मोठ्या उद्योगांनी फायदा करून घ्यावा, असे आवाहन उद्योग सहसंचालक पी. पी. देशमुख यांनी केले. नव्या निर्यात धोरणांमुळे उद्योगांना भेडसावणाऱ्या समस्या नक्कीच दूर होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राज्यात ११ बैठका केंद्र व राज्य सरकारने उद्योगवाढीसाठी मेक-इन-इंडिया, मेक-इन-महाराष्ट्र, स्किल इंडिया आदी उपक्रम हाती घेतले आहेत. केंद्र आता नवीन परराष्ट्र निर्यात धोरणाची आखणी करीत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘आयआयटीएफ’कडून सर्वेक्षण केले जाणार आहे. या संस्थेचे प्रतिनिधी राज्यात ११ ठिकाणी बैठका घेणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.