शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
2
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
3
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
4
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
5
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
6
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
7
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
8
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
9
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
10
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
11
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
12
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
13
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
14
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
15
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
16
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
17
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
18
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
19
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
20
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  

जिल्ह्यासाठी महत्त्वाचे प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:02 IST

विकास राऊत औरंगाबाद : केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर आठ जुलै रोजी दुपारी केंद्रीय अर्थ व वित्त खात्याचे राज्यमंत्री खा. ...

विकास राऊत

औरंगाबाद : केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर आठ जुलै रोजी दुपारी केंद्रीय अर्थ व वित्त खात्याचे राज्यमंत्री खा. डॉ. भागवत कराड यांनी जिल्ह्यासाठी महत्त्वाचे प्रकल्प तरतुदींसह यावेत, यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे ‘लोकमत’जवळ स्पष्ट केले. खात्याचा पदभार घेतल्यानंतर त्यांनी प्राथमिक माहितीनुसार आपल्या योजनांचे स्पष्टीकरण केले.

औरंगाबाद जिल्ह्यासाठी आणि शहरासाठी काय करता येईल, आपल्या काय संकल्पना आहेत, याबाबत राज्यमंत्री डॉ. कराड यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, औद्योगिक क्षेत्राचा मागील सहा महिन्यांपासून मी आढावा घेत आहे. सर्व उद्योग संघटना आणि उद्योजकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेत आहे. आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर डीएमआयसीमध्ये उभारले जावे, यासाठी भरीव तरतूद केंद्र शासनाकडून मिळेल, या दिशेने प्राधान्याने प्रयत्न करण्यात येतील.

विमानतळ विस्तारीकरण करण्यासाठी याआधीही केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला आहे. आता त्याला आणखीन गती देता येईल. येथून आंतरराष्ट्रीय पातळीवर विमानसेवा कशा वाढतील, यात सर्वाधिक लक्ष घालणार आहे.

डीएमआयसीसाठी गुंतवणुकीचे प्रमाण वाढावे, नवीन उद्योग यावेत, येथील उपलब्ध सुविधांचे जगभर मार्केटिंग करण्यासाठी विशेष एजन्सी असावी, याबाबत उद्योग खात्याशी बोलून चर्चा करण्यात येईल. डीएमआयसीमध्ये मोठा उद्योग यावा, यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे ते म्हणाले.

औरंगाबाद - पुणे या महामार्गाचे रुंदीकरण करणे, तसेच औट्रम घाटातील बोगद्याच्या कामाला गती मिळेल, यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटून पाठपुरावा करण्यात येईल. केंद्रात असल्यामुळे त्यांना भेटणे सहज शक्य होईल. केंद्रीय वित्त मंत्रालयाचा राज्यमंत्री म्हणून अर्थ संकल्पात औरंगाबाद जिल्हा सर्व बाजूने यावा, असाच माझा प्रयत्न राहील, असेही डॉ. कराड म्हणाले.