शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
2
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
3
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
4
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
5
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
6
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
7
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
8
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
9
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
10
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
11
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
12
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
13
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
14
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
15
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
16
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
17
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
18
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
19
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
20
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

विकासकामाबरोबर ‘इमेज’चाही प्रभाव

By admin | Updated: October 19, 2014 00:21 IST

उस्मानाबाद : विद्यमान आमदारांनी मतदारसंघात केलेल्या विकासकामांची दखल मतदारांनी प्रत्यक्ष मतदान करताना घेतली आहे.

उस्मानाबाद : विद्यमान आमदारांनी मतदारसंघात केलेल्या विकासकामांची दखल मतदारांनी प्रत्यक्ष मतदान करताना घेतली आहे. याबरोबरच रिंगणात असलेल्या उमेदवारांच्या इमेजचाही मतदारांवर प्रभाव असल्याचे ‘लोकमत’ सर्व्हेक्षणातून स्पष्ट झाले आहे. तब्बल ३७ टक्के नागरिकांनी मतदान करताना विकासकामांची दखल घेतल्याचे सांगितले असून, ४२ टक्के मतदारांनी उमेदवाराच्या प्रतिमेकडेही आकृष्ट झाल्याचे या सर्व्हेक्षणावेळी स्पष्ट केले आहे. बुधवारी जिल्ह्यातील चारही मतदारसंघात उत्साही तितक्याच शांततापूर्ण वातावरणात मतदान पार पडले. बहुतांश मतदारसंघात चुरशीच्या लढती झाल्याने पदाधिकारी, कार्यकर्ते निकालाचे आखाडे बांधण्यात व्यस्त आहेत. उद्या दुपारनंतर निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष मतदान करताना मतदारांनी नेमक्या कोणत्या मुद्यांचा विचार केला हे जाणून घेतले असता, प्रमुख उमेदवाराची विकासाची दृष्टी, विद्यमान आमदारांनी मतदारसंघात केलेली विकासकामे, उमेदवाराचा मतदारसंघात असलेला जनसंपर्क त्या माध्यमातून त्यााची उभी राहिलेली प्रतिमा, जातीय समीकरणे याबरोबरच प्रचार यंत्रणा याबाबी महत्वपूर्ण ठरल्याचे हे सर्व्हेक्षण सांगते. विधानसभा निवडणुकात मतदारांवर कोणत्या मुद्याचा विशेष प्रभाव होता असा प्रश्न नागरिकांना विचारला असता, तब्बल ४२ टक्के नागरिकांनी उमेदवाराची प्रतिमा पाहिली गेल्याचे ‘लोकमत’कडे स्पष्ट केले. ३७ टक्के नागरिकांनी विकासकामांचा मुद्दा महत्वपूर्ण ठरल्याचे सांगितले. १६ टक्के नागरिकांनी निवडणूक कालावधीत राबविलेल्या प्रचार यंत्रणेचा मतदारांवर प्रभाव पडल्याची कबली दिली. तर ५ टक्के नागरिकांनी प्रत्यक्ष मतदानावेळी जातीचा मुद्दा प्रभावी ठरल्याची कबुली या सर्व्हेक्षणावेळी दिली आहे.उमेदवार तसेच विद्यमान आमदाराचा मतदारसंघात जनसंपर्क कसा आहे. मतदारसंघातील प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी ते किती आग्रही असतात. दिलेली आश्वासने पाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न होतो का? याबरोबर मतदारसंघातील शांतता व सद्भावनेचे वातावरण कायम ठेवण्यासाठी जो उमेदवार प्रामाणिक प्रयत्न करण्याची शक्यता आहे. अशाच्याच पाठीशी राहिल्याचे मत नागरिकांनी या सर्व्हेक्षणावेळी व्यक्त केले. विशेष म्हणजे जातीय समीकरणे पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात बाजूला पडल्याचेही या सर्व्हेक्षणावरुन स्पष्ट होत आहे. निवडणूक कालावधीत भव्य प्रचार रॅली, जंगी जाहीर सभा घेवून शक्तीप्रदर्शन करण्यावर बहुतांश उमेदवारांचा भर असतो. या माध्यमातून काठावर असलेला मतदार आपल्या बाजूने वळेल अशी त्यामागची भूमिका असते. मात्र प्रचारयंत्रणेतील या मुद्यांचा केवळ १६ टक्के मतदारांवर प्रभाव राहिल्याचेही या सर्व्हेक्षणाच्या माध्यमातून पुढे आले आहे. निवडणूक प्रचारासाठी जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह दिग्गजांच्या जंगी प्रचारसभा झाल्या. मात्र तरीही राज्यस्तरीय मुद्याऐवजी स्थानिक मुद्याकडेच मतदारांचे लक्ष होते, असे या सर्व्हेक्षणाच्या माध्यमातून पुढे आले आहे. तब्बल ६८ टक्के नागरिकांनी मतदारसंघातील स्थानिक मुद्यांचा मतदारांवर प्रभाव होता असे स्पष्ट केले असून, ३२ टक्के नागरिकांनी मात्र राज्यस्तरीय मुद्देही प्रत्यक्ष मतदानावेळी प्रभावी ठरल्याचे सांगितले आहे.४रविवारी निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींकडून नागरिकांना अनेक अपेक्षा आहेत. विशेषत: रस्ते, पाणी, वीज या पायाभूत सुविधा पुरविताना त्यात अधिक दर्जेदारपणा आणण्यासाठी नव्या लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा ४१ टक्के नागरिकांनी व्यक्त केली आहे. बेरोजगारीचा प्रश्न सर्वच घटकांना चिंतेचा वाटतो. त्यामुळेच ३४ टक्के नागरिकांनी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण करण्यासाठी आमदारांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तरुणांबरोबरच महिलांच्या हाताला काम मिळाल्यास अनेक प्रश्नांची सोडवणूक होवू शकते. तसेच आपल्या भागातच हाताला काम मिळाल्यास जिल्ह्यातून पुणे, मुंबईला रोजगारासाठी होणारे स्थलांतर कमी होईल, अशी आशाही या नागरिकांनी व्यक्त केली आहे. अनेक लोकप्रतिनिधी निवडणूक काळात विविध आश्वासने देतात. मात्र त्याची पूर्तता होत नाही. याबरोबरच निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीचे पुढील पाच वर्षे मतदारसंघात दर्शनही होत नसल्याच्या काही जणांच्या तक्रारी असल्याचे या सर्व्हेक्षणातून पुढे आले. नवनियुक्त लोकप्रतिनिधींनी निवडणुकीनंतरही मतदारांशी संपर्क कायम ठेवावा अशी अपेक्षा १८ टक्के नागरिकांनी व्यक्त केली आहे. मतदान करताना जातीपातीच्या पलिकडे जावून एखाद्या पक्ष, उमेदवाराच्या पाठीशी राहणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे निवडून आल्यानंतर लोकप्रतिनिधींनी सर्व समाज घटकांचे हित जोपासण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा, असे मत ७ टक्के नागरिकांनी व्यक्त केले आहे.