शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
2
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
3
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
4
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
5
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
6
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
7
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
8
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
9
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
10
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
11
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
12
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
13
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
14
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
15
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
16
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
17
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
18
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
19
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
Daily Top 2Weekly Top 5

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयावर ईडीची धाड

By | Updated: December 4, 2020 04:09 IST

औरंगाबाद : मनी लाँड्रिंगच्या संशयावरून अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने गुरुवारी सकाळी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) औरंगाबादेतील राज्य कार्यालयावर ...

औरंगाबाद : मनी लाँड्रिंगच्या संशयावरून अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने गुरुवारी सकाळी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) औरंगाबादेतील राज्य कार्यालयावर धाड टाकली. पथकाने सुमारे अडीच तास कार्यालयाची झडती घेतली. त्यानंतर दोन पदाधिकाऱ्यांची चौकशी व आर्थिक व्यवहारासंबंधी कागदपत्रे जप्त करून पथक परतले. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संस्थेचे राज्य कार्यालय औरंगाबादमधील जुना बायजीपुरा येथे आहे. या कार्यालयावर ईडीच्या पथकाने पोलिसांना सोबत घेऊन गुरुवारी सकाळी १० वाजता छापा टाकला. तेव्हा कार्यालयात जिल्हा कमिटीचे सदस्य कलीम उपस्थित होते. संस्थेचे जिल्हाध्यक्ष इरफान मिली यांना पथकातील अधिकारी ईश्वर यांनी कॉल करून कार्यालयात बोलावून घेतले. यानंतर इरफान मिली आणि कलीम यांच्याकडून अधिकाऱ्यांनी संस्थेच्या कामकाजाची माहिती घेतली. उच्चशिक्षणासाठी मुस्लिम विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप करण्यासाठी पैसा कोठून येतो? संस्थेचे देणगीदार कोण आहेत? आणि या कार्यालयातून राज्यभरातील किती कार्यालयांवर नियंत्रण ठेवले जाते, यासह अन्य मुद्द्यांवर चौकशी केली. यावेळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी कार्यालयातील आर्थिक व्यवहारासंबंधी पासबुक, बँक स्टेटमेंट आदी कागदपत्रे, तसेच संस्थेच्या विविध उपक्रमांबद्दल असलेली कागदपत्रे जप्त केली. यानंतर पथकाने कलीम यांना शहरातील केंद्रीय जीएसटी कार्यालयात नेऊन त्यांची चौकशी केली. पंचनाम्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी कलीम यांना सोडून दिले.

======

चौकट

कार्यालयाबाहेर समर्थकांची गर्दी

अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने पीएफआय कार्यालयावर धाड टाकण्यासाठी येताना सोबत पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आणले होते. अचानक ईडीची धाड पडल्याचे कळताच कार्यालयाबाहेर पीएफआय समर्थकांनी गर्दी केली होती.

============

कार्यालय ते रोशनगेट काढला मोर्चा

पथक गेल्यावर ईडीने क्लीन चिट दिल्याचा दावा पीएफआयचे पदाधिकारी कलीम यांनी केला. यानंतर पीएफआयचे पदाधिकारी आणि समर्थकांनी जुना बायजीपुरा ते रोशनगेट असा मोर्चा काढला.

====

कोट

दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाहून इतरत्र लक्ष वळविण्यासाठी केंद्र सरकारने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयावर धाड टाकली. आम्ही हाथरस प्रकरण, दिल्ली दंगल आणि एनआरसीविरुद्ध जाहीर आंदोलन पुकारल्याने आमचा आवाज बंद करण्यासाठी ईडीचा वापर सरकार करीत आहे.

-इरफान मिली, जिल्हाध्यक्ष, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया, औरंगाबाद