शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
4
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
5
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
6
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
7
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
8
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
9
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
11
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
12
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
13
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
14
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
15
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
16
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
17
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
18
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
19
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
20
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर

आडूळच्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांची आर्थिक लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 01:31 IST

आडूळ येथील विनाअनुदानित संत ईश्वरसिंह कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थ्यांची लूट करण्यात येत असल्याची धक्कादायक बाब कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

राम शिनगारे/ अंकुश वाघ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्ह्यातील आडूळ येथील विनाअनुदानित संत ईश्वरसिंह कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थ्यांची लूट करण्यात येत असल्याची धक्कादायक बाब कॅमेऱ्यात कैद झाली आहे. विद्यार्थ्यांकडून पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ५ ते १० हजार रुपये घेण्यात आले आहेत. या पैशाची पावतीही विद्यार्थ्यांना दिलेली नाही. पावती मागितल्यास विद्यार्थ्यांना प्रवेशच देण्यात येत नसल्याचेही समोर आले आहे.आडूळ येथे बळीराम नाईक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित संत ईश्वरसिंह कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अव्वाच्या सव्वा शुल्क आकरण्यात येत असल्याचे ‘लोकमत’ने के लेल्या स्टिंगमध्ये समोर आले आहे. या महाविद्यालयात गावातील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यास त्यांच्याकडून ५ हजार रुपये, शेजारील गावातील विद्यार्थ्यांकडून ६ ते ७ हजार रुपये आणि जिल्ह्याबाहेरील विद्यार्थ्यांकडून १० हजार रुपये शुल्क घेण्यात येत असल्याची तक्रार अखिल भारतीय मीणा महासभा संघटनेतर्फे विद्यापीठाकडे ४ जुलै रोजी केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये विद्यार्थ्यांकडून ५ हजार रुपये शुल्क घेण्यात येत असल्याचे कॅमेºयात कैद झाले. विशेष म्हणजे यात प्रवेशासाठीची कागदपत्रे आणि पैसे दस्तुरखुद्द प्रभारी प्राचार्यच घेत असल्याचे दिसून आले. प्राचार्य विद्यार्थ्यांकडून पाच हजार रुपये घेताना दिसतात. पैसे घेतल्यानंतर त्याची कोणतीही नोंद किंवा पावती दिली जात नाही. एका विद्यार्थ्याने परीक्षा शुल्क कमी करण्याची विनंती केली. तेव्हा प्राचार्य सांगतात, ६ ते ७ हजार रुपये फी ही बालवाडीतील प्रवेशासाठी घेतली जाते. हे तर उच्चशिक्षण देणारे महाविद्यालय आहे. पाच हजार रुपयांच्या फीमध्ये एकही रुपया कमी होणार नाही. यानंतर हा विद्यार्थी हिरमुसल्या तोंडाने बाहेर पडतो. प्राचार्य अ‍ॅडमिशनचे अर्ज तपासण्याच्या कामात व्यस्त होतात. विद्यार्थ्यांचे प्रवेश घेण्यासाठी थेट प्राचार्यांनाच बसावे लागते. या महाविद्यालयात लिपिकसुद्धा नसल्याचे दिसून येत आहे.प्रवेश अर्ज भरा अन् परीक्षेला याया महाविद्यालयात थेट औरंगाबाद, ठाणे, पुणेपासून ते महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे. एकदा प्रवेश घेतला की थेट परीक्षेला येण्याची मुभा महाविद्यालयात मिळत असल्याचे सूत्रांनी सांगितले. यामुळे महाविद्यालयात ना तास होतात ना प्राध्यापक आहेत. जे प्राचार्य विद्यार्थ्यांकडून पैसे घेतात. तेसुद्धा प्रभारी असून, त्यांचीही पात्रता शंकास्पद आहे. याचवेळी परीक्षेत १०० टक्के कॉपी करण्याची हमी मिळत असल्यामुळे कागदोपत्री सर्व सोपस्कार पूर्ण केले जात असल्याचेही स्पष्ट झाले.

टॅग्स :collegeमहाविद्यालयuniversityविद्यापीठ