शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

आडूळच्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांची आर्थिक लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 01:31 IST

आडूळ येथील विनाअनुदानित संत ईश्वरसिंह कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थ्यांची लूट करण्यात येत असल्याची धक्कादायक बाब कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

राम शिनगारे/ अंकुश वाघ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्ह्यातील आडूळ येथील विनाअनुदानित संत ईश्वरसिंह कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थ्यांची लूट करण्यात येत असल्याची धक्कादायक बाब कॅमेऱ्यात कैद झाली आहे. विद्यार्थ्यांकडून पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ५ ते १० हजार रुपये घेण्यात आले आहेत. या पैशाची पावतीही विद्यार्थ्यांना दिलेली नाही. पावती मागितल्यास विद्यार्थ्यांना प्रवेशच देण्यात येत नसल्याचेही समोर आले आहे.आडूळ येथे बळीराम नाईक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित संत ईश्वरसिंह कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अव्वाच्या सव्वा शुल्क आकरण्यात येत असल्याचे ‘लोकमत’ने के लेल्या स्टिंगमध्ये समोर आले आहे. या महाविद्यालयात गावातील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यास त्यांच्याकडून ५ हजार रुपये, शेजारील गावातील विद्यार्थ्यांकडून ६ ते ७ हजार रुपये आणि जिल्ह्याबाहेरील विद्यार्थ्यांकडून १० हजार रुपये शुल्क घेण्यात येत असल्याची तक्रार अखिल भारतीय मीणा महासभा संघटनेतर्फे विद्यापीठाकडे ४ जुलै रोजी केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये विद्यार्थ्यांकडून ५ हजार रुपये शुल्क घेण्यात येत असल्याचे कॅमेºयात कैद झाले. विशेष म्हणजे यात प्रवेशासाठीची कागदपत्रे आणि पैसे दस्तुरखुद्द प्रभारी प्राचार्यच घेत असल्याचे दिसून आले. प्राचार्य विद्यार्थ्यांकडून पाच हजार रुपये घेताना दिसतात. पैसे घेतल्यानंतर त्याची कोणतीही नोंद किंवा पावती दिली जात नाही. एका विद्यार्थ्याने परीक्षा शुल्क कमी करण्याची विनंती केली. तेव्हा प्राचार्य सांगतात, ६ ते ७ हजार रुपये फी ही बालवाडीतील प्रवेशासाठी घेतली जाते. हे तर उच्चशिक्षण देणारे महाविद्यालय आहे. पाच हजार रुपयांच्या फीमध्ये एकही रुपया कमी होणार नाही. यानंतर हा विद्यार्थी हिरमुसल्या तोंडाने बाहेर पडतो. प्राचार्य अ‍ॅडमिशनचे अर्ज तपासण्याच्या कामात व्यस्त होतात. विद्यार्थ्यांचे प्रवेश घेण्यासाठी थेट प्राचार्यांनाच बसावे लागते. या महाविद्यालयात लिपिकसुद्धा नसल्याचे दिसून येत आहे.प्रवेश अर्ज भरा अन् परीक्षेला याया महाविद्यालयात थेट औरंगाबाद, ठाणे, पुणेपासून ते महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे. एकदा प्रवेश घेतला की थेट परीक्षेला येण्याची मुभा महाविद्यालयात मिळत असल्याचे सूत्रांनी सांगितले. यामुळे महाविद्यालयात ना तास होतात ना प्राध्यापक आहेत. जे प्राचार्य विद्यार्थ्यांकडून पैसे घेतात. तेसुद्धा प्रभारी असून, त्यांचीही पात्रता शंकास्पद आहे. याचवेळी परीक्षेत १०० टक्के कॉपी करण्याची हमी मिळत असल्यामुळे कागदोपत्री सर्व सोपस्कार पूर्ण केले जात असल्याचेही स्पष्ट झाले.

टॅग्स :collegeमहाविद्यालयuniversityविद्यापीठ