शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

आडूळच्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांची आर्थिक लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 01:31 IST

आडूळ येथील विनाअनुदानित संत ईश्वरसिंह कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थ्यांची लूट करण्यात येत असल्याची धक्कादायक बाब कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

राम शिनगारे/ अंकुश वाघ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्ह्यातील आडूळ येथील विनाअनुदानित संत ईश्वरसिंह कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थ्यांची लूट करण्यात येत असल्याची धक्कादायक बाब कॅमेऱ्यात कैद झाली आहे. विद्यार्थ्यांकडून पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ५ ते १० हजार रुपये घेण्यात आले आहेत. या पैशाची पावतीही विद्यार्थ्यांना दिलेली नाही. पावती मागितल्यास विद्यार्थ्यांना प्रवेशच देण्यात येत नसल्याचेही समोर आले आहे.आडूळ येथे बळीराम नाईक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित संत ईश्वरसिंह कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अव्वाच्या सव्वा शुल्क आकरण्यात येत असल्याचे ‘लोकमत’ने के लेल्या स्टिंगमध्ये समोर आले आहे. या महाविद्यालयात गावातील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यास त्यांच्याकडून ५ हजार रुपये, शेजारील गावातील विद्यार्थ्यांकडून ६ ते ७ हजार रुपये आणि जिल्ह्याबाहेरील विद्यार्थ्यांकडून १० हजार रुपये शुल्क घेण्यात येत असल्याची तक्रार अखिल भारतीय मीणा महासभा संघटनेतर्फे विद्यापीठाकडे ४ जुलै रोजी केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये विद्यार्थ्यांकडून ५ हजार रुपये शुल्क घेण्यात येत असल्याचे कॅमेºयात कैद झाले. विशेष म्हणजे यात प्रवेशासाठीची कागदपत्रे आणि पैसे दस्तुरखुद्द प्रभारी प्राचार्यच घेत असल्याचे दिसून आले. प्राचार्य विद्यार्थ्यांकडून पाच हजार रुपये घेताना दिसतात. पैसे घेतल्यानंतर त्याची कोणतीही नोंद किंवा पावती दिली जात नाही. एका विद्यार्थ्याने परीक्षा शुल्क कमी करण्याची विनंती केली. तेव्हा प्राचार्य सांगतात, ६ ते ७ हजार रुपये फी ही बालवाडीतील प्रवेशासाठी घेतली जाते. हे तर उच्चशिक्षण देणारे महाविद्यालय आहे. पाच हजार रुपयांच्या फीमध्ये एकही रुपया कमी होणार नाही. यानंतर हा विद्यार्थी हिरमुसल्या तोंडाने बाहेर पडतो. प्राचार्य अ‍ॅडमिशनचे अर्ज तपासण्याच्या कामात व्यस्त होतात. विद्यार्थ्यांचे प्रवेश घेण्यासाठी थेट प्राचार्यांनाच बसावे लागते. या महाविद्यालयात लिपिकसुद्धा नसल्याचे दिसून येत आहे.प्रवेश अर्ज भरा अन् परीक्षेला याया महाविद्यालयात थेट औरंगाबाद, ठाणे, पुणेपासून ते महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे. एकदा प्रवेश घेतला की थेट परीक्षेला येण्याची मुभा महाविद्यालयात मिळत असल्याचे सूत्रांनी सांगितले. यामुळे महाविद्यालयात ना तास होतात ना प्राध्यापक आहेत. जे प्राचार्य विद्यार्थ्यांकडून पैसे घेतात. तेसुद्धा प्रभारी असून, त्यांचीही पात्रता शंकास्पद आहे. याचवेळी परीक्षेत १०० टक्के कॉपी करण्याची हमी मिळत असल्यामुळे कागदोपत्री सर्व सोपस्कार पूर्ण केले जात असल्याचेही स्पष्ट झाले.

टॅग्स :collegeमहाविद्यालयuniversityविद्यापीठ