शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
4
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
5
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
6
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
7
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
8
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
9
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
10
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
11
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
12
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
13
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
14
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
15
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
16
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
17
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
18
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
19
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
20
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा

महावितरणला आर्थिक विवंचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 01:10 IST

शहरातील घरगुती, व्यावसायिक आणि उद्योजक ग्राहकांकडे तब्बल १३५ कोटी रुपयांची, तर परिमंडळांतर्गत औरंगाबाद आणि जालना या दोन जिल्ह्यांत कृषिपंपधारकांकडे ३९९ कोटी रुपयांची थकबाकी आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील घरगुती, व्यावसायिक आणि उद्योजक ग्राहकांकडे तब्बल १३५ कोटी रुपयांची, तर परिमंडळांतर्गत औरंगाबाद आणि जालना या दोन जिल्ह्यांत कृषिपंपधारकांकडे ३९९ कोटी रुपयांची थकबाकी आहे. या आठवड्यात शहरातील थकबाकी वसुलीसाठी मोहीम राबवून अहवाल सादर करण्याचे आदेश शाखा अभियंत्यांना दिले आहेत. याशिवाय कृषिपंपांची थकबाकी न भरणाºया ग्राहकांच्या विद्युत वाहिन्याच बंद करण्यात आल्या आहेत.यासंदर्भात मंगळवारी पत्रकारांशी बोलताना मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी सांगितले की, औरंगाबाद परिमंडळांतर्गत एकूण ६७४ वाहिन्या असून, यापैकी ५० टक्के वाहिन्या बंद करण्यात आल्या आहेत. बिल न भरणाºया कृषिपंपधारकांना वीजपुरवठा करणाºया वाहिन्या बंद करण्याचा निर्णय महावितरण कंपनीने घेतला आहे. कृषिपंपांना वीजपुरवठा करणाºया एकूण १६,००० रोहित्रांपैकी ७ हजार ९१४ बंद करण्यात आले आहेत. यामध्ये २८० रोहित्र नादुरुस्त आहेत. शेतकºयांनी थकबाकी भरल्याशिवाय रोहित्रांची दुरुस्ती केली जाणार नाही. सध्या १ लाख ७ हजार ३२९ कृषिपंप यामुळे बंद पडले असून, यांच्याकडे ३९९ कोटी रुपये एवढी थकबाकी आहे.शहरात १ लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेले २,२५० ग्राहक असून, त्यांच्याकडे ४३ कोटी रुपये एवढी थकबाकी आहे. यामध्ये घरगुती वापर असलेल्या ग्राहकांची संख्या सर्वाधिक आहे. या आठवड्यात सर्व शाखा अभियंत्यांना बिल दुरुस्ती, वसुली, वीजपुरवठा खंडित करून मीटर काढून आणण्याची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.दोन अधिकाºयांवरच कारवाईथकबाकी वसुलीमध्ये कमी पडलेले शहराचे कार्यकारी अभियंता अर्शद पठाण व छावणी उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विनय घनबहादूर या दोघांच्या बदल्या दुसºया जिल्ह्यांमध्ये करण्यात आल्या आहेत. तथापि, शहर क्रमांक १ व शहर क्रमांक २ मध्ये एकूण ८ उपविभाग आहेत. या उपविभागांत थकबाकी वसुलीचे काम उत्कृष्ट झाले आहे काय, या प्रश्नावर गणेशकर म्हणाले की, उर्वरित उपविभागांमध्ये वसुली चांगलीच आहे, असे म्हणावे लागेल. तथापि, या आठ उपविभागांपैकी एकट्या छावणी उपविभागामध्ये ६० हजार ग्राहक संख्या आहे. उर्वरित उपविभागांमध्ये कुठे २०, तर कुठे ३० अशी ग्राहक संख्या असताना मनुष्यबळ मात्र सर्व ठिकाणी सारखेच आहे. असे असताना मुख्य अभियंत्यांनी एकट्या छावणी उपविभागाच्या अधिकाºयावर एकतर्फी कारवाई केल्याचा आरोप कर्मचाºयांच्या वतीने करण्यात आला आहे.