शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणला आर्थिक विवंचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 01:10 IST

शहरातील घरगुती, व्यावसायिक आणि उद्योजक ग्राहकांकडे तब्बल १३५ कोटी रुपयांची, तर परिमंडळांतर्गत औरंगाबाद आणि जालना या दोन जिल्ह्यांत कृषिपंपधारकांकडे ३९९ कोटी रुपयांची थकबाकी आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील घरगुती, व्यावसायिक आणि उद्योजक ग्राहकांकडे तब्बल १३५ कोटी रुपयांची, तर परिमंडळांतर्गत औरंगाबाद आणि जालना या दोन जिल्ह्यांत कृषिपंपधारकांकडे ३९९ कोटी रुपयांची थकबाकी आहे. या आठवड्यात शहरातील थकबाकी वसुलीसाठी मोहीम राबवून अहवाल सादर करण्याचे आदेश शाखा अभियंत्यांना दिले आहेत. याशिवाय कृषिपंपांची थकबाकी न भरणाºया ग्राहकांच्या विद्युत वाहिन्याच बंद करण्यात आल्या आहेत.यासंदर्भात मंगळवारी पत्रकारांशी बोलताना मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी सांगितले की, औरंगाबाद परिमंडळांतर्गत एकूण ६७४ वाहिन्या असून, यापैकी ५० टक्के वाहिन्या बंद करण्यात आल्या आहेत. बिल न भरणाºया कृषिपंपधारकांना वीजपुरवठा करणाºया वाहिन्या बंद करण्याचा निर्णय महावितरण कंपनीने घेतला आहे. कृषिपंपांना वीजपुरवठा करणाºया एकूण १६,००० रोहित्रांपैकी ७ हजार ९१४ बंद करण्यात आले आहेत. यामध्ये २८० रोहित्र नादुरुस्त आहेत. शेतकºयांनी थकबाकी भरल्याशिवाय रोहित्रांची दुरुस्ती केली जाणार नाही. सध्या १ लाख ७ हजार ३२९ कृषिपंप यामुळे बंद पडले असून, यांच्याकडे ३९९ कोटी रुपये एवढी थकबाकी आहे.शहरात १ लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेले २,२५० ग्राहक असून, त्यांच्याकडे ४३ कोटी रुपये एवढी थकबाकी आहे. यामध्ये घरगुती वापर असलेल्या ग्राहकांची संख्या सर्वाधिक आहे. या आठवड्यात सर्व शाखा अभियंत्यांना बिल दुरुस्ती, वसुली, वीजपुरवठा खंडित करून मीटर काढून आणण्याची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.दोन अधिकाºयांवरच कारवाईथकबाकी वसुलीमध्ये कमी पडलेले शहराचे कार्यकारी अभियंता अर्शद पठाण व छावणी उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विनय घनबहादूर या दोघांच्या बदल्या दुसºया जिल्ह्यांमध्ये करण्यात आल्या आहेत. तथापि, शहर क्रमांक १ व शहर क्रमांक २ मध्ये एकूण ८ उपविभाग आहेत. या उपविभागांत थकबाकी वसुलीचे काम उत्कृष्ट झाले आहे काय, या प्रश्नावर गणेशकर म्हणाले की, उर्वरित उपविभागांमध्ये वसुली चांगलीच आहे, असे म्हणावे लागेल. तथापि, या आठ उपविभागांपैकी एकट्या छावणी उपविभागामध्ये ६० हजार ग्राहक संख्या आहे. उर्वरित उपविभागांमध्ये कुठे २०, तर कुठे ३० अशी ग्राहक संख्या असताना मनुष्यबळ मात्र सर्व ठिकाणी सारखेच आहे. असे असताना मुख्य अभियंत्यांनी एकट्या छावणी उपविभागाच्या अधिकाºयावर एकतर्फी कारवाई केल्याचा आरोप कर्मचाºयांच्या वतीने करण्यात आला आहे.