शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

तेलाच्या पुनर्वापरातील खाद्यपदार्थ खाल्ल्यास कॅन्सरचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:02 IST

प्रशांत तेलवाडकर औरंगाबाद : चटपटीत, झणझणीत पदार्थ खायला प्रत्येकाला आवडते. हॉटेल किंवा हातगाडीवर खमंग भजे, कचोरी किंवा समोसे हे ...

प्रशांत तेलवाडकर

औरंगाबाद : चटपटीत, झणझणीत पदार्थ खायला प्रत्येकाला आवडते. हॉटेल किंवा हातगाडीवर खमंग भजे, कचोरी किंवा समोसे हे तेलकट पदार्थ असले तरी चवीने खाल्ले जातात. मात्र, वारंवार तळलेल्या खाद्यतेलातील पदार्थ खात असाल तर सावधान... जिभेचे चोचले पुरविण्याच्या नादात तुमच्या शरीरात वाईट कोलेस्टेरॉल वाढू शकते आणि कालांतराने हृदयविकार किंवा कॅन्सरचा धोका होऊ शकतो.

हे वाचून तुम्हाला धक्का बसला असेल. काही जण असेही म्हणतील की, आम्ही अनेक वर्षांपासून हॉटेलमधील चटपटीत पदार्थ खातो; पण आजपर्यंत काही झाले नाही, तर काहीजणांना हे बकवासही वाटेल. पण लक्षात घ्या वारंवार तळलेल्या खाद्यतेलातील पदार्थ खाणे धोकादायक आहे हे सत्य आहे. हॉटेलमध्ये एका कढईत एकदाच खाद्यतेल टाकून त्यास वारंवार तापविले जाते. त्यातून अनेक किलो भजे, समोसा, कचोरी, जिलेबी आदी पदार्थ तळले जातात. याचा कालांतराने गंभीर परिणाम खवय्यांच्या शरीरावर होत आहे हे निदर्शनात आल्यामुळे केंद्र सरकारने २०१९ पासून खाद्यतेलाच्या पुनर्वापराबाबत नवे नियम लागू केले आहेत.

चौकट

आरोग्याला घातक

वारंवार तळलेल्या तेलातील खाद्यपदार्थ सातत्याने खाण्यात आले की, शरीरात बॅड कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते. हृदयाला आणि मूत्रपिंड विकाराचा धोका निर्माण होतो.

चौकट

रस्त्यावर न खाल्लेलेच बरे

हॉटेल असो वा रस्त्याच्या कडेला टपरी, हातगाडी तिथे एकदा कडाईत तेल घेतले की, त्या तेलास वारंवार तापवून त्यातून अनेक किलो पदार्थ तळून काढले जातात. पैसे देऊन आपले आरोग्य खराब करून घेण्यापेक्षा अशा विक्रेत्यांकडून चटपटीत पदार्थ न खरेदी करता घरीच तयार करून खाल्लेले कधीही चांगले.

चौकट

हृदयात ब्लॉकेज निर्माण होऊ शकते

तसेच प्रत्येक खाद्यपदार्थामध्ये ट्रायग्लिसराइड्स भरपूर प्रमाणात असतात. खाद्यतेल उकळताना त्याचे ऑक्सिडेशन होऊन त्यात फ्री रेडिकल्स तयार होतात. हेच रेडिकल्स शरीरातील पेशींना मारक ठरू शकते. हृदयात ब्लॉकेज निर्माण होणे, हृदयाचा झटका येण्यापासून ते कॅन्सरपर्यंतचा धोका निर्माण होऊ शकतो.

- डॉ. तुषार चुडीवाल,

अतिरेक टाळा

कोणत्याही गोष्टीचा अतिरेक घातकच ठरतो. तसेच वारंवार एकाच तेलाला तापवून त्यातून तयार झालेले खाद्यपदार्थ वारंवार खाण्यात आले की, त्याचे दुष्परिणाम शरीरावर होतातच. शक्यतो हातगाड्या, हॉटेलवरील खाद्यपदार्थ वारंवार खाणे टाळा. महिन्यातून दोन वेळेला असे पदार्थ खाल्लेले पुरेसे.

- डाॅ. संदीप सानप

चौकट

२५ डिग्रीपेक्षा जास्त तापल्यास तेल होते खराब

खाद्यतेलाची गुणवत्ता तपासणीसाठी एक उपकरण मिळते. एखादे खाद्यतेल २५ डिग्रीपेक्षा जास्त तापले तर ते खराब होते. असे खाद्यतेल बायोडिझेल कंपन्यांना विकता येते. मात्र, त्याचा वापर पुन्हा पदार्थ तयार केला तर कायद्याने दंडात्मक कारवाई होऊ शकते. जास्तीत जास्त दहा लाखांपर्यंत दंड होऊ शकतो.

- एस.व्ही. कुलकर्णी, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन.

चौकट

एकाही विक्रेत्यावर नाही कारवाई

खाद्यतेलाचा वारंवार पुनर्वापर केल्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने अजून एकाही विक्रेत्यावर कारवाई केलेली नाही. सध्या अन्न प्रशासन शहरातील हॉटेलमध्ये तपासणी करत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.