शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

तेलाच्या पुनर्वापरातील खाद्यपदार्थ खाल्ल्यास कॅन्सरचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:02 IST

प्रशांत तेलवाडकर औरंगाबाद : चटपटीत, झणझणीत पदार्थ खायला प्रत्येकाला आवडते. हॉटेल किंवा हातगाडीवर खमंग भजे, कचोरी किंवा समोसे हे ...

प्रशांत तेलवाडकर

औरंगाबाद : चटपटीत, झणझणीत पदार्थ खायला प्रत्येकाला आवडते. हॉटेल किंवा हातगाडीवर खमंग भजे, कचोरी किंवा समोसे हे तेलकट पदार्थ असले तरी चवीने खाल्ले जातात. मात्र, वारंवार तळलेल्या खाद्यतेलातील पदार्थ खात असाल तर सावधान... जिभेचे चोचले पुरविण्याच्या नादात तुमच्या शरीरात वाईट कोलेस्टेरॉल वाढू शकते आणि कालांतराने हृदयविकार किंवा कॅन्सरचा धोका होऊ शकतो.

हे वाचून तुम्हाला धक्का बसला असेल. काही जण असेही म्हणतील की, आम्ही अनेक वर्षांपासून हॉटेलमधील चटपटीत पदार्थ खातो; पण आजपर्यंत काही झाले नाही, तर काहीजणांना हे बकवासही वाटेल. पण लक्षात घ्या वारंवार तळलेल्या खाद्यतेलातील पदार्थ खाणे धोकादायक आहे हे सत्य आहे. हॉटेलमध्ये एका कढईत एकदाच खाद्यतेल टाकून त्यास वारंवार तापविले जाते. त्यातून अनेक किलो भजे, समोसा, कचोरी, जिलेबी आदी पदार्थ तळले जातात. याचा कालांतराने गंभीर परिणाम खवय्यांच्या शरीरावर होत आहे हे निदर्शनात आल्यामुळे केंद्र सरकारने २०१९ पासून खाद्यतेलाच्या पुनर्वापराबाबत नवे नियम लागू केले आहेत.

चौकट

आरोग्याला घातक

वारंवार तळलेल्या तेलातील खाद्यपदार्थ सातत्याने खाण्यात आले की, शरीरात बॅड कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते. हृदयाला आणि मूत्रपिंड विकाराचा धोका निर्माण होतो.

चौकट

रस्त्यावर न खाल्लेलेच बरे

हॉटेल असो वा रस्त्याच्या कडेला टपरी, हातगाडी तिथे एकदा कडाईत तेल घेतले की, त्या तेलास वारंवार तापवून त्यातून अनेक किलो पदार्थ तळून काढले जातात. पैसे देऊन आपले आरोग्य खराब करून घेण्यापेक्षा अशा विक्रेत्यांकडून चटपटीत पदार्थ न खरेदी करता घरीच तयार करून खाल्लेले कधीही चांगले.

चौकट

हृदयात ब्लॉकेज निर्माण होऊ शकते

तसेच प्रत्येक खाद्यपदार्थामध्ये ट्रायग्लिसराइड्स भरपूर प्रमाणात असतात. खाद्यतेल उकळताना त्याचे ऑक्सिडेशन होऊन त्यात फ्री रेडिकल्स तयार होतात. हेच रेडिकल्स शरीरातील पेशींना मारक ठरू शकते. हृदयात ब्लॉकेज निर्माण होणे, हृदयाचा झटका येण्यापासून ते कॅन्सरपर्यंतचा धोका निर्माण होऊ शकतो.

- डॉ. तुषार चुडीवाल,

अतिरेक टाळा

कोणत्याही गोष्टीचा अतिरेक घातकच ठरतो. तसेच वारंवार एकाच तेलाला तापवून त्यातून तयार झालेले खाद्यपदार्थ वारंवार खाण्यात आले की, त्याचे दुष्परिणाम शरीरावर होतातच. शक्यतो हातगाड्या, हॉटेलवरील खाद्यपदार्थ वारंवार खाणे टाळा. महिन्यातून दोन वेळेला असे पदार्थ खाल्लेले पुरेसे.

- डाॅ. संदीप सानप

चौकट

२५ डिग्रीपेक्षा जास्त तापल्यास तेल होते खराब

खाद्यतेलाची गुणवत्ता तपासणीसाठी एक उपकरण मिळते. एखादे खाद्यतेल २५ डिग्रीपेक्षा जास्त तापले तर ते खराब होते. असे खाद्यतेल बायोडिझेल कंपन्यांना विकता येते. मात्र, त्याचा वापर पुन्हा पदार्थ तयार केला तर कायद्याने दंडात्मक कारवाई होऊ शकते. जास्तीत जास्त दहा लाखांपर्यंत दंड होऊ शकतो.

- एस.व्ही. कुलकर्णी, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन.

चौकट

एकाही विक्रेत्यावर नाही कारवाई

खाद्यतेलाचा वारंवार पुनर्वापर केल्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने अजून एकाही विक्रेत्यावर कारवाई केलेली नाही. सध्या अन्न प्रशासन शहरातील हॉटेलमध्ये तपासणी करत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.