शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
4
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
5
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
6
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
7
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
8
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
9
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
10
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
11
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
12
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
13
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
14
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
15
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
16
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
17
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
18
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
19
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
20
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य

तेलाच्या पुनर्वापरातील खाद्यपदार्थ खाल्ल्यास कॅन्सरचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:02 IST

प्रशांत तेलवाडकर औरंगाबाद : चटपटीत, झणझणीत पदार्थ खायला प्रत्येकाला आवडते. हॉटेल किंवा हातगाडीवर खमंग भजे, कचोरी किंवा समोसे हे ...

प्रशांत तेलवाडकर

औरंगाबाद : चटपटीत, झणझणीत पदार्थ खायला प्रत्येकाला आवडते. हॉटेल किंवा हातगाडीवर खमंग भजे, कचोरी किंवा समोसे हे तेलकट पदार्थ असले तरी चवीने खाल्ले जातात. मात्र, वारंवार तळलेल्या खाद्यतेलातील पदार्थ खात असाल तर सावधान... जिभेचे चोचले पुरविण्याच्या नादात तुमच्या शरीरात वाईट कोलेस्टेरॉल वाढू शकते आणि कालांतराने हृदयविकार किंवा कॅन्सरचा धोका होऊ शकतो.

हे वाचून तुम्हाला धक्का बसला असेल. काही जण असेही म्हणतील की, आम्ही अनेक वर्षांपासून हॉटेलमधील चटपटीत पदार्थ खातो; पण आजपर्यंत काही झाले नाही, तर काहीजणांना हे बकवासही वाटेल. पण लक्षात घ्या वारंवार तळलेल्या खाद्यतेलातील पदार्थ खाणे धोकादायक आहे हे सत्य आहे. हॉटेलमध्ये एका कढईत एकदाच खाद्यतेल टाकून त्यास वारंवार तापविले जाते. त्यातून अनेक किलो भजे, समोसा, कचोरी, जिलेबी आदी पदार्थ तळले जातात. याचा कालांतराने गंभीर परिणाम खवय्यांच्या शरीरावर होत आहे हे निदर्शनात आल्यामुळे केंद्र सरकारने २०१९ पासून खाद्यतेलाच्या पुनर्वापराबाबत नवे नियम लागू केले आहेत.

चौकट

आरोग्याला घातक

वारंवार तळलेल्या तेलातील खाद्यपदार्थ सातत्याने खाण्यात आले की, शरीरात बॅड कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते. हृदयाला आणि मूत्रपिंड विकाराचा धोका निर्माण होतो.

चौकट

रस्त्यावर न खाल्लेलेच बरे

हॉटेल असो वा रस्त्याच्या कडेला टपरी, हातगाडी तिथे एकदा कडाईत तेल घेतले की, त्या तेलास वारंवार तापवून त्यातून अनेक किलो पदार्थ तळून काढले जातात. पैसे देऊन आपले आरोग्य खराब करून घेण्यापेक्षा अशा विक्रेत्यांकडून चटपटीत पदार्थ न खरेदी करता घरीच तयार करून खाल्लेले कधीही चांगले.

चौकट

हृदयात ब्लॉकेज निर्माण होऊ शकते

तसेच प्रत्येक खाद्यपदार्थामध्ये ट्रायग्लिसराइड्स भरपूर प्रमाणात असतात. खाद्यतेल उकळताना त्याचे ऑक्सिडेशन होऊन त्यात फ्री रेडिकल्स तयार होतात. हेच रेडिकल्स शरीरातील पेशींना मारक ठरू शकते. हृदयात ब्लॉकेज निर्माण होणे, हृदयाचा झटका येण्यापासून ते कॅन्सरपर्यंतचा धोका निर्माण होऊ शकतो.

- डॉ. तुषार चुडीवाल,

अतिरेक टाळा

कोणत्याही गोष्टीचा अतिरेक घातकच ठरतो. तसेच वारंवार एकाच तेलाला तापवून त्यातून तयार झालेले खाद्यपदार्थ वारंवार खाण्यात आले की, त्याचे दुष्परिणाम शरीरावर होतातच. शक्यतो हातगाड्या, हॉटेलवरील खाद्यपदार्थ वारंवार खाणे टाळा. महिन्यातून दोन वेळेला असे पदार्थ खाल्लेले पुरेसे.

- डाॅ. संदीप सानप

चौकट

२५ डिग्रीपेक्षा जास्त तापल्यास तेल होते खराब

खाद्यतेलाची गुणवत्ता तपासणीसाठी एक उपकरण मिळते. एखादे खाद्यतेल २५ डिग्रीपेक्षा जास्त तापले तर ते खराब होते. असे खाद्यतेल बायोडिझेल कंपन्यांना विकता येते. मात्र, त्याचा वापर पुन्हा पदार्थ तयार केला तर कायद्याने दंडात्मक कारवाई होऊ शकते. जास्तीत जास्त दहा लाखांपर्यंत दंड होऊ शकतो.

- एस.व्ही. कुलकर्णी, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन.

चौकट

एकाही विक्रेत्यावर नाही कारवाई

खाद्यतेलाचा वारंवार पुनर्वापर केल्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने अजून एकाही विक्रेत्यावर कारवाई केलेली नाही. सध्या अन्न प्रशासन शहरातील हॉटेलमध्ये तपासणी करत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.