शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना राहुल गांधींच्या घरी मागे बसवलं? संजय राऊत म्हणाले, "आम्हाला स्क्रीन समोर बसून पाहताना..."
2
'शपथ पत्रावर सही करा नाहीतर देशाची माफी मागा'; निवडणूक आयोगाने राहुल गांधींना दिले दोन पर्याय
3
“उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेल्यापासून राहुल गांधी मातोश्रीवर गेले का?”; भाजपाचा सवाल
4
पीएम मोदी मोठा निर्णय घेणार; अमेरिकेच्या ५० टक्के कर आकारणीबाबत मंत्रिमंडळाची बैठक
5
"मी विधवा झाली", पत्नीच्या डोळ्यासमोर पतीची हत्या; हुमा कुरेशीच्या वहिनीने सांगितलं काय घडलं?
6
शरणू हांडेचं अपहरण करणारा 'तो' युवक आणि मास्टरमाईंड कोण?; गोपीचंद पडळकरांचा खळबळजनक आरोप
7
Kapil Sharma : "जो सलमानसोबत काम करेल तो मरेल", कॅफे गोळीबारानंतर लॉरेन्स गँगची कपिल शर्माला धमकी
8
३ दिवसांत ६०% पेक्षा जास्त तेजी; ८०० रुपयांचा शेअर आता १२९९ पार, तुमच्याकडे आहे का?
9
Duleep Trophy 2025 : ज्युनिअरच्या नेतृत्वाखाली कर्तृत्व दाखवण्यासाठी मैदानात उतरणार हे २ सिनियर्स
10
सारखा भाऊच का? रक्षाबंधनाला बहिणीने ओवाळणी द्यायची की भावाने? भाऊबीजेचे काय, वाचा यमाची कथा...
11
थरारक! गोपीचंद पडळकर समर्थकाचं फिल्मी स्टाईल अपहरण; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव
12
Video - 'ते' आले अन् धारदार शस्त्रांनी केला हल्ला; हुमा कुरेशीच्या भावाच्या हत्येचे CCTV फुटेज
13
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
14
पालकमंत्रिपदाचा तिढा सुटेना; आता ध्वजवंदनावरून वादंग; १५ ऑगस्टचा मान गोगावलेंना देण्याची मागणी
15
पाक क्रिकेटर बलात्कार प्रकरणात अडकला; पोलिसांनी मॅच सुरु असतानाच ठोकल्या बेड्या
16
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
17
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
18
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
19
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
20
तिसरा श्रावण शनिवार: तुमची साडेसाती सुरू आहे? अश्वत्थ मारुती पूजनासह ‘हे’ ५ शनि उपाय कराच!

आमदनी अठन्नी खर्चा रुपया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2016 00:43 IST

औरंगाबाद : शासनाने विविध कल्याणकारी योजना, विकास कामांसाठी मागील दीड ते दोन वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे.

औरंगाबाद : शासनाने विविध कल्याणकारी योजना, विकास कामांसाठी मागील दीड ते दोन वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. त्यामुळे तिजोरीत ८२ कोटी रुपये पडून आहेत. हा निधी दुसऱ्या विकास कामांसाठी अजिबात वापरता येत नाही. मागील काही दिवसांपासून उत्पन्न दररोज फक्त २० ते ३० लाख रुपये एवढे तुटपुंजे येत आहे. मनपावर दररोजचा खर्च ९० लाख असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मनपाने तयार केलेल्या अर्थसंकल्पानुसार जुलै अखेरपर्यंत तिजोरीत ३५८ कोटी ६८ लाख रुपये अपेक्षित होते. प्रत्यक्षात १९३ कोटी ८३ लाख रुपये आले. तुटीचा आकडा १६४ कोटी ८५ लाख आहे.मंगळवारी सकाळी ११ वाजता महापालिकेत महापौर त्र्यंबक तुपे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस उपमहापौर प्रमोद राठोड, सभागृहनेता राजेंद्र जंजाळ, विरोधी पक्षनेता अय्युब जहागीरदार, गटनेता भाऊसाहेब जगताप, नासेर सिद्दीकी, गजानन बारवाल यांची उपस्थिती होती. बैठकीच्या सुरुवातीला तिजोरीत ८२ कोटी रुपये आले कोठून असा प्रश्न करण्यात आला. मुख्य लेखाधिकारी संजय पवार यांनी खुलासा केला की, विविध योजनांच्या (पान ५ वर)महापालिकेतील आर्थिक परिस्थिती पाहून मनपा पदाधिकारी क्षणभर ‘झिंगाट’झाले होते. बैठकीत काय बोलावे हो कोणालाही सूचत नव्हते. ४मागील आठ-दहा बैठकांपासून पदाधिकारी वसुली वाढवा, विकासकामे करा अशा सूचना वारंवार देण्यात येत आहे. यातील एकाही सूचनेचे पालन प्रशासनाने केले नाही. प्रशासन जर आमचे ऐकणारच नसेल तर यापुढे आम्ही पंधरा दिवसांतून एकदा घेण्यात येणारी आढावा बैठकही घेणार नसल्याचे महापौरांनी सांगितले.शहरातील खड्डे, पाणी, डेंग्यू, पथदिवे, वॉर्डातील विकासकामे आदी सर्वच आघाड्यांवर प्रशासन अपयशी ठरले आहे. ४प्रशासनाने शहराची अक्षरश: वाट लावून टाकावी. आम्हाला आता जे करायचे आहे, ते सर्वसाधारण करून दाखवू असा इशारा महापौरांनी दिला. पुढच्या वेळेस हे नगरसेवक निवडूनच येऊ नये असा डावच प्रशासनाने रचल्याचा आरोप सभागृहनेता राजेंद्र जंजाळ यांनी केला. शहराच्या विकासावर आयुक्तांशी चर्चा करण्यात येईल, असेही यावेळी सांगण्यात आले.शहराची अवस्था एखाद्या तालुक्यासारखी झाली आहे. महापालिकेसारख्या कोणत्याच सोयीसुविधा नागरिकांना मिळत नाही. उलट नागरिकांकडून महापालिकेचा कर वसूल करण्यात येत आहे. सर्वसाधारण सभेत मनपा नको नगर परिषद करा असा ठराव ठेवा असा सल्ला नगरसेवक नासेर खान यांनी दिला. शासनाला किमान आपल्या भावना तरी या ठरावामुळे कळतील, असेही त्यांनी नमूद केले.