शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

ड्यूटी फुलटाईम; पगार मात्र अर्धाच!

By admin | Updated: July 7, 2015 00:57 IST

सुनील कच्छवे ,औरंगाबाद राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत काम करणाऱ्या १३० कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने अचानक ‘अर्धवेळ’ ठरविले आहे.

सुनील कच्छवे ,औरंगाबादराष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत काम करणाऱ्या १३० कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने अचानक ‘अर्धवेळ’ ठरविले आहे. आठ महिने सेवा बजावल्यानंतर आणि त्यातील सहा महिन्यांचा पूर्ण पगार दिल्यानंतर मनपाच्या आरोग्य विभागाला वरील साक्षात्कार झाला. परिणामी अर्धाच पगार हाती पडल्यामुळे हे कर्मचारी अडचणीत आले आहेत. दरम्यान, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर महापालिका आयुक्त प्रकाश महाजन यांनी त्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत महानगरपालिकेत गतवर्षी आॅक्टोबर महिन्यात १३० आरोग्य कर्मचाऱ्यांची कंत्राटी तत्त्वावर भरती करण्यात आली. यामध्ये यामध्ये ७८ एएनएम, १४ फार्मासिस्ट, १४ लॅब टेक्निशियन आणि २६ परिचारिकांचा समावेश आहे. मनपाला या कर्मचाऱ्यांचे पगार करण्यासाठी केंद्र सरकारकडून दरमहा अनुदान मिळते. आॅक्टोबरपासून मार्च महिन्यापर्यंत या कर्मचाऱ्यांना नियुक्तीच्या वेळी ठरल्याप्रमाणे पगार मिळत गेला. त्यानंतर एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांचा पगार मात्र वेळेवर झाला नाही. मनपाच्या आरोग्य विभागाने पगार थकविल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून हे कर्मचारी मनपात चकरा मारत होते. त्यांनी मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री कुलकर्णी यांच्यासह मनपाच्या पदाधिकाऱ्यांचीही भेट घेतली. त्यानंतर मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. कुलकर्णी यांनी या कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या फाईलवर सही केली. परंतु कर्मचाऱ्यांच्या हातात पगार पडला तेव्हा त्यांना आनंद होण्याऐवजी धक्काच बसला. आरोग्य विभागाने या कर्मचाऱ्यांना अचानक अर्धवेळ ठरवीत त्यांना मागील तीन महिन्यांचा निम्माच पगार दिला आहे. त्यामुळे हादरलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी पुन्हा मनपात येऊन अधिकारी-पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. तुम्ही अर्धवेळ कामावर होता असे गृहित धरून तुमचे पगार काढण्यात आले आहेत, असे त्यांना आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु पूर्णवेळ नियुक्ती असताना अर्धवेळ कसे ठरवता असा सवाल या कर्मचाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांकडे केला.मनपा आयुक्त प्रकाश महाजन यांचीही संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांनी नुकतीच भेट घेतली. कर्मचाऱ्यांनी संपूर्ण प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. ४त्यानंतर यामध्ये गडबड झाल्याचे लक्षात येताच मनपा आयुक्तांनी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. लवकरच आयुक्तांना या प्रकरणाचा अहवाल सादर होणार आहे.शहरी आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांची पूर्णवेळ भरती करण्यात आलेली आहे. मात्र त्यांच्या निम्माच पगार मंजूर करण्यात आला आहे. मी अतिरिक्त पदभार स्वीकारण्यापूर्वीच त्यांच्या पगाराची फाईल मंजूर झालेली आहे. त्यामुळे असे का घडले हे मला सांगता येणार नाही. पण आयुक्तांनी या प्रकाराच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. - डॉ. संध्या टाकळीकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपामनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री कुलकर्णी या नुकत्याच परदेशी गेल्या आहेत. त्यांनी परदेशी जाण्यापूर्वी या कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या फाईलला मंजुरी दिली. आधीचे सहा महिने त्यांच्याच स्वाक्षरीने या सर्व कर्मचाऱ्यांना पूर्णवेळ पगार मिळत गेला. मग अचानक आताच त्यांना अर्धवेळ का ठरविले गेले, याचे उत्तर मिळालेले नाही.