शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

प्रक्रियेचा खोडा

By admin | Updated: April 12, 2016 00:37 IST

राजेश खराडे , बीड मागेल त्याला शेततळे या योजनेअंतर्गत जिल्हाभरातून आॅनलाईन व प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी कार्यालयाकडे जमा केलेल्या अर्जांची संख्या हजारोंच्या घरात आहे.

राजेश खराडे , बीडमागेल त्याला शेततळे या योजनेअंतर्गत जिल्हाभरातून आॅनलाईन व प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी कार्यालयाकडे जमा केलेल्या अर्जांची संख्या हजारोंच्या घरात आहे. योजनेचे केवळ तीन दिवस उरले असताना जिल्ह्यात केवळ २६९ शेततळ्यांच्या कामांना सुरवात झाली आहे. अनेक शेततळी प्रक्रियेत रखडलेली आहेत. योजनेला सुरुवात होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटला आहे. अनुदान रक्कम तोकडी असल्याने अगोदरच शेतकऱ्यांनी योजनेकडे पाठ फिरवली आहे. आॅनलाईन ७८५०, तर प्रत्यक्ष कार्यालयात ३७६० अर्ज दाखल झाले आहेत. योजना शेवटच्या टप्प्यात आली तरी २४०० शेततळ्यांचे उद्दिष्ट असताना जिल्हाभरात केवळ २६९ शेततळ्यांचा कार्यारंभ झाला आहे. २९ फेब्रुवारीपासून आॅनलाईन अर्ज येण्यास प्रारंभ झाला होता. आॅनलाईनचा घोळ शेतकऱ्यांच्या लक्षात न आल्याने एकाच अर्जदाराने अनेक वेळा अर्ज भरले आहेत. त्यामुळे आॅनलाईन प्रस्तावांचा आकडा फुगलेला आहे. अर्ज दाखल होताच त्यानुसार त्याची मोका तपासणी, क्षेत्रीय तपासणी करून पात्र- अपात्र, अर्जांची यादी उपजिल्हाधिकारी यांच्यासमोर मांडून तांत्रिक अडचणी सोडविल्या जातात व सरते शेवटी विभाग प्रमुखाकडून मंजुरी घेऊन कार्यरंभ होतो. ही प्रक्रीया किचकट असल्याने मंजुरीला विलंब होत आहे. यंदाच्या वर्षाचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी १५ एप्रिलची डेडलाईन आहे. आॅनलाईनद्वारे प्रस्तावंचा ओघ वाढत आहे. नियोजनाचा अभावयोजनेच्या सुरवातीपासून आॅनलाईन अर्जाची छाणनी, त्याची नोंद जिल्हा कृषी कार्यालयाकडे होणे गरजेचे होते. तालुकानिहाय किती अर्ज दाखल होत असताना त्याची नोंदही कार्यालयात नव्हती. त्यामुळे अंतिम प्रक्रीयेत गोंधळ उडाला आहे. प्राधान्य कुणाला द्यावेआॅनलाईनद्वारे अर्ज स्वीकरण्यास २९ फेब्रुवरीला सुरवात झाली. वेबसाईटमध्ये सातत्याने अडथळा निर्माण होत असल्याने पहिला मान कुणाला द्यावा हा प्रश्न वेळोवेळी उपस्थित होत आहे. खातरजमा करून घेण्यासाठी एकाच शेतकऱ्याने दोन-दोन वेळा अर्ज भरला आहे. त्यामुळे प्रस्तावांचा आकडा फुगला असला तरी छाणनीमध्ये अधिकाऱ्यांना अडचण निर्माण होत आहे. जनजागृतीचा आभावसध्याची दुष्काळी परिस्थितीमुळे प्रशासकीय स्तरावर मागेल त्याला शेततळे योजनेला अन्यनसाधारण महत्व होते. त्यानुसार जनजागृती करण्याच्या सुचना वेळोवेळी देण्यात येत होत्या. पोस्टरबाजी, योजनेची माहिती, गावस्तरावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे अपेक्षित होते. काही तालुके वगळता शेतकऱ्यांबरोबर अधिकाऱ्यांचीही योजनेबाबत उदासिनता होती.