शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधीच्या अनुदान वाटपास बँकांचा खोडा

By admin | Updated: July 2, 2014 00:32 IST

हिंगोली : गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने मदत दिली असली तरी ही मदत गरजू शेतकऱ्यांपर्यंत तत्काळ पोहोचविण्यात बँकांच खोडा घालत असल्याने शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित राहावे लागत आहे.

हिंगोली : गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने मदत दिली असली तरी ही मदत गरजू शेतकऱ्यांपर्यंत तत्काळ पोहोचविण्यात बँकांच खोडा घालत असल्याने शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित राहावे लागत आहे. गेल्या हंगामात गारपीट व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसान भरपाईपोटी जिल्ह्याला ३ टप्प्यात एकूण ३६ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात ११ कोटी रुपयांचा निधी ५ तालुक्यांना वितरीत करण्यात आला. त्यानंतर ७ एप्रिल रोजी ८ कोटी रुपयांचा निधी पाचही तालुक्यांना वितरीत करण्यात आला. त्यानंतर १५ मे रोजी १७ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी पाचही तहसील कार्यालयांना देण्यात आला. त्यानुसार आतापर्यंत हिंगोली तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी १२ कोटी ९ लाख १७ हजार ४२५ रुपये, कळमनुरी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ४ कोटी ९२ लाख ३० हजार रुपये, सेनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ८ कोटी ४९ लाख ४७ हजार ५०० रुपये, वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ९ कोटी ६५ लाख ८ हजार ५७५ रुपये आणि औंढा नागनाथ तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी १ कोटी ५८ लाख ९६ हजार ५०० रुपये असा एकूण ३६ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी पाचही तालुक्यांना वितरीत करण्यात आला. संपूर्ण निधी वितरीत करून तब्बल दीड महिना झाला तरी संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अद्यापही पैसे जमा झालेले नाहीत. ज्या बँकांना शेतकऱ्यांची नावे व खाते क्रमांक देण्यात आले, त्यातील अनेक बँकांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यास टाळाटाळ सुरू केली आहे. परिणामी शेतकरी या बँकांच्या चकरा मारूनही त्यांना पैसे मात्र मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. बँकां पात्र शेतकऱ्यांच्या याद्या अजूनही बँकेत लावण्याचे कामच करीत आहेत. त्यामुळे त्या शेतकऱ्यांच्या खात्यांवर पैसे कधी जमा होतील? असा सवाल उपस्थित होत आहे. काही खासगी बँकांनी हा निधी मिळावा, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात वजन खर्ची घातले. त्यामुळे त्यांना निधीही मिळाला; परंतु संबंधित शेतकऱ्यांचे बँक खाते व नाव यांचे गणित जुळत नसल्याने तसेच या खासगी बँकांच्या कामाचा व्याप आणि ग्रामीण भागात नसलेले जाळे यामुळे अडचणींमध्ये भर पडला आहे. शिवाय काही प्रमुख बँकांमध्ये कोअर बँकिंगची समस्या जाणवत असल्याने त्याचा या निधी वितरणावर परिणाम होत आहे. अशातच मदत देण्यात येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढल्याने त्या बँकांकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्यानेही निधी वितरणास वेळ लागत आहे. याचा त्रास मात्र शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)बँकांच्या निधी वितरणाचा आढावाच होईनाजिल्ह्यातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाने तहसील कार्यालयामार्फत मदतनिधी दिला. तहसील कार्यालयाने सदरील निधी व पात्र शेतकऱ्यांची यादी बँकांना दिली. बँकांनी हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला की नाही? याचा मात्र आढावा वरिष्ठ पातळीवरून घेतला जात नसल्याचे दिसून आले. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वारंवार यासंदर्भातील माहिती मागवूनही ती उपलब्ध होऊ शकली नाही. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयालाही बँकांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर किती निधी जमा केला ? याचीच माहिती नाही. शासनाला माहिती पाठविण्याच्या तक्त्यात तहसील कार्यालयाकडून सर्व निधी बँकांना पाठविल्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला जातो व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सर्व निधीचे वितरण केल्याचा अहवाल राज्य शासनाला पाठविला जातो; परंतु बँकांकडून अहवाल मिळविण्याची तसदी मात्र या कार्यालयांकडून घेण्यात येत नसल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.तांत्रिक कारणांचा घेतला जातोय आधारजिल्ह्यात गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाने तीन टप्प्यात दिली मदत. जिल्हा प्रशासनाने पहिल्या टप्प्यात २ एप्रिल रोजी ११ कोटी रुपये, ७ एप्रिल रोजी ८ कोटी रुपये आणि १५ मे रोजी १७ कोटी ७५ लाख रुपये वितरीत केले तहसीलदारांना. जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे १२ कोटी ९ लाख १७ हजार ४२५ रुपये देण्यात आले हिंगोली तालुक्यातील शेतकऱ्यांना. जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे १ कोटी ५८ लाख ९६ हजार ५०० रुपये देण्यात आले औंढा नागनाथ तालुक्यातील शेतकऱ्यांना. मनुष्यबळ अपुरे असल्याचे तसेच शेतकऱ्यांची यादी व बँक खाते क्रमांक जुळविताना अडचण येत असल्याचे कारण सांगितले जातेय बँकांकडून.खासगी बँकांकडूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यास होतेय टाळाटाळ.