शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
5
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
6
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
7
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
8
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
9
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
10
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
11
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
12
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
13
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
14
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
15
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
16
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
18
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
19
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
20
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम

कोट्यवधीच्या अनुदान वाटपास बँकांचा खोडा

By admin | Updated: July 2, 2014 00:32 IST

हिंगोली : गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने मदत दिली असली तरी ही मदत गरजू शेतकऱ्यांपर्यंत तत्काळ पोहोचविण्यात बँकांच खोडा घालत असल्याने शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित राहावे लागत आहे.

हिंगोली : गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने मदत दिली असली तरी ही मदत गरजू शेतकऱ्यांपर्यंत तत्काळ पोहोचविण्यात बँकांच खोडा घालत असल्याने शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित राहावे लागत आहे. गेल्या हंगामात गारपीट व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसान भरपाईपोटी जिल्ह्याला ३ टप्प्यात एकूण ३६ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात ११ कोटी रुपयांचा निधी ५ तालुक्यांना वितरीत करण्यात आला. त्यानंतर ७ एप्रिल रोजी ८ कोटी रुपयांचा निधी पाचही तालुक्यांना वितरीत करण्यात आला. त्यानंतर १५ मे रोजी १७ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी पाचही तहसील कार्यालयांना देण्यात आला. त्यानुसार आतापर्यंत हिंगोली तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी १२ कोटी ९ लाख १७ हजार ४२५ रुपये, कळमनुरी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ४ कोटी ९२ लाख ३० हजार रुपये, सेनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ८ कोटी ४९ लाख ४७ हजार ५०० रुपये, वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ९ कोटी ६५ लाख ८ हजार ५७५ रुपये आणि औंढा नागनाथ तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी १ कोटी ५८ लाख ९६ हजार ५०० रुपये असा एकूण ३६ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी पाचही तालुक्यांना वितरीत करण्यात आला. संपूर्ण निधी वितरीत करून तब्बल दीड महिना झाला तरी संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अद्यापही पैसे जमा झालेले नाहीत. ज्या बँकांना शेतकऱ्यांची नावे व खाते क्रमांक देण्यात आले, त्यातील अनेक बँकांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यास टाळाटाळ सुरू केली आहे. परिणामी शेतकरी या बँकांच्या चकरा मारूनही त्यांना पैसे मात्र मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. बँकां पात्र शेतकऱ्यांच्या याद्या अजूनही बँकेत लावण्याचे कामच करीत आहेत. त्यामुळे त्या शेतकऱ्यांच्या खात्यांवर पैसे कधी जमा होतील? असा सवाल उपस्थित होत आहे. काही खासगी बँकांनी हा निधी मिळावा, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात वजन खर्ची घातले. त्यामुळे त्यांना निधीही मिळाला; परंतु संबंधित शेतकऱ्यांचे बँक खाते व नाव यांचे गणित जुळत नसल्याने तसेच या खासगी बँकांच्या कामाचा व्याप आणि ग्रामीण भागात नसलेले जाळे यामुळे अडचणींमध्ये भर पडला आहे. शिवाय काही प्रमुख बँकांमध्ये कोअर बँकिंगची समस्या जाणवत असल्याने त्याचा या निधी वितरणावर परिणाम होत आहे. अशातच मदत देण्यात येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढल्याने त्या बँकांकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्यानेही निधी वितरणास वेळ लागत आहे. याचा त्रास मात्र शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)बँकांच्या निधी वितरणाचा आढावाच होईनाजिल्ह्यातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाने तहसील कार्यालयामार्फत मदतनिधी दिला. तहसील कार्यालयाने सदरील निधी व पात्र शेतकऱ्यांची यादी बँकांना दिली. बँकांनी हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला की नाही? याचा मात्र आढावा वरिष्ठ पातळीवरून घेतला जात नसल्याचे दिसून आले. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वारंवार यासंदर्भातील माहिती मागवूनही ती उपलब्ध होऊ शकली नाही. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयालाही बँकांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर किती निधी जमा केला ? याचीच माहिती नाही. शासनाला माहिती पाठविण्याच्या तक्त्यात तहसील कार्यालयाकडून सर्व निधी बँकांना पाठविल्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला जातो व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सर्व निधीचे वितरण केल्याचा अहवाल राज्य शासनाला पाठविला जातो; परंतु बँकांकडून अहवाल मिळविण्याची तसदी मात्र या कार्यालयांकडून घेण्यात येत नसल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.तांत्रिक कारणांचा घेतला जातोय आधारजिल्ह्यात गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाने तीन टप्प्यात दिली मदत. जिल्हा प्रशासनाने पहिल्या टप्प्यात २ एप्रिल रोजी ११ कोटी रुपये, ७ एप्रिल रोजी ८ कोटी रुपये आणि १५ मे रोजी १७ कोटी ७५ लाख रुपये वितरीत केले तहसीलदारांना. जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे १२ कोटी ९ लाख १७ हजार ४२५ रुपये देण्यात आले हिंगोली तालुक्यातील शेतकऱ्यांना. जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे १ कोटी ५८ लाख ९६ हजार ५०० रुपये देण्यात आले औंढा नागनाथ तालुक्यातील शेतकऱ्यांना. मनुष्यबळ अपुरे असल्याचे तसेच शेतकऱ्यांची यादी व बँक खाते क्रमांक जुळविताना अडचण येत असल्याचे कारण सांगितले जातेय बँकांकडून.खासगी बँकांकडूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यास होतेय टाळाटाळ.