शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

डमी बातमी चॉकलेट नको, मला सॅनिटायझर हवे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:02 IST

औरंगाबाद : शाळेत जाण्यासाठी मुले निघाली की त्याच्याआधी शाळेचे ओळखपत्र, तासिकांनुसार वह्या आणि पुस्तके, पेन-पेन्सिल, बूट-सॉक्स सगळे निटनेटके आहे ...

औरंगाबाद : शाळेत जाण्यासाठी मुले निघाली की त्याच्याआधी शाळेचे ओळखपत्र, तासिकांनुसार वह्या आणि पुस्तके, पेन-पेन्सिल, बूट-सॉक्स सगळे निटनेटके आहे की नाही याची विद्यार्थी व्यवस्थितपणे पाहणी करून घ्यायचे. या यादीत आता मास्क आणि सॅनिटायझरची भर पडली असून, एक वेळ मुले चॉकलेट नको म्हणतील, पण सॅनिटायझर आणि मास्क मात्र आवर्जून हवेच अशी मागणी करीत आहेत.

कोरोनामुळे मुलांचे शैक्षणिक वर्ष पूर्णपणे ढवळून निघाले आहे. अनेक मुले शाळा सुरू होण्याची वाट पाहत होते. शाळा सुरू झाली आणि दप्तरामध्ये वह्या- पुस्तकांसोबत सॅनिटायझर ठेवण्याचे नवेच काम विद्यार्थ्यांच्या मागे सुरू झाले.

अर्थातच जवळपास सर्वच शाळांमध्ये ठिकठिकाणी सॅनिटायझर मशीन बसविण्यात आले आहेत; पण तरीही विद्यार्थ्यांनी स्वत:ची सुरक्षा म्हणून त्यांच्या सोबत सॅनिटायझरची एक छोटी बाटली ठेवावी, असेही काही शाळांमधून सुचविण्यात आले आहे. मास्क तर आता इतकी अनिवार्य गोष्ट झाली आहे की, पूर्वी मास्कशिवाय आपण शाळेत यायचो, याचाही जणू विद्यार्थ्यांना विसर पडला आहे.

चौकट :

जिल्ह्यातील शाळांची सद्य:स्थिती

- पाचवी ते आठवीच्या एकूण शाळा- २५०० पेक्षा अधिक

- विद्यार्थ्यांची उपस्थिती- ५० टक्क्यांपेक्षा कमी

- शिक्षकांची उपस्थिती- ९० टक्क्यांपेक्षा अधिक

चौकट :

एकही बाधित नाही

९ वी-१० वीच्या शाळा सुरू होऊन महिनाभरापेक्षा अधिक काळ उलटून गेला आहे. ५ वी ते ८ वीचे वर्गही आता काही दिवसांपासून सुरू झाले आहेत; परंतु शाळा, विद्यार्थी आणि पालक यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे आतापर्यंत शाळेतून विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची एकही घटना जिल्ह्यात अधिकृतपणे नोंदविण्यात आलेली नाही. त्यामुळे शाळा सुरू होऊनही कोरोना मर्यादेतच राहिल्याचे सकारात्मक चित्र आहे.

विद्यार्थी म्हणतात-

१. पूर्वी आमच्या वर्गात ४० विद्यार्थी होते. आता हे विद्यार्थी दोन गटांत विभागण्यात आले आहेत. शाळेत ठिकठिकाणी सॅनिटायझर मशीन बसविलेले आहेत; पण तरीही आम्ही प्रत्येक जण आमच्यासोबत सॅनिटायझरची एक लहान बाटली आवर्जून ठेवतो.

गोकुळ सारडा

२. शाळेत गेल्यावर प्रत्येक विद्यार्थ्याला आधी स्वच्छ हात धुवावे लागतात. त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याचे तापमान तपासले जाते आणि त्यानंतरच शाळेच्या आवारात प्रवेश करता येतो. मास्क आणि सॅनिटायझर याशिवाय शाळेत प्रवेश नाही. - मरिअम मिर्झा

३. रोज केवळ दीड तास शाळा असते आणि ती देखील एक दिवसाआड. शाळेत जाताना आता वह्या-पुस्तके, पेन-पेन्सिल हे साहित्य घेेणे जितके आवश्यक झाले आहे, तितकेच मास्क अनिवार्य आहे. सॅनिटायझर शाळेत ठिकठिकाणी असल्याने त्याची तेवढी सक्ती नाही.

- अंकित बिरारे