शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

रिक्त पदांमुळे अन्न-औषध ‘आॅक्सिजन’वर

By admin | Updated: May 3, 2015 00:59 IST

शिरीष शिंदे , बीड अन्न व औषध प्रशासन विभागातील सात पदे रिक्त असल्यामुळे उपलब्ध अधिकाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. एका औषध निरीक्षकावर १३३७ औषधी दुकानांचा कारभार आहे

शिरीष शिंदे , बीडअन्न व औषध प्रशासन विभागातील सात पदे रिक्त असल्यामुळे उपलब्ध अधिकाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. एका औषध निरीक्षकावर १३३७ औषधी दुकानांचा कारभार आहे तर केवळ प्रभारी सहायक अन्न व एका सुरक्षा अधिकाऱ्यावरच जवळपास १० हजार छोट्यामोठ्या दुकानांच्या तपासणीची जबाबदारी आहे. एकंदरीत हे कार्यालय अधिकारी व कर्मचाऱ्यांअभावी आॅक्सिजनवर आहे.अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा संबंधी व औषध सुरक्षा संबंधी सर्व बाबींवर नियंत्रण असते. पहायला गेले तर या कार्यालयाकडे मोठी जबाबदारी आहे. परंतु या कार्यालयातील पदे वर्षानुवर्षे रिक्त आहेत. यामुळे कारभार ढेपाळला आहे.दरम्यान, जिल्ह्यात सद्य परिस्थितीला १ हजार १८७ औषधी दुकाने आहेत. होलसेल औषधी दुकानांची संख्या १५० आहे असे मिळून १ हजार ३३७ औषधी दुकाने आहेत. चार रक्तपेढ्या तर आठ रक्त साठवणूक केंद्रे आहेत. त्यात गेवराई, माजलगाव, परळी, केज, बीड, अंबाजोगाई, नेकनूर येथील केंद्रांचा समावेश आहे. औषधी विभागाकडे सदरील सर्व औषधी दुकानांचे परवाने नूतनीकरण, नोंदणीकरण, सॅम्पल काढणे, औषधी दुकानावर फार्मासिस्ट आहे की नाही याची तपासणी करणे तसेच न्यायालयात दाखल झालेल्या प्रकरणासाठी हजर राहणे ही प्रमुख जबाबदारी अधिकाऱ्यांवर असते. मात्र, सद्य परिस्थितीला औषध विभागात सहायक आयुक्त, औषध निरीक्षक व कनिष्ठ लिपीक ही तीन पदे रिक्त आहे. सहायक आयुक्तपदी जवळपास दोन वर्षांपासून तर औषध निरीक्षक हे पद एक वर्षापासून रिक्त आहे. अतिरिक्त सहायक आयुक्त पद हे रूपेश व्हटकर यांच्याकडे देण्यात आलेले आहे. कनिष्ठ लिपीक पद रिक्त असल्यामुळे व्हटकर यांना स्वत:च नोटीस काढावी लागते. तसेच त्याचे वितरणही करावे लागते. अतिरिक्त कामाचा ताण त्यांच्यावर पडत आहे.अन्न विभागात फार काही वेगळी स्थिती नाही. सद्य परिस्थितीला मोठ्या दुकानांची संख्या १ हजार ७६० तर छोट्या दुकानांची संख्या ९ हजार ८०६ इतकी आहे. मोठी हॉटेल्स ३९६ तर छोटी हॉटेल्स १ हजार २५ आहेत. याशिवाय छोट्यामोठ्या ढाब्याची संख्या १४७ आहे.या सर्वांचे परवाने काढणे, त्याचे नूतनीकरण करणे, गरज पडल्यास तपासणी करणे यासह इतर महत्त्वाच्या बाबींची जबाबदारी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर आहे. अन्न विभागात सहायक आयुक्त व अन्न सुरक्षा अधिकारी हे पद रिक्त आहे. सहायक आयुक्तांचा पदभार सागर तेरकर यांच्याकडे देण्यात आला आहे. अन्न सुरक्षा अधिकारी डी. जी. वीर हे कार्यरत आहेत. यामुळे दोन अधिकाऱ्यांवर या कामांची जबाबदारी आहे. न्यायालयीन कामकाजासह इतर दैनंदिन काम या अधिकाऱ्यांना करावे लागते. सदरील कार्यालयातील वरिष्ठ लिपीक एस. आर. खोले यांच्याकडे रोखपाल, कार्यालयीन कामकाजाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे.